शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

वडीच्या शेतकऱ्याने घेतले आल्याचे विक्रमी उत्पादन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औंध : दुष्काळी तालुका म्हणून ओळख असणाऱ्या खटाव तालुक्यातील वडी येथील शेतकऱ्याने आपल्या ५० गुंठे क्षेत्रात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

औंध : दुष्काळी तालुका म्हणून ओळख असणाऱ्या खटाव तालुक्यातील वडी येथील शेतकऱ्याने आपल्या ५० गुंठे क्षेत्रात ५१ टन म्हणजे आले पिकाच्या बागेत १०२ गाडी एवढे विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यांच्या या विक्रमी उत्पादनाची परिसरात चर्चा सुरू आहे.

वडी येथील वसंत रामचंद्र यादव यांनी १० मे २०२० रोजी ५० गुंठे क्षेत्रात आल्याची लागण केली. ५० गुंठ्यांत त्यांनी १५ ट्रेलर शेणखत, १६ टन मळी टाकली. उन्हाळ्यात नांगरट करून रोटर मारून बेड सोडले. त्यानंतर डबल रोटर मारून बेड सोडून ठिबक व्यवस्थापन वापरून साडेचार फूट सरी सोडून लागण केली. वेळोवेळी कृषिधन ॲग्रोचे सुधीर सुरेश कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली आले पिकाची योग्य देखभाल केली. सुयोग्य नियोजनाने वेळोवेळी पिकाची मशागत, मेहनत करून मोठ्या जिद्दीने पीक आणले. कमी पाणी व सूक्ष्म नियोजन करून दुष्काळी परिस्थितीशी तोंड देऊन त्यांनी आणलेल्या पिकाचे उत्पादन पाहण्यासाठी या भागातील लोकांनी भेटी दिल्या आहेत. सद्य:स्थितीत दर कमी असूनही त्यांना उत्पादन खर्चाच्या दुप्पट पैसे मिळाले आणि विशेष म्हणजे चार महिने अगोदरच पीक काढूनही त्यांना विक्रमी उत्पादन मिळाले. वडी येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने १५ ऑगस्ट रोजी दिल्या जाणाऱ्या शेतीरत्न पुरस्काराचे वसंत यादव मानकरी ठरले आहेत.

कोट..

आले पीक व्यवस्थापनात वेळेला खूप महत्त्व आहे. कोणत्याही गोष्टीत म्हणजे भांगलण, औषध, खत, कीटकनाशके, पाणी हे योग्य वेळेतच केले पाहिजे. त्यामुळेच भरघोस उत्पन्न निघाले तसेच वेळोवेळी सुधीर कणसे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.

-वसंत यादव, शेतकरी वडी

प्रतिक्रिया २)

माझ्या सल्ल्यानुसार आले पिकावर योग्यवेळी वसंत यादव यांनी पिकाची देखभाल केल्याने चांगले उत्पन्न मिळाले. अनेकवेळा त्यांच्या प्लॉटला भेट देऊन मार्गदर्शन केले आहे.

- सुधीर कणसे, कृषिधन ॲग्रो, पुसेसावळी.

२३औंध

फोटो:-खटाव तालुक्यातील वडी येथील वसंत यादव यांचे आल्याचे पीक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. (छाया: रशिद शेख)