शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

माजी मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात चाललंय काय? दर पत्रक तरी जाहीर करा!, राजू शेट्टी यांचा टोला 

By दीपक देशमुख | Updated: April 24, 2023 15:36 IST

राजकीय वस्त्रहरणात गुंतलेल्या नेत्यांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

सातारा : बाजार समितीच्या निवडणुकीकरिता एका दाखल्यावर तहसीलदार सही करतात त्याच दाखल्यावर तो रद्द करण्यासाठी दुसऱ्यांदा सही करतात. दोन-चार दिवसांसाठी दाखले देण्याची नवीन पद्धत सुरू केली आहे काय? केली असेल तर त्याचा दर नेमका काय? दरपत्रक तरी जाहीर करा. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात हे काय चालले आहे. असे प्रकार खपवून घेणार नाही. हा मुद्दा राज्यपातळीवर नेवू, असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे नेत राजू शेट्टी यांनी केला. दरम्यान, बाजार समित्यांत चाललेले प्रकार पाहता शेतकऱ्यांना लुटणारे कत्तलखाने झाले असल्याची टिकाही त्यांनी केली.सातारा येथे बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष राजू शेळके व इतर पदाधिकारी उपस्थित होते.शेट्टी म्हणाले, सातारा बाजार समितीच्या लोकांनी नगरपालिकेच्या गाळ्यावर बेकायदा कब्जा करून गैरमार्गाने वापर होत आहे. बैलबाजाराचे आरक्षण असूनही व्यापाऱ्यांची गोडावून दिसत आहेत. बाजार समिती शेतकऱ्यांच्या विकासाची मंदिरे न ठरता शेतकऱ्यांना लुटणारे कत्तलखाने झाले आहेत. शेतकऱ्याना चांगली सेवा देण्यासाठी बाजार समिती आहे. ती राजकारणाचा अड्डा न बनता बाजार समिती शेतकऱ्यांसाठी कार्यरत राहिली पाहिजे. यासाठी चांगली भुमिका घेवून स्वाभिमानी बाजार समितीसाठी उतरली आहे. पण स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अनेक अडचणी आल्या आहेत. पण आम्ही रडणारी नव्हे तर लढणारी माणसे आहोत, असेही शेट्टी म्हणाले.

शरद पवार आठवड्याला वक्तव्य बदलतातपवारांच्या भिजलेल्या भाषणामुळे महाराष्ट्रातील शेतकरी विरघळला. मात्र त्यानंतर पुढे काय घडले हे साऱ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. दर आठवड्याला खा. शरद पवार यांची वक्तव्य बदलत राहिल्यामुळे त्यांच्या वक्तव्याला फारसा प्रतिसाद देण्याची आवश्यकता नसल्याचे शेट्टी म्हणाले.

राजकीय वस्त्रहरणात गुंतलेल्या नेत्यांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्षसध्या राज्यभर महाविकास आघाडीच्या सभा सुरू आहेत. विरोधकांनी बाजू मांडली पाहिजे पण या सभांमधून एकमेकांचे वस्त्रहरण करताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कळकळीचे मुद्दे मांडले जाताना दिसत नाहीत. बरीचशी राजकीय मंडळी ईडीने भेदरलेली असल्यामुळे एकमेकांचे वस्त्रहरण करण्यापलीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडताना दिसत नसल्याची खंत राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.

महाविकास आघाडी शासनाच्या काळात एफआरपीचे तुकडे करणारा नियमबाह्य कायदा करण्यात आला होता. तो कायदा रद्द करण्यात आल्याचा जीआर सुद्धा अद्यापही शिंदे भाजप सरकारने काढलेला नाही. यातूनच शासन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किती संवेदनशील आहे हे दिसून असल्याची टिका शेट्टी यांनी यावेळी केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी