शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
5
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
6
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
7
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
8
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
9
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
10
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
11
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
12
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
13
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
14
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
15
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
16
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
17
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
18
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
19
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
20
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल

नुकसानग्रस्तांना वनविभागाकडून भरपाई

By admin | Updated: October 31, 2015 00:09 IST

शेतकऱ्यांत समाधान : कुसूर परिसरात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील तारूख परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या भुईमुगासह इतर पिकांचे व पाळीव प्राण्यांचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले होते. परिणामी वनविभागाकडून तत्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. तारूखसह बामणवाडी, शिबेवाडी, पवारवाडी, वानरवाडी, चाळकेवाडी, कारंडेवाडी आणि खड्याचीवाडी या वाड्यावस्त्या पूर्णता: डोंगर पायथ्यालगत वसल्या आहेत. चारी बाजूने घनदाट झाडी झुडपे असल्याने वनक्षेत्र असल्याने या वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे. वनक्षेत्राला लागून शेतकऱ्यांच्या शेत जमिनी असल्याने वन्यप्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. तर हिंस्त्र वन्य प्राण्यांकडून पाळीव जनावरे मारली जात आहेत. रानटी डुकरांकडून भुईमुग पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आल्याने वनपाल आर. डी. माळी आणि वनरक्षक बेंद्रे यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर तत्काळ पाहणी करून पिकांचे पंचनामे केले. हा पंचनामा वरिष्ठांकडे पाठविला. वरिष्ठांनीही दखल घेऊन तत्काळ मदतीची प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई देण्यात आली. शिवाजी चाळके, सुभद्रा चाळके, आनंदा पाटील, बाबूराव चाळके, अरुण शिबे आणि आनंदा शिंदे, शिंबेवाडी येथील शेतकऱ्यांना पीक नुकसानपोटी वनविभागाकडून प्रत्येकी २८ हजार १५९ रुपये देण्यात आले. तसेच तारूख येथील भगवान शिरतोडे, चंद्रकांत पवार, पवारवाडी आणि रघुनाथ पाटील, शिबेवाडी या शेतकऱ्यांच्या शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात मारल्या गेल्या त्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. (वार्ताहर) मदतीपासून शेतकरी अनभिज्ञ वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान झाल्यास वनविभागाकडून आर्थिक नुकसान भरपाई दिली जाते हे बहूतांश शेतकऱ्यांना माहित नाही. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले तरीही अनेक शेतकरी कोणतीही कार्यवाही करीत नाहीत. परिणामी, त्यांना मदतीपासून वंचित रहावे लागते. ... यांना मिळते भरपाई ! वानर आणि साळींदर या प्राण्यांकडून शेती पिकांचे नुकसान झाल्यास वनविभागाकडून कसलीच नुकसान भरपाई दिली जात नाही. मात्र, रानडुक्कर, माकड, हत्ती या प्राण्यांकडून शेतीचे नुकसान झाल्यास भरपाई दिली जाते तसेच हिंस्त्र प्राण्यांकडून पाळीव जनावरे मारल्यास नुकसान भरपाई दिली जाते.