शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
3
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
7
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
8
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
9
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
10
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
11
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
12
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
13
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
14
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
15
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
16
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
17
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
18
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
19
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

सर्वसाधारणसाठीच्या सरपंचपदावरही राखीवचा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:36 IST

सातारा : रस्सी जळाली तरी पीळ जळत नाही असे म्हणतात. ग्रामपंचायत निवडणुकीत सध्या असाच प्रकार सुरू आहे. गेल्या अनेक ...

सातारा : रस्सी जळाली तरी पीळ जळत नाही असे म्हणतात. ग्रामपंचायत निवडणुकीत सध्या असाच प्रकार सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर सर्वसामान्य गटातील उमेदवारासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य गटातील लोकांना सरपंच होता येईल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, सत्ता उपभोगायची सवय लागलेल्या आणि गावाची सत्ता आपल्याच ताब्यात राहावी यासाठी आता मागास आणि इतर राखीव गटातील लोकही सर्वसाधारणच्या जागेवर हक्क सांगू लागलेत. त्यामुळे यावेळी सर्वसाधारण गटातील उमेदवार सत्तेबाहेरच राहण्याची भीती व्यक्त होत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्यात आली आहे.

गेल्या पंधरा वर्षांत ज्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वसामान्य गटातील उमेदवाराला संधी मिळाली नाही त्यांना यावेळी संधी मिळाली आहे. मात्र, पंधरा वर्षांत एवढे बदल झाले आहेत की सत्तेची चावी आपल्याच हातात राहावी अशी अपेक्षा मागास, इतर मागास आणि राखीव महिला गटातील उमेदवारांची आहे. त्यामुळे दोन दिवसांत होणाऱ्या सरपंच निवडीवर इतर गटातील उमेदवारांचाच अधिक डोळा आहे. यासाठी सर्वसामान्य गटातील व्यक्तीला केवळ सत्तेचा सारिपाट पाहत बसावे लागणार आहे.

गेल्या अनेक वर्षांत मागास गटांना प्रतिनिधित्व मिळाले नव्हते, ही बाबदेखील तेवढीच खरी आहे. त्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक आरक्षणानुसार घेण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक गटाला प्रतिनिधित्व मिळावे आणि सर्वांचाच गावाच्या विकासात सहभाग असावा यासाठी हे नियोजन करण्यात आले होते. महिला राखीव, ओबीसी राखीव, अनुसूचित जाती, जमाती राखीव अशी सर्व आरक्षणे झाल्यानंतर आता सर्वसाधारण गटासाठी आरक्षण पडले. मात्र, हे आरक्षण राखीव नाहीच. या गटात कोणीही अर्ज दाखल करू शकते. त्यामुळे विविध राखीव गटांतील उमेदवार सरपंचपदासाठी इच्छुक आहेत. या आरक्षण पद्धतीमुळे भविष्यात कधीही सर्वसामान्य गटातील व्यक्तीला गावचे सरपंच होता येणार नाही, अशीच भीती व्यक्त केली जात आहे.

सर्वसाधारण गट म्हणजे सर्वांसाठी खुला गट असा त्याचा अर्थ होतो. पण, या पदावर निवड करताना सर्वसाधारण गटातून निवडून आलेल्या उमेदवारांचाच विचार होणे अपेक्षित आहे. सर्वसाधारण गटातून निवडून आलेल्या व्यक्ती बाजूला राहतात आणि राखीव गटातून निवडून आलेल्या व्यक्ती या सर्वसाधारण गटावर मात करतात. हा प्रकार सर्वांसाठीच अडचणीचा ठरत आहे.

चौकट

पंधरा वर्षे थांबा अन् पंधरा वर्षांनंतरही थांबा

पंधरा वर्षे आरक्षण नाही म्हणून सर्वसाधारण गटातील लोकांनी थांबायचे आणि आरक्षण पडल्यानंतरदेखील इतर गटातील लोकांनी हक्क सांगितल्यानंतर पुन्हा थांबायचे असा प्रकार होऊ लागल्याने खुल्या गटातील लोक हतबल झाले आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडेही दाद मागण्यात आली आहे.

कोट

जिल्ह्यातील १२१ जागांपैकी ६१ जागा महिलांसाठी आणि ६० जागा पुरुषांसाठी असे आरक्षण सोडतीवेळी जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार सरपंचपदाचे वाटप व्हावे. मात्र, सध्या सर्वसाधारण गटातील जागांवरही इतर राखीव गटातील उमेदवार हक्क सांगू लागल्याने याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

- धनंजय शिंदे,

सजग नागरिक सामाजिक संस्था