शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

महाबळेश्वरचा पाऊस एक हजारी, सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर कमी 

By नितीन काळेल | Updated: July 5, 2023 12:36 IST

कोयना धरणातून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी महाबळेश्वरच्या पर्जन्यमानाने एक हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला आहे. नवजा येथेही आतापर्यंत ८७३ मिलीमीटरची नोंद झालेली आहे. तर कोयना धरणातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत असून बुधवारी सकाळी १५.७६ टीएमसी झाला होता.जिल्ह्यात २५ जूनपासून मान्सूनचा पाऊस सक्रिय झाला. त्यावेळी पूर्व आणि पश्चिम भागात एकाचवेळी पावसाला सुरुवात झाली. पण, पूर्व भागात अवघ्या तीन दिवसांत पावसाने उघडीप दिली. तर पश्चिम भागात जोर धरला होता. मागील आठ दिवस कोयनेसह नवजा, कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वरला दमदार पाऊस झाला. यामुळे ओढे, नाले खळाळू लागले आहेत. तसेच पावसामुळे कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी सारख्या प्रमुख धरणांतील पाणीसाठाही हळूहळू वाढू लागला. त्यामुळे पाऊस सुरू झाल्यानंतर कोयना धरणात जवळपास पाच टीएमसी पाणीसाठा वाढलेला आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे अवघा १० मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. तर नवजा येथे २२ आणि महाबळेश्वरला २५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर एक जूनपासूनचा विचार करता आतापर्यंत कोयनानगरला ६१४, नवजा येथे ८७३ मिलीमीटरची नोंद झालेली आहे. तर महाबळेश्वरला १,०११ मिलीमीटर पाऊस पडला आहे.बुधवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात ५ हजार ८६१ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणात १५.७६ टीएमसी पाणीसाठा झाला होता. पाऊस कमी झाल्याने धरणातील आवकवरही परिणाम झालेला आहे. तर तीन दिवसांपासून धरणातून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे.साताऱ्यात ढगाळ वातावरण...सातारा शहरात बुधवारी सकाळी पाऊस झाला नाही. मात्र, दुपारपर्यंत ढगाळ वातावरण कायम होते. त्यानंतर पावसाचा काही भागात शिडकावा झाला. मात्र, मागील आठ दिवसांत साताऱ्यात बुधवारी प्रथमच पावसाचे प्रमाण एकदम कमी झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानKoyana Damकोयना धरण