शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

धरणग्रस्तांचे सहा महिन्यांत म्हसवड येथे पुनर्वसन

By admin | Updated: May 7, 2015 00:18 IST

प्रशासकीय बैठकीत निर्णय : लेखी आश्वासनानंतर वेणेखोलच्या ग्रामस्थांनी उपोषण घेतले मागे

परळी : गेली आठ वर्षे पुनर्वसनापासून वंचित असलेल्या उरमोडी प्रकल्पबाधित वेणेखोल ग्रामस्थांना प्रशासनाने पुन्हा पुनर्वसनाबाबत सहा महिन्यांची ‘डेडलाईन’ दिली आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची चर्चा केली. वेणेखोल ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यातील ही शेवटची बैठक होती. यामध्ये निर्णय न झाल्यास उरमोडीचे पाणी सोडणार किंवा जलसमर्पण करणार, असा निर्णय घेतल्याने प्रशासनाने वेणेखोल ग्रामस्थांचे पुनर्वसन म्हसवड, ता. माण येथे सहा महिन्यात करण्याचा निर्णय घेतला आहे.बुधवारी धरणग्रस्तांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीस आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपजिल्हाधिकारी (महसूल) व अतिरिक्त जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे, जिल्हा पुनर्वसन तहसीलदार स्मिता पवार, जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, उरमोडी धरण अभियंता दाभाडकर, पुनर्वसनचे अधिकारी तसेच वेणेखोल धरणग्रस्तांसह उरमोडी जलाशयात बाधित झालेले २३ गावचे प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.धरणग्रस्तांनी पुनर्वसनासाठी वारंवार आंदोलने केली. मात्र प्रशासनाकडून त्यांना फक्त तारीख पे तारीख मिळत आहे. परंतु बुधवारी झालेल्या बैठकीत प्रशासनाने वेणेखोल ग्रामस्थांना सहा महिन्यात म्हसवड, ता. माण येथील १३९.५४ हेक्टर क्षेत्रात पुनर्वसन करणार असून ६५ टक्के रक्कम लवकरच देणार असल्याचे सांगितले. मात्र, गेली अठरा वर्षे आम्ही हेच ऐकत आहे. आम्हाला तसे लेखी पत्र द्या, असा निर्णय धरणग्रस्तांनी घेतला. त्यानंतर प्रशासनाने म्हसवड येथे पुनर्वसन करणार असल्याबाबतचे पत्र आंदोलकांना दिले. (वार्ताहर)लेखी आश्वासनानंतर उपोषण मागेवेणेखोल ग्रामस्थांनी आजच्या बैठकीत योग्य निर्णय न झाल्यास धरणातील पाणी सोडणार किंवा जलसमर्पण करणार असल्याचा निर्णय घेतला होता. यासाठी धरणाच्या भिंतीवर सुमारे तीनशे धरणग्रस्त थांबले होते. प्रशासकीय अधिकारी स्मिता पवार, अभियंता दाभाडकर यांनी उरमोडी धरणावर जाऊन भिंतीवर बसलेल्या आंदोलकांना म्हसवड येथे पुनर्वसन करणार असल्याचे पत्र दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. अनेक वर्षे आम्ही प्रशासनावर विश्वास ठेवला आहे आणि आजच्या निर्णयावरही ठेवतो आहे. मात्र, प्रशासनाने शब्द न पाळल्यास आम्ही उरमोडीचे पाणी सोडून आमच्या जमिनी पुन्हा कसणार आहे. - विठ्ठल सपकाळ, सदस्य, वेणेखोल धरणग्रस्त समिती