शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
5
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
7
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
8
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
9
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
10
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
11
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
12
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
13
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
14
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
15
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
16
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
17
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
18
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
19
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
20
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?

सर्वसाधारणसाठीच्या सरपंचपदावरही राखीवचा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:36 IST

सातारा : रस्सी जळाली तरी पीळ जळत नाही असे म्हणतात. ग्रामपंचायत निवडणुकीत सध्या असाच प्रकार सुरू आहे. गेल्या अनेक ...

सातारा : रस्सी जळाली तरी पीळ जळत नाही असे म्हणतात. ग्रामपंचायत निवडणुकीत सध्या असाच प्रकार सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर सर्वसामान्य गटातील उमेदवारासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य गटातील लोकांना सरपंच होता येईल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, सत्ता उपभोगायची सवय लागलेल्या आणि गावाची सत्ता आपल्याच ताब्यात राहावी यासाठी आता मागास आणि इतर राखीव गटातील लोकही सर्वसाधारणच्या जागेवर हक्क सांगू लागलेत. त्यामुळे यावेळी सर्वसाधारण गटातील उमेदवार सत्तेबाहेरच राहण्याची भीती व्यक्त होत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्यात आली आहे.

गेल्या पंधरा वर्षांत ज्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वसामान्य गटातील उमेदवाराला संधी मिळाली नाही त्यांना यावेळी संधी मिळाली आहे. मात्र, पंधरा वर्षांत एवढे बदल झाले आहेत की सत्तेची चावी आपल्याच हातात राहावी अशी अपेक्षा मागास, इतर मागास आणि राखीव महिला गटातील उमेदवारांची आहे. त्यामुळे दोन दिवसांत होणाऱ्या सरपंच निवडीवर इतर गटातील उमेदवारांचाच अधिक डोळा आहे. यासाठी सर्वसामान्य गटातील व्यक्तीला केवळ सत्तेचा सारिपाट पाहत बसावे लागणार आहे.

गेल्या अनेक वर्षांत मागास गटांना प्रतिनिधित्व मिळाले नव्हते, ही बाबदेखील तेवढीच खरी आहे. त्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक आरक्षणानुसार घेण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक गटाला प्रतिनिधित्व मिळावे आणि सर्वांचाच गावाच्या विकासात सहभाग असावा यासाठी हे नियोजन करण्यात आले होते. महिला राखीव, ओबीसी राखीव, अनुसूचित जाती, जमाती राखीव अशी सर्व आरक्षणे झाल्यानंतर आता सर्वसाधारण गटासाठी आरक्षण पडले. मात्र, हे आरक्षण राखीव नाहीच. या गटात कोणीही अर्ज दाखल करू शकते. त्यामुळे विविध राखीव गटांतील उमेदवार सरपंचपदासाठी इच्छुक आहेत. या आरक्षण पद्धतीमुळे भविष्यात कधीही सर्वसामान्य गटातील व्यक्तीला गावचे सरपंच होता येणार नाही, अशीच भीती व्यक्त केली जात आहे.

सर्वसाधारण गट म्हणजे सर्वांसाठी खुला गट असा त्याचा अर्थ होतो. पण, या पदावर निवड करताना सर्वसाधारण गटातून निवडून आलेल्या उमेदवारांचाच विचार होणे अपेक्षित आहे. सर्वसाधारण गटातून निवडून आलेल्या व्यक्ती बाजूला राहतात आणि राखीव गटातून निवडून आलेल्या व्यक्ती या सर्वसाधारण गटावर मात करतात. हा प्रकार सर्वांसाठीच अडचणीचा ठरत आहे.

चौकट

पंधरा वर्षे थांबा अन् पंधरा वर्षांनंतरही थांबा

पंधरा वर्षे आरक्षण नाही म्हणून सर्वसाधारण गटातील लोकांनी थांबायचे आणि आरक्षण पडल्यानंतरदेखील इतर गटातील लोकांनी हक्क सांगितल्यानंतर पुन्हा थांबायचे असा प्रकार होऊ लागल्याने खुल्या गटातील लोक हतबल झाले आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडेही दाद मागण्यात आली आहे.

कोट

जिल्ह्यातील १२१ जागांपैकी ६१ जागा महिलांसाठी आणि ६० जागा पुरुषांसाठी असे आरक्षण सोडतीवेळी जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार सरपंचपदाचे वाटप व्हावे. मात्र, सध्या सर्वसाधारण गटातील जागांवरही इतर राखीव गटातील उमेदवार हक्क सांगू लागल्याने याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

- धनंजय शिंदे,

सजग नागरिक सामाजिक संस्था