शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

भावाचा खिसा कापून बहिणींनी दीड हजार; राजू शेट्टींचे सरकारवर टीकास्त्र

By नितीन काळेल | Updated: October 16, 2024 18:45 IST

निवडणुकीसाठी भुलविण्याचा प्रकार; ‘परिवर्तन महाशक्ती’ निवडणुकीत ताकदीने उतरणार 

सातारा : भावाचा खिसा कापायचा आणि बहिणींनी दीड हजारांची ओवाळणी द्यायची. निवडणुकीसाठी शासनाचा हा भुलविण्याचा प्रकार आहे. त्याचबरोबर राज्यातील प्रस्थापित दोन्ही आघाड्यांची विचारधारा एकच आहे. त्यामुळे परिवर्तन महाशक्ती ही निवडणुकीत ताकदीने उतरणार आहे, असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केला. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, जिल्हाध्यक्ष राजू शेळके आदी उपस्थित होते.राजू शेट्टी म्हणाले, विधानसभा निवडणुकीत परिवर्तन महाशक्ती सक्षम पर्याय म्हणून उभी राहणार आहे. कारण, आताची लढाई ही प्रस्थापितांविरोधातील आहे. राज्यातील २०० ते २२५ घराण्यातच सत्ता राहते. त्यांच्याकडूनच सोयीचे राजकारण होते. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्याऱ्थी या सर्वांना ताठ मानेने जगता येईल असा आमचा निवडणुकीत जाहीरनामा राहणार आहे. तसेच या निवडणुकीसाठी मराठा समाज आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्याही संपर्कात आहोत. त्यांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न आहे.समृध्दी महामार्गामुळे आमदारांचा दर ५० कोटींवर गेला. आता शक्तीपीठामुळे आमदाराचा दर किती निघेल हे बघा. पण, या महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने घेतल्या जातात. सामान्यांची थडगी बांधून विकास करतात का ? याबाबत आघाडी आणि महायुतीनेही भूमिका स्पष्ट करावी. तसेच दुसरीकडे तिजोरी जनतेसाठी उघडी केली म्हणायची. पण, चंगळवादातून गुलाम तयार करण्याचे काम सुरू आहे. बहिणीलाही दीड हजार दिले म्हणायचे अन् दुसरीकडे स्टॅंप ५०० रुपयांचा करायचा. असले धंदे सरकारने बंद करावेत, असे आव्हानही शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRaju Shettyराजू शेट्टीladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचा