शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

पश्चिम भागात पावसाचा जोर वाढू लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:38 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर पुन्हा वाढू लागला असून, बुधवारी सकाळपर्यंत कोयनेला ५१, नवजा ५६ आणि महाबळेश्वरला ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर पुन्हा वाढू लागला असून, बुधवारी सकाळपर्यंत कोयनेला ५१, नवजा ५६ आणि महाबळेश्वरला सर्वाधिक ९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणाचे दरवाजे साडेपाच फुटांवर कायम असून, त्यामूधन ३१,१६६ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे.

जिल्ह्यात मागील आठवड्यात चांगला पाऊस झाला होता. पूर्व भागापेक्षा पश्चिमेकडे जोर अधिक होता. कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वर या भागात तर बुधवारपासून शुक्रवारपर्यंत धुवाँधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे नदी, नाले एक झाले. कृष्णा, वेण्णा, कोयनासह पश्चिम भागातील अन्य नद्यांना महापूर आला. त्याचबरोबर कोयना, कण्हेर, उरमोडी, तारळी, धोम, बलकवडी या प्रमुख धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. कोयना धरणात तर एका दिवसात १६ टीएमसीवर पाणी वाढण्याचा विक्रम झाला. त्यानंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होत गेला. मागील तीन दिवसात जेमतेम पाऊस झाला. असे असतानाच पश्चिम भागात सध्या पावसाचा जोर हळूहळू वाढत चालला आहे.

बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे ५१ तर १ जूनपासून २,९६४ मिलिमीटर पाऊस झाला. नवजाला सकाळपर्यंत ५६ व यावर्षी आतापर्यंत ३,८०० मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वरला ९९ आणि जून महिन्यापासून ३,८३५ मिलिमीटर पाऊस झाला. सकाळी आठच्या सुमारास कोयना धरणात ३२,२६६ क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत होती तर धरणात ९०.८८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पायथा वीजगृहातून २,१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. त्याचबरोबर चार दिवसांपासून धरणाचे सहा दरवाजे साडेपाच फुटांवर स्थिर आहेत. दरवाजातून ३१,१६६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. कोयनेतून सर्व मिळून ३३,२६६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. हे सर्व पाणी कोयना नदीत जात असल्यामुळे कोयनेला पूर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.

.......

चौकट :

प्रमुख धरणांतील विसर्ग (सकाळी आठची आकडेवारी)

धोम धरणातून २,१७६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. तर कण्हेर २,३७६ क्युसेक, कोयना ३३,२६६, उरमोडीतून १,२३४ क्युसेक वेगाने पाणी सोडले जात होते. दरम्यान, धोम धरण ७६.३१ टक्के भरले आहे तर कण्हेर ७८.२६ टक्के, कोयना ८५.६७ टक्के आणि उरमोडी धरणात ७४.४६ टक्के पाणीसाठा झाला होता. इतर धरणांमधील पाणीसाठाही वेगाने वाढत आहे.

.................................................................