शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

वडीच्या शेतकऱ्याने घेतले आल्याचे विक्रमी उत्पादन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औंध : दुष्काळी तालुका म्हणून ओळख असणाऱ्या खटाव तालुक्यातील वडी येथील शेतकऱ्याने आपल्या ५० गुंठे क्षेत्रात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

औंध : दुष्काळी तालुका म्हणून ओळख असणाऱ्या खटाव तालुक्यातील वडी येथील शेतकऱ्याने आपल्या ५० गुंठे क्षेत्रात ५१ टन म्हणजे आले पिकाच्या बागेत १०२ गाडी एवढे विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यांच्या या विक्रमी उत्पादनाची परिसरात चर्चा सुरू आहे.

वडी येथील वसंत रामचंद्र यादव यांनी १० मे २०२० रोजी ५० गुंठे क्षेत्रात आल्याची लागण केली. ५० गुंठ्यांत त्यांनी १५ ट्रेलर शेणखत, १६ टन मळी टाकली. उन्हाळ्यात नांगरट करून रोटर मारून बेड सोडले. त्यानंतर डबल रोटर मारून बेड सोडून ठिबक व्यवस्थापन वापरून साडेचार फूट सरी सोडून लागण केली. वेळोवेळी कृषिधन ॲग्रोचे सुधीर सुरेश कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली आले पिकाची योग्य देखभाल केली. सुयोग्य नियोजनाने वेळोवेळी पिकाची मशागत, मेहनत करून मोठ्या जिद्दीने पीक आणले. कमी पाणी व सूक्ष्म नियोजन करून दुष्काळी परिस्थितीशी तोंड देऊन त्यांनी आणलेल्या पिकाचे उत्पादन पाहण्यासाठी या भागातील लोकांनी भेटी दिल्या आहेत. सद्य:स्थितीत दर कमी असूनही त्यांना उत्पादन खर्चाच्या दुप्पट पैसे मिळाले आणि विशेष म्हणजे चार महिने अगोदरच पीक काढूनही त्यांना विक्रमी उत्पादन मिळाले. वडी येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने १५ ऑगस्ट रोजी दिल्या जाणाऱ्या शेतीरत्न पुरस्काराचे वसंत यादव मानकरी ठरले आहेत.

कोट..

आले पीक व्यवस्थापनात वेळेला खूप महत्त्व आहे. कोणत्याही गोष्टीत म्हणजे भांगलण, औषध, खत, कीटकनाशके, पाणी हे योग्य वेळेतच केले पाहिजे. त्यामुळेच भरघोस उत्पन्न निघाले तसेच वेळोवेळी सुधीर कणसे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.

-वसंत यादव, शेतकरी वडी

प्रतिक्रिया २)

माझ्या सल्ल्यानुसार आले पिकावर योग्यवेळी वसंत यादव यांनी पिकाची देखभाल केल्याने चांगले उत्पन्न मिळाले. अनेकवेळा त्यांच्या प्लॉटला भेट देऊन मार्गदर्शन केले आहे.

- सुधीर कणसे, कृषिधन ॲग्रो, पुसेसावळी.

२३औंध

फोटो:-खटाव तालुक्यातील वडी येथील वसंत यादव यांचे आल्याचे पीक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. (छाया: रशिद शेख)