शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्नवाढीसाठी ‘पंचायती राज’ला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:07 IST

सातारा : जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या वतीने साताऱ्यात दाखल झालेल्या पंचायती राज समितीच्या सदस्यांपुढे केली.जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पंचायती राज समिती बुधवारी (दि. ११) साताºयात दाखल झाली. शासकीय विश्रामगृहावर या समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे (नागपूर) यांच्यासह विविध राज्यांतील २८ आमदार, विधानमंडळाचे ...

सातारा : जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या वतीने साताऱ्यात दाखल झालेल्या पंचायती राज समितीच्या सदस्यांपुढे केली.जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पंचायती राज समिती बुधवारी (दि. ११) साताºयात दाखल झाली. शासकीय विश्रामगृहावर या समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे (नागपूर) यांच्यासह विविध राज्यांतील २८ आमदार, विधानमंडळाचे १० अधिकारी, कर्मचारी, ग्रामविकास विभागाचे दोन अधिकारी, स्थानिक लेखा निधीचे संचालक, सहसंचालक, उपायुक्त, सहायक आयुक्त यांचा समावेश असणाºया या समितीचे स्वागत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. अर्थ व शिक्षण समितीचे सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वनिता गोरे, सातारा पंचायत समितीचे सभापती मिलिंद कदम तसेच अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.विश्रामगृहावर सकाळी आमदार मकरंद पाटील व आमदार शंभूराज देसाई यांनी समितीच्या सदस्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाºयांनी समितीची भेट घेतली.जमीन खरेदी-विक्री व्यवहारातून १ टक्का इतकी स्टँम्प ड्युटी जिल्हा परिषदेला मिळते. त्यात ५ टक्क्यांपर्यंत वाढ होणे आवश्यक आहे. पंचायत समितींना १४ व्या वित्त आयोगातून निधी मिळाला तर सदस्यांना हा निधी वापरणे शक्य होईल. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेला वेगळा निधी मिळणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या जागा विकसित करण्यासाठी मंजुरी मिळणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेचे बजेट अवघे ६४ कोटींचे आहे, या निधीतून विकासकामे करणे अवघड होत असल्याची समस्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर व इतरांनी मांडली.दरम्यान, यानंतर ही समिती जिल्हा परिषदेत दाखल झाली. महात्मा जोतिबा फुले यांची जयंती असल्याने सुरुवातीला त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून ही समिती चौथ्या मजल्यावरील सभागृहाकडे गेली. सभागृहामध्ये मुख्य कार्यकारी अधिकाºयांसह निवडक अधिकाºयांनाच प्रवेश देण्यात आला. कामाव्यतिरिक्त इतर कारणासाठी आलेल्या लोकांना बाहेर पाठविण्यात आले. अनेक अधिकाºयांनाही बाहेरच थांबण्याच्या सूचना करण्यात आल्या.यानंतर जिल्हा परिषदेच्या सभागृहात २०१२-१३ च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवालातील परिच्छेदासंबंधात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची साक्ष झाली. विविध विभागांतील खातेप्रमुखांशी समितीने चर्चा केली. सायंकाळी उशिरापर्यंत कामकाज सुरू होते.गुरुवार, दि. १२ रोजी सकाळी नऊपासून जिल्ह्यातील पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामपंचायतींना भेटी, पंचायत समिती गटविकास अधिकारी व संबंधित अधिकाºयांची साक्ष होईल. शुक्रवार, दि. १३ रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषदेच्या कारभाराचे २०१३-१४ च्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांची साक्ष होणार आहे.शोभेची झाडे अन् रांगोळ्याहीसमितीच्या स्वागतासाठी जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये ठिकठिकाणी शोभेची झाडे असणाºया कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. त्याभोवती रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. सभागृहातही कार्पेट टाकण्यात आले होते.