शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने पिकांना जीवदान

By admin | Updated: September 24, 2015 00:05 IST

चंद्रकांत पाटील : राज्याच्या पंचवीस हजार गावांमधील शेतकऱ्यांना दिलासा

कऱ्हाड : ‘गेल्या आठवड्यात मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या मोठ्या भागात झालेल्या परतीच्या पावसामुळे दुष्काळी परिस्थतीत सुधारणा झाली आहे. आठवड्यापूर्वी राज्यातील सुमारे २५ हजार गावे दुष्काळाच्या छायेत होती. नुकत्याच झालेल्या पावसामुळे यापैकी अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होईल,’ असे मत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.कऱ्हाड येथे एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मंत्री पाटील यांनी सांगितले की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसानाबाबत घेतलेल्या निर्णयाचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. या निर्णयाप्रमाणे आता ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या ठिकाणीही दुष्काळ जाहीर करून तेथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. या निर्णयाचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल. दुष्काळाची सर्वाधिक तीव्रता जाणवणाऱ्या मराठवाड्यात शेतकऱ्यांकडून खरीपाच्या तुलनेत रब्बी पिकेच मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. गेल्या आठवड्यात झालेला पाऊस तेथील रब्बी पिकांसाठी उपयुक्त ठरु शकेल. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत देऊन चांगल्या उत्पादनासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. राज्यातील सहकार क्षेत्रात उघड होत असणाऱ्या भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांबाबत मत व्यक्त करताना पाटील यांनी सांगितले की, सहकारातील बजबजपुरी स्वच्छ करण्याची राज्य सरकारची मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे. राज्यातील अनेक जिल्हा सहकारी बँका भ्रष्टाचाराची कुरणे बनल्या आहेत. त्यांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर आरोपपत्रे दाखल करण्यात येतील. राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्यातील सहभागींवर दोषारोपपत्र दाखल केले आहे. याबाबत कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतरच राज्य सरकारला याबाबत ठोस कारवाई करता येईल. ‘एफआरपी’प्रमाणे ऊसदर न देणाऱ्या साखर कारखान्यांवर सरकारने सातत्याने दबाव ठेवला आहे; परंतु याबाबत मर्यादेपेक्षा जास्त कठोर निर्णय घेतल्यास कारखाने बंद पडून शेतकऱ्यांचेच नुकसान होईल. म्हणून सरकार अतिशय सावधपणे साखर कारखान्यांना याबाबत सूचना करीत असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.सातारा जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना शासकीय महामंडळात संधी देणार आहोत. जिल्ह्यातील बाजार समिती संचालक मंडळातही शासकीय संचालक म्हणून काही कार्यकर्त्यांची वर्णी लावणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेसह सर्व पक्ष भाजपविरोधात एकवटत असले तरी तेथील महापौर भाजपचाच असेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. त्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, ताराबाई आघाडी तसेच आरपीआय भाजपसोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) ...तर ‘सनातन’वर बंदीसनातन संघटनेवर बंदी घालण्याबाबत विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले की, पानसरे हत्या प्रकरणात पकडण्यात आलेल्या संशयितांचा आणि सनातनचा थेट संबंध आढळून आल्यास अशा कारवाईस सरकार मागेपुढे पाहणार नाही. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यात सहभागी असणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही.