शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

सह्याद्रीच्या डोंगररांगामधील रानमेवा यंदा लांबला...

By admin | Updated: April 7, 2015 01:17 IST

अवकाळी पाऊस : गारपीट व बदलत्या हवामानाचा परिणाम

लक्ष्मण गोरे -बामणोली  -सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील डोंगररांगामध्ये पाटण, सातारा, जावळी व महाबळेश्वर तालुक्यांच्या पश्चिम घाटमाथ्यावर दरवर्षी, तोरणे आंबुळगी, करवंदे, जांभळे, आळू, फणस, आंबा हा डोंगरातील रानमेवा दरवर्षी मार्च महिन्यापासून मे-जून पर्यंत हा रानमेवा मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो; परंतु चालूवर्षी अनेकवेळा झालेला अवकाळी पाऊस, गारपीट व बदलत्या हवामानाचा विपरीत परिणाम या रानातील फळपिकांवर झाला आहे. यामुळे रानमेवा विकून पोटापाण्याचा प्रश्न भागविणारे अनेक गरीब शेतकरी हवालदिल झाले आहेत.दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यांत वेलीवर झुडपात येणारी ‘आंबुळगी’ ही फळे पिकण्यास सुरुवात होते. या फळानंतर तोरणे, जांभळे, आळू, करवंदे, फणस व आंबे या पिकांचा क्रमाने हंगाम सुरू होतो. परंतू सध्या एप्रिल महिन्याचा एक सप्ताह संपला तेव्हा आता ‘आंबुळगी’ पिकण्यास सुरुवात झाली आहे. अवकाळी पावसाने अनेक फळांचा मोहोर व फुले गळून गेल्याने गतवर्षीच्या तुलनेत ही सर्व फळे कमी प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. ‘तोरणे’ हे काटेरी झुडपाला येणारे एक बीज फळही अजून पिकण्यास सुरुवात झाली नाही. हे फळ पांढऱ्या रंगाचे चवीला गोड व साधारण तुरट असे असते. फळाचा आकार लहान मण्यांएवढा असते. याचप्रमाणे करवंदे व जांभळे या पिकांचीही अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी कच्ची करवंदे व जांभळे तयार झाली आहेत. तर अनेक करवंदी या काटेरी झुडपांना व जांभळांच्या झाडांना मोहोर आला आहे. यामुळे यावर्षी सुमारे एक ते दोन महिने या फळांचा हंगाम उशिराने सुरू होणार आहे. यंदा उशिराने सुरू होणाऱ्या ‘रानमेव्या’मुळे अनेक गरीब शेतकऱ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण पाटण तालुक्याच्या कोयनानगर, हेळवाक व नवजा तसेच सातारा तालुक्यातील ठोसेघर, परळी भाग जावळी तालुक्याचा कास-बामणोली विभाग व महाबळेश्वर तालुक्याचा तापोळा, प्रतापगड या विभागातील हजारो शेतकरी आंबुळगी, तोरणे, करवंदे यांच्या पाट्या भरून डोक्यावरून सातारा शहर व परिसरातील बाजारपेठेत विकतात व पावसाळ्यासाठीचा बाजारहाट खरेदी करतात. अनेक गरीब शेतकरी कुटुंबे यातून हजारो रुपयांची आर्थिक उलाढाल करत असतात; परंतु सध्या फक्त आंबुळगी या फळांचा हंगाम सुरू झाला आहे. आणि फळे कमी प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.रानमेवा तयार होऊन पिकण्याचा हंगामदरवर्षी फेबु्रवारी महिन्यात ‘आंबुळगी’ हे एकबीज फळ वेलीवर पिकून तयार होते. याचा हंगाम महिनाभर चालतो. कास पठार परिसर उंचावर हे फळ मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. या फळानंतर ‘तोरणे’ हे एकबीज पांढरे फळ मार्च महिन्यात काटेरी झुडपाला येते हे. तुरट व चवीने गोड फळ आहे. यानंतर जांभळे, करवंदे, आंबे, आळू ही पिके लागोपाठ एप्रिल-मे महिन्यांत तयार होतात.मागीलवर्षी फेबु्रवारी महिन्यात आम्ही बारा दिवस आंबुळगी व मार्च महिन्यात १६ दिवस तोरणे पाटीभरून नेऊन सातारला विक्री केली होती; परंतु यावर्षी अजून तोरणे पिकण्यास सुरुवातही नाही. आंबुळगी गेल्या आठवड्यापासून पिकण्यास आताच सुरुवात झाली आहे. तसेच यावर्षी फळेही कमी असल्याने जमा करण्यास व विकण्यासही वेळ होत आहे. यामुळे आम्हाला दुसरा व्यवसाय व मोलमजुरी करावी लागत आहे.-शंकर साळुंखे, शेतकरी, भोंबवली, ता. सातारा