शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सोबत्यांच्या वाढदिवसाला तरुणाने जोडले वृक्षांशी नाते...-- ओमकार चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 22:15 IST

सातारा : सध्या राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी गावोगावी जलसंधारण आणि वृक्षारोपणची चळवळ उभी ...

ठळक मुद्देवृक्षलागवड, संवर्धनामुळे पर्यावरणाचा ºहास थांबवून वातावरणाचा समतोल राखण्यास मदत

सातारा : सध्या राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी गावोगावी जलसंधारण आणि वृक्षारोपणची चळवळ उभी राहिली आहे. त्यामध्ये आपला खारीचा वाटा असावा, यासाठी अनेकजण आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करीत आहेत. तळिये येथील एका तरुणाने आपल्या मित्र व नातेवाइकांच्या वाढदिवसाला कोणत्याही स्वरुपाची भेट वस्तू देण्यापेक्षा रोप देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

सातारा जिल्ह्यात माण, खटाव व कोरेगाव हे तीन तालुके दुष्काळी म्हणून ओळखले जातात. कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन परिसरातील गावांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत असतो. तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना वणवण करावी लागते.

दुष्काळ आणि पाणी टंचाई आदी प्रश्नांवर मात करण्यासाठी तळिये येथील ओमकार चव्हाण या तरुणाने ग्रामस्थांच्या मदतीने गावामध्ये जलसंधारणच्या कामांना सुरुवात केली. ते करीत असताना केवळ जलसंधारणाची कामे करून चालणार नाहीत. म्हणून पहिल्यांदा हवामान शास्त्र समजून घेतलं पाहिजे, यासाठी पर्यावरणाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. तेव्हा मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने त्याचा प्रत्यक्ष परिणाम पर्यावरणावर झाला आहे. त्याचा परिणाम पावसावर होऊन पाऊस कमी झाल्याचे उमगले.

ही समस्या सोडविण्यासाठी त्याने स्वत: वृक्ष लागवड करण्यास सुरुवात केली. लागवड केलेल्या झाडांचे संवर्धन करत असताना एकट्याला मर्यादा येत असल्याचे पाहून इतरांनाही या चळवळीत सहभागी करून घेतले. मात्र, त्यामध्ये सातत्य राहत नसल्याने त्यांनी मित्रमंडळी आणि नातेवाइकांच्या वाढदिवस तसेच शुभकार्याला भेट वस्तू न देता झाडाचे रोप दिले जाते.विद्यार्थ्यांकडून सीडबॉल निर्मितीवृक्ष लागवड आणि संवर्धनाची चळवळमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोकांचा सहभाग असावा. प्रत्येक मोहिमेमध्ये शाळकरी मुलांचे मोठे योगदान असते. म्हणून अशा मुलांना सोबत घेऊन ओमकार चव्हाण उन्हाळ्यात स्थानिक झाडांच्या बिया गोळा करून सीडबॉल तयार करतात. पावसाळा सुरू झाल्यावर ते गोळे परिसरात टाकले जातात. 

पर्यावरण संवर्धनाची गरजदुष्काळ, पाणी टंचाई आणि हवामान बदल आदी प्रश्नांना तोंड देण्यासाठी पर्यावरण संवर्धन गरजेचे आहे. त्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या पद्धतीने काम केले पाहिजे. सध्या वाढलेले तापमान, कमी झालेले पावसाचे प्रमाण आदी वातावरण बदलाची लक्षणे आहेत. आपल्या पृथ्वीला वाचविण्यासाठी वृक्षलागवड केली पाहिजे. तसेच त्याचे संवर्धनही केले पाहिजे.- ओमकार चव्हाण

टॅग्स :Satara areaसातारा परिसरforestजंगल