शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
2
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
3
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
4
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
5
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
6
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
7
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
8
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
9
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
10
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
11
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
12
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
13
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
14
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
15
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
16
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
17
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
18
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
19
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
20
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...

लॉकडाऊनमध्ये साडेसातशे गाड्यांची दुरुस्ती पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:41 IST

सातारा : नोकरीसाठी मुलाखत, महत्त्वाची मुलाखत किंवा पाहुण्यांकडे चांगले कपडे घालून जायचे अन् रस्त्यात पाऊस गाठतो. भलेही एसटीतून प्रवास ...

सातारा : नोकरीसाठी मुलाखत, महत्त्वाची मुलाखत किंवा पाहुण्यांकडे चांगले कपडे घालून जायचे अन् रस्त्यात पाऊस गाठतो. भलेही एसटीतून प्रवास सुरू असला तरी एसटीच्या छतातून पावसाचा थेंब टिपकायला सुरुवात होते. त्यातही गंजलेला पत्रा असला तर तांबूस डाग पांढऱ्याशुभ्र कपड्यावर पडलाच म्हणून समजा. पण हे प्रसंग यंदा फारसे अनुभवास मिळाले नाहीत. कोरोना काळात ही सर्व कामे करण्यात आली होती. राज्य परिवहन महामंडळाची एसटी ही सर्वसामान्यांसाठी जीवनवाहिनी असते. हजारो नोकरदार दररोज एसटीने कामाच्या ठिकाणी ये-जा करतात. मात्र पूर्वी अनेक गाड्या गळक्या असायच्या. त्यामुळे प्रवास करणं डोकेदुखी वाटत असायची. हे चित्र दरवर्षीच अनुभवास मिळत असायचे. मात्र सातारा जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट साधारणत: फेब्रुवारीत आली आणि मार्चपासून एसटी पुन्हा बंद करावी लागली. मात्र एसटी आगार, कार्यशाळेतील कर्मचारी येतच होते. त्यांच्या ठरलेल्या वार्षिक नियोजनानुसार सर्व कामे सुरू होती. गाड्या आगारातच असल्याने या काळात सर्व डागडुजी करण्यात आली आहे.

एकही गाडी गळकी नाही

सातारा विभागात साडेसातशे एसटी गाड्या आहेत. सर्व गाड्यांची दुरुस्ती, डागडुजी करण्यात आली आहे. त्यामुळे कोणती गाडी गळकी असल्याची अजूनही एकही तक्रार आलेली नाही.

- सुहास भोसले, विभागीय यंत्र अभियंता, चालन

कोट :

एसटीतील अधिकारी कितीही एसटी सुस्थितीत असल्याचे सांगत असले तरी ग्रामीण भागात येणाऱ्या गाड्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. अनेक गाड्या गळत असतात. हेडलाइटच लागत नाही. तर काहींचे वायफर नादुरुस्त असतात.

- सागर माने, सातारा

कोट :

एसटीतील जुन्या बनावटीच्या पत्र्याच्या गाड्या गळक्या होता. आता आलेल्या गाड्यांमध्ये ही समस्या दिसत नाही. त्यामुळे अशाच गाड्या रस्त्यावर आणल्या तर समस्या भेडसावणार नाही.

- विलास साबळे, सातारा

चौकट

आसनावरील कुशनची मात्र वाट लागली

लॉकडाऊन काळात एसटी गाड्या एकाच ठिकाणी उभ्या होत्या. या काळात कारागिरांनी भलेही यांत्रिक कामे नियमित केले. गाड्या सुरू करणे, एखादी फेरी मारून पुन्हा लावल्या आहेत. त्यामुळे यांत्रिक बिघाड जाणवले नाहीत.

आतील भागांचा वापरच न झाल्याने आसनांची, कुशनची मोठ्या प्रमाणावर नादुरुस्ती झाली आहे. अनेक गाड्यांचे सीट फाटले आहेत. त्यामुळे अडचणी येत आहेत.

अनेक शिवशाही गाड्यांचे दरवाजे उघडे होते. त्यामुळे कोणीही येऊन बसत असायचे. त्यामुळे अनेकदा पडदेही चोरीला गेले आहेत. त्यामुळे आगीची घटना घडल्यानंतर हे प्रमाण कमी आले आहे.