शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

‘कमळा’वर कोणते औषध फवारायचे हे ठरवावे--राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:33 AM

सातारा/कºहाड : ‘ऊसदराच्या एफआरपीबाबत हे ‘कमळा’चे सरकार शेतकºयांचा विश्वासघात करणार म्हणून आम्ही एक महिना अगोदर सांगितले होते. ते नंतर खरे झाले. आता शेतकºयांची घोर फसवणूक करणाºया भाजपच्या कमळावर कोणते तणनाशक फवारायचे हे शेतकºयांनी ठरवावे,’ असे मत स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी व्यक्त केले.‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी हे कोल्हापूर येथे ...

ठळक मुद्दे येणाऱ्या निवडणुकीत भाजप विरोधी बाकावर बसेल; हा तर ऐतिहासिक विजय

सातारा/कºहाड : ‘ऊसदराच्या एफआरपीबाबत हे ‘कमळा’चे सरकार शेतकºयांचा विश्वासघात करणार म्हणून आम्ही एक महिना अगोदर सांगितले होते. ते नंतर खरे झाले. आता शेतकºयांची घोर फसवणूक करणाºया भाजपच्या कमळावर कोणते तणनाशक फवारायचे हे शेतकºयांनी ठरवावे,’ असे मत स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी व्यक्त केले.‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी हे कोल्हापूर येथे जात असताना जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी कºहाड येथे त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी ते माध्यमप्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, अनिल घराळ, योगेश झांबरे, प्रदीप पाटील आदींसह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, ‘दूधदरवाढ आंदोलनाचे यश हे दूध उत्पादक शेतकरी बांधवांचे आहे. हा ऐतिहासिक विजय म्हणावा लागले. ‘स्वाभिमानी’च्या दूधदरवाढ आंदोलनात शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. काही शेतकºयांनी रस्त्यावर दूध ओतले. या घटनेचा सरकारमधील काही लोक निषेध करताहेत. खरंतर त्यांनी हे समजून घ्यावं की, या सरकारच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार झालाय. तो धुऊन काढण्यासाठी शेतकºयांनी रस्त्यावर दूध ओतले आहे. शेतकºयांनी जसे दूध रस्त्यावर ओतलं आहे, तसं त्याचा चांगलाही वापर केला आहे. पंढरपूरकडे जाणाºया वारकºयांना, शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांनाही शेतकºयांनी दूध वाटलं आहे. १ कोटी ३५ लाख लिटर दूध हे शेतकºयांनी चांगल्या कामासाठी वापरलं आहे.’

‘राज्यातील राज्यकर्त्यांनी रस्त्यामध्ये जो प्रचंड भ्रष्टाचार केलाय, पैसा खाल्लाय. शेतकºयांनी दुधाचे अभिषेक घालून पवित्र केलं असल्याचं म्हणावं लागेल. इशारा देऊनही सरकारने जे करायचे होते तेच केले. एका बाजूला साडेपंचवीसची एफआरपी २७५० केली. म्हणून स्वत:चीच पाठ स्वत: थोपटून घ्यायची आणि दुसºया बाजूला साडेनऊ टक्के रिकव्हरी फेस दहा टक्के करून टनाला १४५ रुपये शेतकºयांचा तोटा करायचा. कारण आत्ताची जी एफआरपी आहे. ही साडेसत्ताविसशे रुपये दहा टक्के रिकव्हरीला आहे. आणि त्यानंतरच्या रिकव्हरीला २८९ रुपये आहे. एफआरपी वाढली ती फक्त ५५ रुपये. मग अशा प्रकारे हिशोबात घोळ करून असा विश्वासघात करायचा अधिकार सरकारला कोणी दिला आहे? असा प्रश्न विचारत, हे सरकारने जाणीवपूर्वक केले आहे. हे सरकार शेतकºयांच्या विरोधी सरकार आहे. भाजपने अविश्वासाचा ठराव जिंकला तरी ते २०१९ नंतर भाजप विरोधी बाकावर छोट्या मतात बसलेला दिसेल.’शेतकºयांच्या सहभागामुळे आंदोलन यशस्वीसातारा येथील वाढे फाट्यावर खासदार राजू शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केले. सातारी कंदी पेढा भरवून त्यांचे कौतुक करण्यात आले. दरम्यान, शेतकºयांनी या आंदोलनात मोठा सहभाग नोंदविला. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुण्यासह उस्मानाबाद, औरंगाबाद जिल्ह्यांतील दूध उत्पादक शेतकºयांनी नुकसानीचा विचार न करता दूधदर आंदोलनात कायदा हातात घेऊन सहभाग नोंदविल्यानेच सरकारला नमते घेत दुधाचा दर वाढवावा लागला आहे.