शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

भावाचा खिसा कापून बहिणींनी दीड हजार; राजू शेट्टींचे सरकारवर टीकास्त्र

By नितीन काळेल | Updated: October 16, 2024 18:45 IST

निवडणुकीसाठी भुलविण्याचा प्रकार; ‘परिवर्तन महाशक्ती’ निवडणुकीत ताकदीने उतरणार 

सातारा : भावाचा खिसा कापायचा आणि बहिणींनी दीड हजारांची ओवाळणी द्यायची. निवडणुकीसाठी शासनाचा हा भुलविण्याचा प्रकार आहे. त्याचबरोबर राज्यातील प्रस्थापित दोन्ही आघाड्यांची विचारधारा एकच आहे. त्यामुळे परिवर्तन महाशक्ती ही निवडणुकीत ताकदीने उतरणार आहे, असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केला. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, जिल्हाध्यक्ष राजू शेळके आदी उपस्थित होते.राजू शेट्टी म्हणाले, विधानसभा निवडणुकीत परिवर्तन महाशक्ती सक्षम पर्याय म्हणून उभी राहणार आहे. कारण, आताची लढाई ही प्रस्थापितांविरोधातील आहे. राज्यातील २०० ते २२५ घराण्यातच सत्ता राहते. त्यांच्याकडूनच सोयीचे राजकारण होते. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्याऱ्थी या सर्वांना ताठ मानेने जगता येईल असा आमचा निवडणुकीत जाहीरनामा राहणार आहे. तसेच या निवडणुकीसाठी मराठा समाज आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्याही संपर्कात आहोत. त्यांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न आहे.समृध्दी महामार्गामुळे आमदारांचा दर ५० कोटींवर गेला. आता शक्तीपीठामुळे आमदाराचा दर किती निघेल हे बघा. पण, या महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने घेतल्या जातात. सामान्यांची थडगी बांधून विकास करतात का ? याबाबत आघाडी आणि महायुतीनेही भूमिका स्पष्ट करावी. तसेच दुसरीकडे तिजोरी जनतेसाठी उघडी केली म्हणायची. पण, चंगळवादातून गुलाम तयार करण्याचे काम सुरू आहे. बहिणीलाही दीड हजार दिले म्हणायचे अन् दुसरीकडे स्टॅंप ५०० रुपयांचा करायचा. असले धंदे सरकारने बंद करावेत, असे आव्हानही शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRaju Shettyराजू शेट्टीladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचा