शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्रीच्या डोंगररांगामधील रानमेवा यंदा लांबला...

By admin | Updated: April 7, 2015 01:17 IST

अवकाळी पाऊस : गारपीट व बदलत्या हवामानाचा परिणाम

लक्ष्मण गोरे -बामणोली  -सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील डोंगररांगामध्ये पाटण, सातारा, जावळी व महाबळेश्वर तालुक्यांच्या पश्चिम घाटमाथ्यावर दरवर्षी, तोरणे आंबुळगी, करवंदे, जांभळे, आळू, फणस, आंबा हा डोंगरातील रानमेवा दरवर्षी मार्च महिन्यापासून मे-जून पर्यंत हा रानमेवा मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो; परंतु चालूवर्षी अनेकवेळा झालेला अवकाळी पाऊस, गारपीट व बदलत्या हवामानाचा विपरीत परिणाम या रानातील फळपिकांवर झाला आहे. यामुळे रानमेवा विकून पोटापाण्याचा प्रश्न भागविणारे अनेक गरीब शेतकरी हवालदिल झाले आहेत.दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यांत वेलीवर झुडपात येणारी ‘आंबुळगी’ ही फळे पिकण्यास सुरुवात होते. या फळानंतर तोरणे, जांभळे, आळू, करवंदे, फणस व आंबे या पिकांचा क्रमाने हंगाम सुरू होतो. परंतू सध्या एप्रिल महिन्याचा एक सप्ताह संपला तेव्हा आता ‘आंबुळगी’ पिकण्यास सुरुवात झाली आहे. अवकाळी पावसाने अनेक फळांचा मोहोर व फुले गळून गेल्याने गतवर्षीच्या तुलनेत ही सर्व फळे कमी प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. ‘तोरणे’ हे काटेरी झुडपाला येणारे एक बीज फळही अजून पिकण्यास सुरुवात झाली नाही. हे फळ पांढऱ्या रंगाचे चवीला गोड व साधारण तुरट असे असते. फळाचा आकार लहान मण्यांएवढा असते. याचप्रमाणे करवंदे व जांभळे या पिकांचीही अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी कच्ची करवंदे व जांभळे तयार झाली आहेत. तर अनेक करवंदी या काटेरी झुडपांना व जांभळांच्या झाडांना मोहोर आला आहे. यामुळे यावर्षी सुमारे एक ते दोन महिने या फळांचा हंगाम उशिराने सुरू होणार आहे. यंदा उशिराने सुरू होणाऱ्या ‘रानमेव्या’मुळे अनेक गरीब शेतकऱ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण पाटण तालुक्याच्या कोयनानगर, हेळवाक व नवजा तसेच सातारा तालुक्यातील ठोसेघर, परळी भाग जावळी तालुक्याचा कास-बामणोली विभाग व महाबळेश्वर तालुक्याचा तापोळा, प्रतापगड या विभागातील हजारो शेतकरी आंबुळगी, तोरणे, करवंदे यांच्या पाट्या भरून डोक्यावरून सातारा शहर व परिसरातील बाजारपेठेत विकतात व पावसाळ्यासाठीचा बाजारहाट खरेदी करतात. अनेक गरीब शेतकरी कुटुंबे यातून हजारो रुपयांची आर्थिक उलाढाल करत असतात; परंतु सध्या फक्त आंबुळगी या फळांचा हंगाम सुरू झाला आहे. आणि फळे कमी प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.रानमेवा तयार होऊन पिकण्याचा हंगामदरवर्षी फेबु्रवारी महिन्यात ‘आंबुळगी’ हे एकबीज फळ वेलीवर पिकून तयार होते. याचा हंगाम महिनाभर चालतो. कास पठार परिसर उंचावर हे फळ मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. या फळानंतर ‘तोरणे’ हे एकबीज पांढरे फळ मार्च महिन्यात काटेरी झुडपाला येते हे. तुरट व चवीने गोड फळ आहे. यानंतर जांभळे, करवंदे, आंबे, आळू ही पिके लागोपाठ एप्रिल-मे महिन्यांत तयार होतात.मागीलवर्षी फेबु्रवारी महिन्यात आम्ही बारा दिवस आंबुळगी व मार्च महिन्यात १६ दिवस तोरणे पाटीभरून नेऊन सातारला विक्री केली होती; परंतु यावर्षी अजून तोरणे पिकण्यास सुरुवातही नाही. आंबुळगी गेल्या आठवड्यापासून पिकण्यास आताच सुरुवात झाली आहे. तसेच यावर्षी फळेही कमी असल्याने जमा करण्यास व विकण्यासही वेळ होत आहे. यामुळे आम्हाला दुसरा व्यवसाय व मोलमजुरी करावी लागत आहे.-शंकर साळुंखे, शेतकरी, भोंबवली, ता. सातारा