शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

व्रतस्थ ज्ञानयोग्याला रयतेचे अभिवादन

By admin | Updated: September 22, 2015 23:30 IST

कर्मवीर जयंती : सातारा शहरातून भव्य शोभायात्रा; विविध विद्यालयांचा सहभाग

सातारा : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त सातारा शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. कर्मवीर समाधीस अभिवादन करुन सुरू झालेल्या शोभायात्रेत चित्ररथ, कर्मवीरांचे तैलचित्र, देखाव्यासह रयत शिक्षण संस्थेच्या स्थानिक शाखांचे शिक्षक, सेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची कवाडे खुली करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कर्मवीर अण्णांचे मोठे योगदान आहे. बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाची संधी मिळाली तरच महाराष्ट्राचा विकास होऊ शकेल, हे जाणून त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कर्मवीरांनी लावलेल्या शिक्षणाच्या रोपट्याचा वटवृक्ष आज चांगलाच बहरला आहे. म्हणूनच त्यांच्या कार्यातून ऊर्जा मिळावी,यासाठी दरवर्षी दि. २२ सप्टेंबर रोजी कर्मवीरांची जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.सातारा शहरातील संस्थेच्या स्थानिक शाखांच्या वतीने आज मंगळवारी सकाळी साडेसात वाजता कर्मवीरांच्या समाधीला रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सचिव प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, सहसचिव (उच्च शिक्षण) प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील, सहसचिव (माध्यमिक शिक्षण) उत्तमराव अवारी, आॅडिटर प्राचार्य शहाजी डोंगरे, कर्मवीर परिवारातील सदस्य, शिक्षक, सेवक, विद्यार्थी यांनी अभिवादन केले. यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेटने कर्मवीरांना मानवंदना दिली. त्यानंतर शोभायात्रेला प्रारंभ झाला. यात स्थानिक शाखांनी कर्मवीरांच्या जीवनकार्यावर आधारित कर्मवीरांचे तैलचित्र रथ सहभागी झाले होते. संस्थेच्या कर्जत येथील पॅरामिल्ट्री स्कूलचे पथक, सिनिअर-ज्युनिअर एन.सी.सी. पथक, झांज पथक, लेझिम पथक, वाद्यवृंद सहभागी झाले होते. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील की जय, रयत शिक्षण संस्थेचा विजय असो, भारत माता की जय, कर्मवीर भाऊराव पाटील अमर रहे अशा घोषणांनी वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. शोभायात्रेदरम्यान शहरातील थोर महापुरुषांच्या पुतळ्यांना संस्थेच्या पदाधिकारी, मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. शोभायात्रेदरम्यान शहरातील विविध संस्था, मंडळे, नागरिकांकडून कर्मवीरांच्या प्रतिमेस अभिवादन केले गेले. (प्रतिनिधी)२८ रोजी राज्यपाल साताऱ्यातदि रयत सेवक कॉ-आॅप बँकेच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय आणि आर्यांग्ल हॉस्पिटल येथील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. या निमित्तांनी कर्मवीर जयंतीचा मुख्य कार्यक्रम सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता राज्यपाल सी. विद्यासागर राव, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थित होणार आहे.