शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

मी तांडव करणारा शंकर, गांधी मैदानात या; राजू शेळके यांचे आव्हान,अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार

By नितीन काळेल | Updated: April 28, 2023 19:29 IST

सत्ताधाऱ्यांनी दडपशाही आणि हुकुमशाही राबवली

सातारा : ‘बाजार समितीमुळे बाजारबुनग्यांनी आरोप केलेत. त्यांनी कागदपत्रे घेऊन गांधी मैदानात यावं. बेछुट आरोप न करता पुराव्यानिशी ते सिध्द करावे. नाहीतर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. मी भोळा नव्हे, तर तांडव करणारा शंकर आहे,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला आहे.सातारा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू शेळके यांनी बाजार समितीचे माजी सभापती विक्रम पवार यांना हा इशारा दिला. पवार यांनी शेळकेंवर निवडणूक बिनविरोधसाठी पैशाची मागणी केल्याचे म्हटले होते. त्यामुळे शेळके यांनी याचा चांगलाच समाचार घेतला.राजू शेळके म्हणाले, ‘सातारा बाजार समितीची निवडणूक ही एेतिहासिक होणार आहे. आम्ही चळवळीत आयुष्य वाहून घेतलंय. अंगावर आमच्या सोन्याची एक तारही दिसणार नाही. आमच्यावर बाजारबुनगे आरोप करतात. पण, मी विकणारा शंकर नाही, मी तांडव करतो. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी कायद्याची खरेच पदवी घेतली आहे का ? अशी शंका येते. मी त्यांना माफी देणार नाही. त्यांनी आरोप सिध्द करावा. कारण, त्यांना दलालीची सवय लागली आहे. त्यातून स्वत:चं उखळ पांढरं करत आहेत. त्यांच्याविरोधात न्यायालयात अनेक केसेस आहेत. शेतकऱ्यांची चळवळ त्यांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय. आता मोठा उठाव झाला असून जनताच मतदानातून उत्तर देईल. कारण, आता सर्जीकल स्ट्राईकच होणार आहे.बाजार समितीतील तुम्ही सत्ताधारी आहात. तुम्ही लोकांना उत्तर देण्यास बांधिल आहात. तर आम्ही जनतेशी बांधिल आहोत. आरोप सिध्द करण्यासाठी गांधी मैदानात यावे, असे आव्हानही राजू शेळके यांनी दिले आहे.भ्रष्टाचाऱ्यांना गाडणार...साताऱ्यात स्वाभिमानीचा निवडणुकीसंदर्भात मेळावा झाला. यामध्येही राजू शेळके यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. सत्ताधाऱ्यांनी दडपशाही आणि हुकुमशाही राबवली. अनेक संस्थांत भ्रष्टाचार केला. या निवडणुकीत भ्रष्टाचाऱ्यांना गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही दिला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना