शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
3
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
4
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
5
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
6
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
7
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
8
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
9
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
10
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
11
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
12
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
13
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
14
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
15
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
16
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
17
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
18
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
19
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
20
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!

सोबत्यांच्या वाढदिवसाला तरुणाने जोडले वृक्षांशी नाते...-- ओमकार चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 22:15 IST

सातारा : सध्या राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी गावोगावी जलसंधारण आणि वृक्षारोपणची चळवळ उभी ...

ठळक मुद्देवृक्षलागवड, संवर्धनामुळे पर्यावरणाचा ºहास थांबवून वातावरणाचा समतोल राखण्यास मदत

सातारा : सध्या राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी गावोगावी जलसंधारण आणि वृक्षारोपणची चळवळ उभी राहिली आहे. त्यामध्ये आपला खारीचा वाटा असावा, यासाठी अनेकजण आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करीत आहेत. तळिये येथील एका तरुणाने आपल्या मित्र व नातेवाइकांच्या वाढदिवसाला कोणत्याही स्वरुपाची भेट वस्तू देण्यापेक्षा रोप देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

सातारा जिल्ह्यात माण, खटाव व कोरेगाव हे तीन तालुके दुष्काळी म्हणून ओळखले जातात. कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन परिसरातील गावांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत असतो. तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना वणवण करावी लागते.

दुष्काळ आणि पाणी टंचाई आदी प्रश्नांवर मात करण्यासाठी तळिये येथील ओमकार चव्हाण या तरुणाने ग्रामस्थांच्या मदतीने गावामध्ये जलसंधारणच्या कामांना सुरुवात केली. ते करीत असताना केवळ जलसंधारणाची कामे करून चालणार नाहीत. म्हणून पहिल्यांदा हवामान शास्त्र समजून घेतलं पाहिजे, यासाठी पर्यावरणाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. तेव्हा मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने त्याचा प्रत्यक्ष परिणाम पर्यावरणावर झाला आहे. त्याचा परिणाम पावसावर होऊन पाऊस कमी झाल्याचे उमगले.

ही समस्या सोडविण्यासाठी त्याने स्वत: वृक्ष लागवड करण्यास सुरुवात केली. लागवड केलेल्या झाडांचे संवर्धन करत असताना एकट्याला मर्यादा येत असल्याचे पाहून इतरांनाही या चळवळीत सहभागी करून घेतले. मात्र, त्यामध्ये सातत्य राहत नसल्याने त्यांनी मित्रमंडळी आणि नातेवाइकांच्या वाढदिवस तसेच शुभकार्याला भेट वस्तू न देता झाडाचे रोप दिले जाते.विद्यार्थ्यांकडून सीडबॉल निर्मितीवृक्ष लागवड आणि संवर्धनाची चळवळमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोकांचा सहभाग असावा. प्रत्येक मोहिमेमध्ये शाळकरी मुलांचे मोठे योगदान असते. म्हणून अशा मुलांना सोबत घेऊन ओमकार चव्हाण उन्हाळ्यात स्थानिक झाडांच्या बिया गोळा करून सीडबॉल तयार करतात. पावसाळा सुरू झाल्यावर ते गोळे परिसरात टाकले जातात. 

पर्यावरण संवर्धनाची गरजदुष्काळ, पाणी टंचाई आणि हवामान बदल आदी प्रश्नांना तोंड देण्यासाठी पर्यावरण संवर्धन गरजेचे आहे. त्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या पद्धतीने काम केले पाहिजे. सध्या वाढलेले तापमान, कमी झालेले पावसाचे प्रमाण आदी वातावरण बदलाची लक्षणे आहेत. आपल्या पृथ्वीला वाचविण्यासाठी वृक्षलागवड केली पाहिजे. तसेच त्याचे संवर्धनही केले पाहिजे.- ओमकार चव्हाण

टॅग्स :Satara areaसातारा परिसरforestजंगल