शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

पुन्हा अवकाळीनं अवकळा!

By admin | Updated: March 11, 2015 00:06 IST

सातारा जिल्ह्यात गारपिटीने दाणादाण : विजेच्या कडकडाटात मुसळधार पाऊस; कांदा, गहू, हरभऱ्यासह आंबा, डाळिंब फळबागांचे अतोनात नुकसान

सातारा : गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळीने पावसाने तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. रब्बी पिकांचे मोठे नुकसान पावसाने केले. शेतकऱ्यांनी काढून ठेवलेली ज्वारी, गहू, हरभरा मोतीमोल झाला. या संकटातून सावरत पावसाच्या तडाख्यातून वाचलेली उभी पिकं काढायला शेतकऱ्यांनी सुरुवात केली असतानाच अवकाळीने पुन्हा एकदा फटका दिला अन् बळीराजा पुरता कोलमडून गेला. जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे पिकांसह फळबागांचेही अतोनात नुकसान झाले आहे.झाड अंगावर पडून बैल जखमीमाळीखोरा येथील विठ्ठल देवकुळे यांच्या घरासमोरील पिंपरणीचे झाड वादळी पावसात बैलाच्या अंगावर कोसळल्याने बैल जखमी झाला. बैलाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उभे राहता येत नसल्याचे समजल्यानंतर विठ्ठल देवकुळे व त्यांच्या पत्नी द्रौपदा यांना अश्रू आवरता आले नाहीत. शेतीसाठी या बैलाचा आधार होता, आता कुणाच्या जिवावर शेती करायची, अशी वेदना देवकुळे कुटुंबीयांनी व्यक्त केली. परिसरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. मार्डी, पळशी परिसरात झाडे कोलमडली; वैरण विखुरलीपळशी : माण तालुक्यातील मार्डी, पळशी, माळीखोरा परिसरात विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसात झाडे उन्मळून पडली तर शेतकऱ्यांनी गोळा करून ठेवलेली वैरण, हरभरा रानभर अस्ताव्यस्त विखुरला आहे. सुमारे दोन तास वादळी वारे आणि पावसाचा धुमाकूळ सुरू होता.हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर शेतकऱ्यांनी उरलीसुरली सुगी उरकण्याची घाई सुरू केली होती. कुणी गहू कापून ठेवला होता कुणी हरभरा काढून ढिग मांडला होता. काही ठिकाणी ज्वारीची खुडणी करून वैरण गोळा करून ठेवली होती. पण धान्य घरी पोहोचण्यापूर्वी आणि वैरणीच्या गंजी लागण्याअगोदरच पावसाने घात केला. वैरण चिखलाने माखल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. कडब्याचे दरही वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.कऱ्हाडला अवकाळीने झोडपलेकऱ्हाड : मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक पडलेल्या अवकाळी पावसाने कऱ्हाड शहरासह तालुक्याला चांगलेच झोडपले. अचानक पडलेल्या पावसामुळे शहरातील बाजारपेठांतील व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले होते. सायंकाळच्या वेळी सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. अचानक पडलेल्या अवकाळी पावसाने काही ठिकाणी शेतीमालाचे तर काही ठिकाणी जनावरांच्या शेडचे नुकसान झाले. कांदा बियाण्यांचे वाफे उद्ध्वस्तसोमवारी सायंकाळी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. परिसरात काही शेतकऱ्यांनी कांद्याच्या बियाण्यांसाठी तरवे लावली होती. जोरदार पावसाने त्याचे वाफे वाहून गेले. त्यामुळे यंदा कांद्याच्या रोपांचा मोठा तुटवडा जाणवणार असल्याचे बोलले जात आहे.गारपिटीने आंबे गळालेमोठ्या कष्टाने दुष्काळी भागात शेतकऱ्यांनी फळबागा फुलविल्या आहेत. मात्र अवकाळीने डाळिंब, आंबा या फळबागांचे पावसाने मोठे नुकसान केले असून गारपिटीमुळे डाळिंब, कैऱ्या गळून पडल्या आहेत. फळांचा खच झाडाखाली दिसून येत आहे. पुन्हा फाटलं आभाळ... कसंतरी लावलं ठिगाळ!भुर्इंज : गेल्याच आठवड्यात पावसाने रौद्ररूप धारण करुन शेतकऱ्यांची दाणादाण उडवली होती. त्यामुळे ढसाढसा रडलेल्या शेतकऱ्याने झालेल्या नुकसानीचा विचार न करता दुसऱ्या दिवसापासून कंबर कसली आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. मात्र या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा एकदा आज (दि. १0)भुर्इंज परिसरात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चांगलीच पळापळ झाली. शेतकऱ्यांसह विविध उद्योजकांची आपलं आहे ते वाचवण्यासाठी झालेली धावपळ पाहता फाटलं आभाळ आणि लावलं ठिगाळ अशीच परिस्थिती दिसून आली. आधीच्याच पावसाने ज्वारी, गहू काळवंडून गेले आहे. वाळत टाकलेल्या हळदीचे उत्पन्न धोक्यात आले आहे. एकदा झालं ते अपघातानं, असं समजून शेतकऱ्यांनी आहे ते पीक वाचवण्यासाठी कंबर कसली होती. पुन्हा असे होणार नाही अशी खात्री या बळीराजाची होती. मात्र मंगळवारी घडले भलतेच. अचानक आलेल्या पावसाने चांगलीच दाणादाण उडवली. हळद वाळत घातलेल्या शेतकऱ्यांनी जेवढी शक्य आहे तेवढी हळद झाकली. मात्र गहू, ज्वारी, हरभरा यासह विविध पिकांचे नुकसान अधिकच झाले. वीटभट्ट्या झाकल्यावीटभट्टीवाल्यांचे गेल्या पावसात मोठे नुकसान झाले, त्यामुळे त्यांनी ताडपत्रीची व्यवस्था केली होती. पण या पावसात ती व्यवस्था एखाद्या ठिगळाएवढीच राहिली. अनेक दुचाकीस्वार या पावसामुळे रस्त्याकडेला आडोसा घेऊन थांबले. निसर्गाचं ताळतंत्रचं सुटलं आहे, अशीच प्रतिक्रिया या सर्वांकडून व्यक्त होत होती.