शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : आंबेनळी अपघातातील त्या मृतांचे साहित्य नातेवाईकांना परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 15:25 IST

दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या ३० कर्मचाऱ्यांचा २८ जुलै २०१८ रोजी महाबळेश्वर - पोलादपूर आंबेनळी घाटात खोल दरीत बस कोसळून मृत्यू झाला होता. अपघातस्थळी त्या ३० कर्मचाऱ्यांचे सापडलेले साहित्य पोलादपूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तथा या घटनेचे तपासिक अंमलदार प्रकाश पवार यांनी मृतांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केले.

ठळक मुद्देआंबेनळी अपघातातील त्या मृतांचे साहित्य नातेवाईकांना परतसाहित्य घेताना अनेकांचे अश्रू दाटले, दापोली कृषी विद्यापीठात उपस्थिती

दापोली : दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या ३० कर्मचाऱ्यांचा २८ जुलै २०१८ रोजी महाबळेश्वर - पोलादपूर आंबेनळी घाटात खोल दरीत बस कोसळून मृत्यू झाला होता. अपघातस्थळी त्या ३० कर्मचाऱ्यांचे सापडलेले साहित्य पोलादपूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तथा या घटनेचे तपासिक अंमलदार प्रकाश पवार यांनी मृतांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केले.मोबाईल, बॅग, घड्याळ, एटीएम कार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सोन्याचे दागिने, रोख रक्कम आढळली होती. पंचनाम्यादरम्यान वस्तूंची ओळख पटवून त्यांची यादी तयार करण्यात आली होती. ही यादी पूर्ण झाल्यानंतर गुरुवार, १६ आॅगस्ट रोजी सायंकाळी मृत कर्मचाऱ्यांचे साहित्य, पंचनामे, शवविच्छेदन अहवालाची प्रत नातेवाईकांना देण्यात आली.तपासिक अंमलदार पवार दापोलीत आले होते. दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे प्रशासकीय इमारतीत मृतांच्या पत्नी व नातेवाईकांना बोलावण्यात आले होते. काही पालक विद्यापीठात पोहोचू शकली नाहीत. अशा कर्मचाºयांच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन वस्तू देण्यात आल्या आहेत. काही मोबाईलच्या माध्यमातून या अपघाताचे गूढ उकलण्याची शक्यता आहे.अपघातस्थळावरून सापडलेल्या काही वस्तू नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. परंतु, सोन्याचे काही दागिने गायब झाले असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या वस्तूंचाही शोध सुरू आहे. नेमका अपघात कशामुळे झाला व गाडी कोण चालवत होते. याचे गूढ कायम असून, याबाबत तपास सुरु आहे.वस्तू पाहताच आठवणी दाटल्याकर्मचाऱ्यांचे साहित्य घेताना अनेकांनी अश्रूला वाट मोकळी करून दिली. आई, वडील, पत्नी, भाऊ, बहीण जवळच्या नातेवाईकांना बोलावण्यात आले होते. त्या कर्मचाऱ्यांच्या पत्नीने जड अंत:करणाने घटनास्थळी सापडलेल्या वस्तू ताब्यात घेतल्या. परंतु, या वस्तूमुळे आठवणी ताज्या होऊन अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.घड्याळांची टिक टिक थांबली...घड्याळांची टिक टिक ११ वाजून १७ मिनिटांनी किंवा ११ वाजून १६ मिनिटांनीच बंद पडल्याचे तपासादरम्याने सापडलेल्या घड्याळांवरून दिसत आहे. तपासादरम्याने सापडलेली ही घड्याळे सव्वा अकरानंतर बंद पडल्यामुळे अपघात अंदाजे ११ वाजल्यानंतर झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.अजूनही दु:खाचे सावट कायमआंबेनळी दुर्घटनेला २१ दिवस उलटून गेले असून, मृत कर्मचाऱ्यांची कुटुंब अजूनही धक्क्यातून सावरलेली नाहीत. दापोलीवर अजूनही दु:खाचे सावट असून, या धक्क्यातून ना विद्यापीठ सावरले ना दापोलीकर! परंतु, दापोलीकरांप्रमाणेच विद्यापीठानेही मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. 

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघातRatnagiriरत्नागिरीDapoli Police Thaneदापोली पोलीस ठाणे