शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे

By प्रमोद सुकरे | Updated: May 4, 2025 00:26 IST

"मलाही ते १ कोटी रुपये कोठून आणले म्हणून समन्स"

प्रमोद सुकरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कराड: मलाही पोलिसांनी समन्स दिली आहे. 'त्या' प्रकरणात खंडणी देण्यासाठी तुम्ही १ कोटी रुपये कोठून आणले? हा विषय आहे. मलाही त्याचे उत्तर द्यावे लागणार आहे. मग 'त्या' महिलेशी 'ते' का बोलले? ते नेमके काय बोलले? त्यांचा तिच्याशी काय संबंध? याविषयी त्यांनाही उत्तरे द्यावीच लागणार आहेत. या सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत असे मत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. रामराजे नाईक- निंबाळकर यांना 'त्या' खंडणी प्रकरणात पोलिसांनी काढलेल्या समन्सबाबत छेडले असता ते बोलत होते.

कराड येथे शनिवारी मंत्री जयकुमार गोरे आले होते. त्यावेळी शासकीय विश्रामगृहात माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. अतुल भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, भाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र यादव, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री गोरे म्हणाले, लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवा यासाठी जल जीवन मिशन राबवण्यात आले. मात्र ते राबवण्यात अपयश आले ही वस्तुस्थिती आहे. अनेक योजना रखडलेल्या आहेत. आता त्यातील त्रुटी दूर करून त्या कशा मार्गी लावता येतील याला आम्ही प्राधान्य देत आहोत.

भांड्याला भांडे लागणार, आवाज होणार

जिल्ह्यात सुरू असणाऱ्या महापर्यटन महोत्सवाकडे राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री मकरंद पाटील आदींनी पाठ फिरवली आहे? याकडे लक्ष वेधले असता मंत्री गोरे म्हणाले, महायुती एक कुटुंब आहे व कुटुंबात भांड्याला भांडी लागतात. कधी कधी आवाज होतो. पण बाकी त्यात काही नसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस समारोपाला येणार आहेत. कदाचित तुम्हाला सगळे एकत्रित दिसतील.

निकाल लागला की निवडणुका

ग्रामविकासामध्ये महत्त्वाचा भाग असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका कधी होणार? याबाबत विचारले असता मंत्री गोरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लगेच घेण्याची इच्छा आहे. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यामुळे ते रखडले आहे. न्यायालयाचा निकाल लागला किंवा स्थगिती उठली की लगेच निवडणुका घेतल्या जातील. आम्हालाही स्थानिक कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी संधी मिळावी असे निश्चितच वाटत आहे. 

कर्तृत्ववान जिल्हाध्यक्ष मिळेल भाजपची जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रिया सध्या सुरू आहे. सातारचा अध्यक्ष कधी निश्चित होईल? यावर बोलताना मंत्री गोरे म्हणाले,आम्ही आमची मते कळवली आहेत. निरीक्षक बंद पाकिटातून आमची मते घेऊन गेले आहेत. ते लखोटे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासमोर फोडले जातील. निश्चितच लवकरात लवकर साताऱ्याला चांगला जिल्हाध्यक्ष मिळेल असे सांगणे त्यांनी पसंत केले.

टॅग्स :Jaykumar Goreजयकुमार गोरेRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकर