शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

विरळीत नवदाम्पत्याच्या हस्ते वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:26 IST

वरकुटे-मलवडी : दुष्काळी आणि डोंगराळ भागातील विरळी (ता. माण) येथील विरळीतील धुळा विष्णू गोरड यांनी लग्न झाल्यावर तत्काळ नववधू ...

वरकुटे-मलवडी : दुष्काळी आणि डोंगराळ भागातील विरळी (ता. माण) येथील विरळीतील धुळा विष्णू गोरड यांनी लग्न झाल्यावर तत्काळ नववधू व वऱ्हाडी मंडळींसह धुळोबा मंदिरासमोरील परिसरात वृक्षारोपण करून निसर्गाचा आशीर्वाद घेऊन नवीन पिढीला वेगळाच आदर्श घालून दिला. त्याबद्दल परिसरातून वधुवरांचे कौतुक होत आहे.

कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचे महत्त्व लक्षात घेऊन, कायम दुष्काळ व पाणीटंचाईच्या माण तालुक्यातील डोंगराळ आणि दुर्गम भागात असणाऱ्या विरळी गावचा परिसर भरपूर झाडे लावून हिरवागार करण्याचा मानस उराशी बाळगून, गावातील नागरिकांच्या प्रत्येक मंगलकार्यानिमित्त झाडे लावण्याची व जोपासण्याची मोहीम सरपंच प्रशांत गोरड यांनी सुरू केली आहे. बागलवाडी येथील धुळोबा मंदिराच्या सभोवताली १५० वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावून सुंदर प्रकारचे गार्डन तयार करणार असल्याची माहिती सरपंच प्रशांत गोरड यांनी दिली. याची सुरुवात बागलवाडी येथील धुळा गोरड व तेजस्विनी गोरड या नवदाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली. यावेळी उपस्थित विरळी ग्रामपंचायतीचे सरपंच सर्व सदस्य, मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

१५वरकुटे मलवडी

फोटो : विरळी बागलवाडीतील मंदिरासमोर नवदाम्पत्याने वृक्षांची लागवड केली.