शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

नवजा, महाबळेश्वरचा पाऊस पाच हजार मिलिमीटरजवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:42 IST

सातारा : जिल्ह्यात पावसाची उघडीप कायम असून, गुरुवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक ८ मिलिमीटरची नोंद झाली, तर प्रमुख धरणांत येणाऱ्या ...

सातारा : जिल्ह्यात पावसाची उघडीप कायम असून, गुरुवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक ८ मिलिमीटरची नोंद झाली, तर प्रमुख धरणांत येणाऱ्या पाण्याची आवक एकदम कमी झाली आहे. कोयना धरणातील पाणीसाठा ९४ टीएमसीवर पोहोचला आहे. दरम्यान, नवजा आणि महाबळेश्वरचे पर्जन्यमान पाच हजार मिलिमीटरच्या उंबरठ्यावर आहे.

जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण पूर्णपणे विस्कळीत राहिले आहे. कारण, एकदम पाऊस पडणे व नंतर दडी अशीची स्थिती राहिलेली आहे. कारण, जुलै महिन्याच्या मध्यावर दमदार पाऊस कोसळला होता. पूर्व दुष्काळी भागातही चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली, तर पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली या भागांत तुफान वृष्टी झाली होती. यामुळे शेतीचे नुकसान झाले, तसेच रस्ते, पूल वाहून गेले. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. प्रमुख धरणांतही पाण्याची आवक वेगाने झाली. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणांतून पाणी सोडण्यात आले. कोयना धरणात तर मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली होती, तसेच कण्हेर, उरमोडी, धोम, बलकवडी, तारळी यासारख्या धरणांतूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून तुरळक पडत गेला. सद्य:स्थितीत पावसाची उघडीप आहे.

जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची दडी कायम आहे, तर पश्चिम भागातही उघडीप आहे. गुरुवाारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे अवघ्या एक मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर नवजाला ३ आणि महाबळेश्वरला ८ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. असे असले तरी यावर्षी जूनपासून महाबळेश्वरला सर्वाधिक ४८२० मिलिमीटर पाऊस नोंद झालेला आहे. यानंतर नवजा येथे ४६८२ आणि कोयनानगर येथे जूनपासून आतापर्यंत ३५७२ मिलिमीटर पाऊस पडला आहे. येत्या काही दिवसांत पाऊस झाल्यास नवजा आणि महाबळेश्वरचा पाऊस पाच हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडू शकतो.

चौकट :

धोम, कण्हेरमध्ये ८८ टक्क्यांवर पाणी...

जिल्ह्यात सध्या पावसाची उघडीप आहे. तरीही पश्चिम भागातील धरणांत चांगला पाणीसाठा झालेला आहे. धोम आणि कण्हेर धरणात ८८ टक्क्यांवर पाणीसाठा आहे. कोयनेत ९० टक्के, उरमोडी धरणात ८५, बलकवडी ९२, तारळी धरणात ९० टक्क्यांवर पाणीसाठा झालेला आहे.

...............................................................