शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

नवजा, महाबळेश्वरचा पाऊस पाच हजार मिलिमीटरजवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:42 IST

सातारा : जिल्ह्यात पावसाची उघडीप कायम असून, गुरुवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक ८ मिलिमीटरची नोंद झाली, तर प्रमुख धरणांत येणाऱ्या ...

सातारा : जिल्ह्यात पावसाची उघडीप कायम असून, गुरुवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक ८ मिलिमीटरची नोंद झाली, तर प्रमुख धरणांत येणाऱ्या पाण्याची आवक एकदम कमी झाली आहे. कोयना धरणातील पाणीसाठा ९४ टीएमसीवर पोहोचला आहे. दरम्यान, नवजा आणि महाबळेश्वरचे पर्जन्यमान पाच हजार मिलिमीटरच्या उंबरठ्यावर आहे.

जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण पूर्णपणे विस्कळीत राहिले आहे. कारण, एकदम पाऊस पडणे व नंतर दडी अशीची स्थिती राहिलेली आहे. कारण, जुलै महिन्याच्या मध्यावर दमदार पाऊस कोसळला होता. पूर्व दुष्काळी भागातही चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली, तर पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली या भागांत तुफान वृष्टी झाली होती. यामुळे शेतीचे नुकसान झाले, तसेच रस्ते, पूल वाहून गेले. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. प्रमुख धरणांतही पाण्याची आवक वेगाने झाली. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणांतून पाणी सोडण्यात आले. कोयना धरणात तर मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली होती, तसेच कण्हेर, उरमोडी, धोम, बलकवडी, तारळी यासारख्या धरणांतूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून तुरळक पडत गेला. सद्य:स्थितीत पावसाची उघडीप आहे.

जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची दडी कायम आहे, तर पश्चिम भागातही उघडीप आहे. गुरुवाारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे अवघ्या एक मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर नवजाला ३ आणि महाबळेश्वरला ८ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. असे असले तरी यावर्षी जूनपासून महाबळेश्वरला सर्वाधिक ४८२० मिलिमीटर पाऊस नोंद झालेला आहे. यानंतर नवजा येथे ४६८२ आणि कोयनानगर येथे जूनपासून आतापर्यंत ३५७२ मिलिमीटर पाऊस पडला आहे. येत्या काही दिवसांत पाऊस झाल्यास नवजा आणि महाबळेश्वरचा पाऊस पाच हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडू शकतो.

चौकट :

धोम, कण्हेरमध्ये ८८ टक्क्यांवर पाणी...

जिल्ह्यात सध्या पावसाची उघडीप आहे. तरीही पश्चिम भागातील धरणांत चांगला पाणीसाठा झालेला आहे. धोम आणि कण्हेर धरणात ८८ टक्क्यांवर पाणीसाठा आहे. कोयनेत ९० टक्के, उरमोडी धरणात ८५, बलकवडी ९२, तारळी धरणात ९० टक्क्यांवर पाणीसाठा झालेला आहे.

...............................................................