शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: 'एक्झिट पोल'नुसार आंध्र प्रदेशात भाजपा सुस्साट, तेलंगणातही 'कमाल'
2
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
3
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 
4
केजरीवालांना उद्या सरेंडर व्हावे लागणार; कोर्ट अंतरिम जामिनावर ५ जूनला निकाल देणार 
5
शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत तटकरेंचा खळबळजनक दावा; मात्र अजित पवार म्हणाले...
6
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
7
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
8
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."
9
पंतप्रधान मोदींच्या १५५ सभा, २ हजारहून अधिक वेळा उच्चारले हे २ शब्द; विरोधकांना या ५ मुद्द्यांवर घेरलं!
10
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षातील महत्त्वपूर्ण नियुक्त्यांची घोषणा, सुप्रिया सुळेंकडे सोपवली मोठी जबाबदारी
11
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
12
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
13
रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष
14
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
15
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
16
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
17
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?
18
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
19
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
20
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत

‘किसन वीर’, ‘खंडाळा’चे रजिस्टर सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 11:19 PM

पाचवड/खंडाळा : ऊस उत्पादकांचे थकीत बिल देण्यासाठी साखर आयुक्तांच्या आदेशानुसार महसूल खात्याने किसन वीर अन् खंडाळा साखर कारखान्यांच्या साखर साठ्याचे रजिस्टर रविवारी सील केले.ऊस नियंत्रण आदेशानुसार शेतकऱ्यांना गाळप उसाची एफआरपीप्रमाणे रक्कम देण्यासाठी भुर्इंज येथील किसन वीर व खंडाळा कारखान्यांतील साखर जप्तीचे आदेश राज्य साखर आयुक्तांनी शनिवारी साताºयाच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल ...

पाचवड/खंडाळा : ऊस उत्पादकांचे थकीत बिल देण्यासाठी साखर आयुक्तांच्या आदेशानुसार महसूल खात्याने किसन वीर अन् खंडाळा साखर कारखान्यांच्या साखर साठ्याचे रजिस्टर रविवारी सील केले.ऊस नियंत्रण आदेशानुसार शेतकऱ्यांना गाळप उसाची एफआरपीप्रमाणे रक्कम देण्यासाठी भुर्इंज येथील किसन वीर व खंडाळा कारखान्यांतील साखर जप्तीचे आदेश राज्य साखर आयुक्तांनी शनिवारी साताºयाच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना दिले होते. त्यानुसार महसूल खात्याचे अधिकारी व कर्मचारी दोन्ही कारखान्यांवर थडकले. त्यांनी या ठिकाणी असलेल्या साखर साठ्याचा तसेच मोलॅसिसचा पंचनामा करून स्टॉक रजिस्टरही सील केले.दोन्ही युनिटकडून सुमारे ९८ कोटी ७५ लाख रुपये शेतकºयांची देय रक्कम वसूल करण्यासाठी या कारखान्यांच्या साखर जप्तीचे आदेश साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांनी दिले होते. सातारा जिल्हाधिकारी यांना कारवाईसाठी प्राधिकृत करण्यात आले होते.साखर आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार भुर्इंज येथील कारखान्याची ऊस उत्पादकांची देय बाकी ७१ कोटी २८ लाख रुपये आहे. तर खंडाळा साखर कारखान्याची देय बाकी २७ कोटी ४६ लाख रुपये आहे. शेतकºयांची ही रक्कम जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याने उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस आणि बगॅस आदी उत्पादनाची विक्री करून रक्कम वसूल करण्यात यावी. तसेच आवश्यकतेनुसार कारखान्याच्या जंगम स्थावर मालमत्तेची विहित पद्धतीद्वारे विक्री करून या रकमेतून ऊस देय बाकीची रक्कम ऊस पुरवठादारांना देण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाºयांना देण्यात आले होते.त्यानुसार शनिवार, दि. ७ रोजी रात्री उशिरा तहसीलदार विवेक जाधव यांनी खंडाळा साखर कारखान्याच्या साखर साठ्याची पाहणी करून त्याचा पंचनामा केला. तसेच स्टॉक रजिस्टरही सील केले. याबाबतचा अहवाल सातारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे.दोन्हीकडे साठा २४५ कोटींचा !किसन वीर साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांना २०१७-१८ सालातील द्यावयाची थकीत रक्कम सुमारे ७१ कोटी आहे. साखर साठ्याचा पंचनामा केला तेव्हा या ठिकाणी सुमारे ५ लाख ४९ हजार क्विंटल साखर तसेच १६५० मेट्रिक टन मोलॅसिस असल्याचे आढळून आले. बाजार भावाप्रमाणे याची किमत सुमारे किमान १६५ कोटींपेक्षाही अधिक असू शकते.खंडाळा साखर कारखान्याकडेही सुमारे २७ कोटींची थकबाकी असून, कारखानास्थळावर पंचनामा केलेला साठा २ लाख ८१ हजार क्विंटल आहे. बाजार भावानुसार किंमत किमान ८० कोटी होऊ शकते. दोन्हीकडील साखरेची किंमत सुमारे २४५ कोटी होते.