शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

शरद पवार असो अगर अजित पवार जिल्ह्यात 'रामराजे'च; जिल्ह्याच्या राजकारणावर पकड

By दीपक शिंदे | Updated: September 28, 2023 09:33 IST

संजीवराजेंना जिल्हाध्यक्ष करून एका दगडात मारले अनेक पक्षी : रामराजेंची जिल्ह्याच्या राजकारणावर पकड कायम

सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला सातारा जिल्हा हा कायम शरद पवारांच्या मागे भक्कम उभा राहिला. त्यांनीही जिल्ह्यातील नेत्यांना भरभरून दिले; पण या मोहात काही जण एवढे अडकले की कोणी काय दिले, याचा विसर पडून कोणाकडून काय मिळणार याचाच विचार करू लागले. शरद पवारांना सोडून अजित पवारांच्या गोटात गेलेले अनेक जण अजून काही तरी मिळविण्यासाठीच गेले हे सांगायला काही ज्योतिषाची गरज नाही. तरीही सातारा जिल्ह्यावर आपलेच राज्य असायला हवे यासाठी रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपले बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांनाच अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष केले. त्यामुळे शरद पवार असो अगर अजित पवार जिल्हा रामराजेंच्याच ताब्यात राहील याची ही तजवीजच आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची तगडी फळी सातारा जिल्ह्यात उभी केली; पण निष्ठावंत तयार करण्यात ते कमी पडले. काही जण नेतृत्वामुळे, काही जण मैत्रीमुळे तर काही जण शरद पवारांनी आतापर्यंत केेलेल्या मदतीमुळे सोबत राहिले. काहींनी मात्र मागचे पुढचे सर्व काही विसरले आणि पुढे काय होणार, असा भविष्यवेती निर्णय घेतला. भविष्यात काय होणार, हे माहिती नसले तरी अपेक्षा ठेवण्यात काय चुकीचे आहे. त्यांच्या हातात काय पडले हे सर्वांना माहिती आहेच; पण तरी देखील काही तरी नवीन प्रयोग सातारा जिल्ह्यात पाहायला मिळाला हे नक्की.

राजकारणाच्या या टप्प्यावर शरद पवार यांना थांबायला पाहिजे की नको. हा त्यांचा, त्यांच्या पक्षाचा आणि कार्यकर्त्यांचा विषय आहे. त्याचप्रमाणे कोणासोबत राहायचे हा देखील ज्याचा त्याचा विषय आहे. त्यात कोणाला सल्ला देण्याची काहीच गरज नाही; पण सातारा जिल्ह्याच्या राजकारणात आपलाच ठसा कसा राहील यासाठी रामराजे नाईक निंबाळकरांनी आपलेच बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांना अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष करून टाकले. त्याच्या चतुर राजकारणाचा हा भागही असेल. कारण, शरद पवार यांच्या सोबत असतानाही जिल्ह्यात रामराजेंना सोबत घेतल्याशिवाय काही होत नव्हते. आता अजित पवार यांच्याकडे अर्ध्या राष्ट्रवादीचे नेतृत्व गेल्यानंतरही रामराजेंना सोबत घेतल्याशिवाय काहीच होणार नाही. हे देखील स्पष्ट आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात रामराजेंनी आपली ताकद नक्कीच उभी केली.                                                                                    

दिवंगत खासदार लक्ष्मणराव पाटील यांनी आपली ताकद निर्माण केली होती. त्याचप्रमाणे आज रामराजेंनीही जिल्हा ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मग, ती जिल्हा बँक असो, फलटण नगरपालिका असो, फलटण बाजार समिती असो किंवा आपण ज्या पक्षात काम करतो तो पक्ष असो. रामराजे सध्या मध्यवर्ती भूमिकेत आहेत. आता संजीवराजे यांना जिल्हाध्यक्ष करण्यात रामराजेंची किंवा अजित पवारांची चूक झाली का तर असे अजिबात वाटत नाही. कारण संजीवराजे यांच्यासारखा कर्तबगार आणि जिल्ह्याची खडानखडा माहिती असलेला, लाघवी आणि हसतमुख चेहरा त्यांना दुसरा मिळालाच नसता. यामागे रामराजेंचा स्वार्थ असणार का तर नक्कीच असणार. त्यांना पुढील निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना चितपट करायचे आहे. त्यामुळे संजीवराजेंचा ते माढा आणि सातारा या दोन्ही ठिकाणी उपयोग करून घेणार यात शंका नाही.

आता मला काय पाहिजे काही नको...रामराजे नाईक निंबाळकर यांनी राज्याच्या राजकारणात आपला चांगला ठसा उमटविला आहे. त्यामुळे ते सतत म्हणतात. आता मला कुठे काय पाहिजे. मला सर्व काही मिळाले. मग, आहे तिथेच राहिले असते तर काय झाले असते. असा प्रश्न उपस्थित होतो. पण, त्याचे कसे आहे, वडाला आपल्या फांद्या जमिनीत पुन्हा रोवाव्या लागतात. त्या आधारासाठी असल्या तरी तोच आधार पुन्हा वटवृक्षात रूपांतरित होतो. असा आधार आणि पुन्हा त्याचा इतरांना आधार करून देण्याचे काम हे रामराजेंना करायचे होते. त्यांनी ते साध्य केले.

जयकुमार गोरे आणि रणजितसिंहांना धडा शिकवायचायआधुनिक भगीरथ म्हणून रामराजे नाईक निंबाळकर यांची दुष्काळी भागातील ओळख. ही ओळख पुसून काढण्याचे काम जयकुमार गोरे यांनी काही वर्षात केले. त्यालाच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी हातभार लावला. गेल्या टर्मलाच राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याच्या रामराजेंच्या प्रयत्नांना जयकुमार गोरेंनी खीळ घातली. त्यामुळे त्यांना अनेक दिवस ताटकळत राहावे लागले. दुष्काळी भागात आलेले पाणी हे रामराजेंमुळे कसे उशिरा आले हेच रुजविण्याचा प्रयत्न जयकुमार गोरे यांनी केला. त्यामुळे या दोघांना धडा शिकविण्याचा प्रयत्न रामराजे जिल्ह्यावर आपले वर्चस्व दाखवून देऊन करण्याच्या प्रयत्नात असतील.

टॅग्स :Ramraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकरNCPराष्ट्रवादी काँग्रेस