शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा अवकाळीनं अवकळा!

By admin | Updated: March 11, 2015 00:06 IST

सातारा जिल्ह्यात गारपिटीने दाणादाण : विजेच्या कडकडाटात मुसळधार पाऊस; कांदा, गहू, हरभऱ्यासह आंबा, डाळिंब फळबागांचे अतोनात नुकसान

सातारा : गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळीने पावसाने तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. रब्बी पिकांचे मोठे नुकसान पावसाने केले. शेतकऱ्यांनी काढून ठेवलेली ज्वारी, गहू, हरभरा मोतीमोल झाला. या संकटातून सावरत पावसाच्या तडाख्यातून वाचलेली उभी पिकं काढायला शेतकऱ्यांनी सुरुवात केली असतानाच अवकाळीने पुन्हा एकदा फटका दिला अन् बळीराजा पुरता कोलमडून गेला. जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे पिकांसह फळबागांचेही अतोनात नुकसान झाले आहे.झाड अंगावर पडून बैल जखमीमाळीखोरा येथील विठ्ठल देवकुळे यांच्या घरासमोरील पिंपरणीचे झाड वादळी पावसात बैलाच्या अंगावर कोसळल्याने बैल जखमी झाला. बैलाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उभे राहता येत नसल्याचे समजल्यानंतर विठ्ठल देवकुळे व त्यांच्या पत्नी द्रौपदा यांना अश्रू आवरता आले नाहीत. शेतीसाठी या बैलाचा आधार होता, आता कुणाच्या जिवावर शेती करायची, अशी वेदना देवकुळे कुटुंबीयांनी व्यक्त केली. परिसरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. मार्डी, पळशी परिसरात झाडे कोलमडली; वैरण विखुरलीपळशी : माण तालुक्यातील मार्डी, पळशी, माळीखोरा परिसरात विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसात झाडे उन्मळून पडली तर शेतकऱ्यांनी गोळा करून ठेवलेली वैरण, हरभरा रानभर अस्ताव्यस्त विखुरला आहे. सुमारे दोन तास वादळी वारे आणि पावसाचा धुमाकूळ सुरू होता.हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर शेतकऱ्यांनी उरलीसुरली सुगी उरकण्याची घाई सुरू केली होती. कुणी गहू कापून ठेवला होता कुणी हरभरा काढून ढिग मांडला होता. काही ठिकाणी ज्वारीची खुडणी करून वैरण गोळा करून ठेवली होती. पण धान्य घरी पोहोचण्यापूर्वी आणि वैरणीच्या गंजी लागण्याअगोदरच पावसाने घात केला. वैरण चिखलाने माखल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. कडब्याचे दरही वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.कऱ्हाडला अवकाळीने झोडपलेकऱ्हाड : मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक पडलेल्या अवकाळी पावसाने कऱ्हाड शहरासह तालुक्याला चांगलेच झोडपले. अचानक पडलेल्या पावसामुळे शहरातील बाजारपेठांतील व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले होते. सायंकाळच्या वेळी सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. अचानक पडलेल्या अवकाळी पावसाने काही ठिकाणी शेतीमालाचे तर काही ठिकाणी जनावरांच्या शेडचे नुकसान झाले. कांदा बियाण्यांचे वाफे उद्ध्वस्तसोमवारी सायंकाळी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. परिसरात काही शेतकऱ्यांनी कांद्याच्या बियाण्यांसाठी तरवे लावली होती. जोरदार पावसाने त्याचे वाफे वाहून गेले. त्यामुळे यंदा कांद्याच्या रोपांचा मोठा तुटवडा जाणवणार असल्याचे बोलले जात आहे.गारपिटीने आंबे गळालेमोठ्या कष्टाने दुष्काळी भागात शेतकऱ्यांनी फळबागा फुलविल्या आहेत. मात्र अवकाळीने डाळिंब, आंबा या फळबागांचे पावसाने मोठे नुकसान केले असून गारपिटीमुळे डाळिंब, कैऱ्या गळून पडल्या आहेत. फळांचा खच झाडाखाली दिसून येत आहे. पुन्हा फाटलं आभाळ... कसंतरी लावलं ठिगाळ!भुर्इंज : गेल्याच आठवड्यात पावसाने रौद्ररूप धारण करुन शेतकऱ्यांची दाणादाण उडवली होती. त्यामुळे ढसाढसा रडलेल्या शेतकऱ्याने झालेल्या नुकसानीचा विचार न करता दुसऱ्या दिवसापासून कंबर कसली आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. मात्र या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा एकदा आज (दि. १0)भुर्इंज परिसरात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चांगलीच पळापळ झाली. शेतकऱ्यांसह विविध उद्योजकांची आपलं आहे ते वाचवण्यासाठी झालेली धावपळ पाहता फाटलं आभाळ आणि लावलं ठिगाळ अशीच परिस्थिती दिसून आली. आधीच्याच पावसाने ज्वारी, गहू काळवंडून गेले आहे. वाळत टाकलेल्या हळदीचे उत्पन्न धोक्यात आले आहे. एकदा झालं ते अपघातानं, असं समजून शेतकऱ्यांनी आहे ते पीक वाचवण्यासाठी कंबर कसली होती. पुन्हा असे होणार नाही अशी खात्री या बळीराजाची होती. मात्र मंगळवारी घडले भलतेच. अचानक आलेल्या पावसाने चांगलीच दाणादाण उडवली. हळद वाळत घातलेल्या शेतकऱ्यांनी जेवढी शक्य आहे तेवढी हळद झाकली. मात्र गहू, ज्वारी, हरभरा यासह विविध पिकांचे नुकसान अधिकच झाले. वीटभट्ट्या झाकल्यावीटभट्टीवाल्यांचे गेल्या पावसात मोठे नुकसान झाले, त्यामुळे त्यांनी ताडपत्रीची व्यवस्था केली होती. पण या पावसात ती व्यवस्था एखाद्या ठिगळाएवढीच राहिली. अनेक दुचाकीस्वार या पावसामुळे रस्त्याकडेला आडोसा घेऊन थांबले. निसर्गाचं ताळतंत्रचं सुटलं आहे, अशीच प्रतिक्रिया या सर्वांकडून व्यक्त होत होती.