शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

माजी मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात चाललंय काय? दर पत्रक तरी जाहीर करा!, राजू शेट्टी यांचा टोला 

By दीपक देशमुख | Updated: April 24, 2023 15:36 IST

राजकीय वस्त्रहरणात गुंतलेल्या नेत्यांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

सातारा : बाजार समितीच्या निवडणुकीकरिता एका दाखल्यावर तहसीलदार सही करतात त्याच दाखल्यावर तो रद्द करण्यासाठी दुसऱ्यांदा सही करतात. दोन-चार दिवसांसाठी दाखले देण्याची नवीन पद्धत सुरू केली आहे काय? केली असेल तर त्याचा दर नेमका काय? दरपत्रक तरी जाहीर करा. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात हे काय चालले आहे. असे प्रकार खपवून घेणार नाही. हा मुद्दा राज्यपातळीवर नेवू, असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे नेत राजू शेट्टी यांनी केला. दरम्यान, बाजार समित्यांत चाललेले प्रकार पाहता शेतकऱ्यांना लुटणारे कत्तलखाने झाले असल्याची टिकाही त्यांनी केली.सातारा येथे बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष राजू शेळके व इतर पदाधिकारी उपस्थित होते.शेट्टी म्हणाले, सातारा बाजार समितीच्या लोकांनी नगरपालिकेच्या गाळ्यावर बेकायदा कब्जा करून गैरमार्गाने वापर होत आहे. बैलबाजाराचे आरक्षण असूनही व्यापाऱ्यांची गोडावून दिसत आहेत. बाजार समिती शेतकऱ्यांच्या विकासाची मंदिरे न ठरता शेतकऱ्यांना लुटणारे कत्तलखाने झाले आहेत. शेतकऱ्याना चांगली सेवा देण्यासाठी बाजार समिती आहे. ती राजकारणाचा अड्डा न बनता बाजार समिती शेतकऱ्यांसाठी कार्यरत राहिली पाहिजे. यासाठी चांगली भुमिका घेवून स्वाभिमानी बाजार समितीसाठी उतरली आहे. पण स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अनेक अडचणी आल्या आहेत. पण आम्ही रडणारी नव्हे तर लढणारी माणसे आहोत, असेही शेट्टी म्हणाले.

शरद पवार आठवड्याला वक्तव्य बदलतातपवारांच्या भिजलेल्या भाषणामुळे महाराष्ट्रातील शेतकरी विरघळला. मात्र त्यानंतर पुढे काय घडले हे साऱ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. दर आठवड्याला खा. शरद पवार यांची वक्तव्य बदलत राहिल्यामुळे त्यांच्या वक्तव्याला फारसा प्रतिसाद देण्याची आवश्यकता नसल्याचे शेट्टी म्हणाले.

राजकीय वस्त्रहरणात गुंतलेल्या नेत्यांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्षसध्या राज्यभर महाविकास आघाडीच्या सभा सुरू आहेत. विरोधकांनी बाजू मांडली पाहिजे पण या सभांमधून एकमेकांचे वस्त्रहरण करताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कळकळीचे मुद्दे मांडले जाताना दिसत नाहीत. बरीचशी राजकीय मंडळी ईडीने भेदरलेली असल्यामुळे एकमेकांचे वस्त्रहरण करण्यापलीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडताना दिसत नसल्याची खंत राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.

महाविकास आघाडी शासनाच्या काळात एफआरपीचे तुकडे करणारा नियमबाह्य कायदा करण्यात आला होता. तो कायदा रद्द करण्यात आल्याचा जीआर सुद्धा अद्यापही शिंदे भाजप सरकारने काढलेला नाही. यातूनच शासन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किती संवेदनशील आहे हे दिसून असल्याची टिका शेट्टी यांनी यावेळी केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी