शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

नवजा, महाबळेश्वरचा पाऊस पाच हजार मिलिमीटरजवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:42 IST

सातारा : जिल्ह्यात पावसाची उघडीप कायम असून, गुरुवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक ८ मिलिमीटरची नोंद झाली, तर प्रमुख धरणांत येणाऱ्या ...

सातारा : जिल्ह्यात पावसाची उघडीप कायम असून, गुरुवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक ८ मिलिमीटरची नोंद झाली, तर प्रमुख धरणांत येणाऱ्या पाण्याची आवक एकदम कमी झाली आहे. कोयना धरणातील पाणीसाठा ९४ टीएमसीवर पोहोचला आहे. दरम्यान, नवजा आणि महाबळेश्वरचे पर्जन्यमान पाच हजार मिलिमीटरच्या उंबरठ्यावर आहे.

जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण पूर्णपणे विस्कळीत राहिले आहे. कारण, एकदम पाऊस पडणे व नंतर दडी अशीची स्थिती राहिलेली आहे. कारण, जुलै महिन्याच्या मध्यावर दमदार पाऊस कोसळला होता. पूर्व दुष्काळी भागातही चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली, तर पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली या भागांत तुफान वृष्टी झाली होती. यामुळे शेतीचे नुकसान झाले, तसेच रस्ते, पूल वाहून गेले. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. प्रमुख धरणांतही पाण्याची आवक वेगाने झाली. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणांतून पाणी सोडण्यात आले. कोयना धरणात तर मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली होती, तसेच कण्हेर, उरमोडी, धोम, बलकवडी, तारळी यासारख्या धरणांतूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून तुरळक पडत गेला. सद्य:स्थितीत पावसाची उघडीप आहे.

जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची दडी कायम आहे, तर पश्चिम भागातही उघडीप आहे. गुरुवाारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे अवघ्या एक मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर नवजाला ३ आणि महाबळेश्वरला ८ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. असे असले तरी यावर्षी जूनपासून महाबळेश्वरला सर्वाधिक ४८२० मिलिमीटर पाऊस नोंद झालेला आहे. यानंतर नवजा येथे ४६८२ आणि कोयनानगर येथे जूनपासून आतापर्यंत ३५७२ मिलिमीटर पाऊस पडला आहे. येत्या काही दिवसांत पाऊस झाल्यास नवजा आणि महाबळेश्वरचा पाऊस पाच हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडू शकतो.

चौकट :

धोम, कण्हेरमध्ये ८८ टक्क्यांवर पाणी...

जिल्ह्यात सध्या पावसाची उघडीप आहे. तरीही पश्चिम भागातील धरणांत चांगला पाणीसाठा झालेला आहे. धोम आणि कण्हेर धरणात ८८ टक्क्यांवर पाणीसाठा आहे. कोयनेत ९० टक्के, उरमोडी धरणात ८५, बलकवडी ९२, तारळी धरणात ९० टक्क्यांवर पाणीसाठा झालेला आहे.

...............................................................