शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सोबत्यांच्या वाढदिवसाला तरुणाने जोडले वृक्षांशी नाते...-- ओमकार चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 22:15 IST

सातारा : सध्या राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी गावोगावी जलसंधारण आणि वृक्षारोपणची चळवळ उभी ...

ठळक मुद्देवृक्षलागवड, संवर्धनामुळे पर्यावरणाचा ºहास थांबवून वातावरणाचा समतोल राखण्यास मदत

सातारा : सध्या राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी गावोगावी जलसंधारण आणि वृक्षारोपणची चळवळ उभी राहिली आहे. त्यामध्ये आपला खारीचा वाटा असावा, यासाठी अनेकजण आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करीत आहेत. तळिये येथील एका तरुणाने आपल्या मित्र व नातेवाइकांच्या वाढदिवसाला कोणत्याही स्वरुपाची भेट वस्तू देण्यापेक्षा रोप देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

सातारा जिल्ह्यात माण, खटाव व कोरेगाव हे तीन तालुके दुष्काळी म्हणून ओळखले जातात. कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन परिसरातील गावांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत असतो. तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना वणवण करावी लागते.

दुष्काळ आणि पाणी टंचाई आदी प्रश्नांवर मात करण्यासाठी तळिये येथील ओमकार चव्हाण या तरुणाने ग्रामस्थांच्या मदतीने गावामध्ये जलसंधारणच्या कामांना सुरुवात केली. ते करीत असताना केवळ जलसंधारणाची कामे करून चालणार नाहीत. म्हणून पहिल्यांदा हवामान शास्त्र समजून घेतलं पाहिजे, यासाठी पर्यावरणाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. तेव्हा मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने त्याचा प्रत्यक्ष परिणाम पर्यावरणावर झाला आहे. त्याचा परिणाम पावसावर होऊन पाऊस कमी झाल्याचे उमगले.

ही समस्या सोडविण्यासाठी त्याने स्वत: वृक्ष लागवड करण्यास सुरुवात केली. लागवड केलेल्या झाडांचे संवर्धन करत असताना एकट्याला मर्यादा येत असल्याचे पाहून इतरांनाही या चळवळीत सहभागी करून घेतले. मात्र, त्यामध्ये सातत्य राहत नसल्याने त्यांनी मित्रमंडळी आणि नातेवाइकांच्या वाढदिवस तसेच शुभकार्याला भेट वस्तू न देता झाडाचे रोप दिले जाते.विद्यार्थ्यांकडून सीडबॉल निर्मितीवृक्ष लागवड आणि संवर्धनाची चळवळमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोकांचा सहभाग असावा. प्रत्येक मोहिमेमध्ये शाळकरी मुलांचे मोठे योगदान असते. म्हणून अशा मुलांना सोबत घेऊन ओमकार चव्हाण उन्हाळ्यात स्थानिक झाडांच्या बिया गोळा करून सीडबॉल तयार करतात. पावसाळा सुरू झाल्यावर ते गोळे परिसरात टाकले जातात. 

पर्यावरण संवर्धनाची गरजदुष्काळ, पाणी टंचाई आणि हवामान बदल आदी प्रश्नांना तोंड देण्यासाठी पर्यावरण संवर्धन गरजेचे आहे. त्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या पद्धतीने काम केले पाहिजे. सध्या वाढलेले तापमान, कमी झालेले पावसाचे प्रमाण आदी वातावरण बदलाची लक्षणे आहेत. आपल्या पृथ्वीला वाचविण्यासाठी वृक्षलागवड केली पाहिजे. तसेच त्याचे संवर्धनही केले पाहिजे.- ओमकार चव्हाण

टॅग्स :Satara areaसातारा परिसरforestजंगल