शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कोयनेचे दरवाजे दुसऱ्यांदा बंद; धरण भरण्यासाठी किती टीएमसी पाण्याची गरज.. वाचा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 19:35 IST

पावसाचा जोर कमी : प्रमुख सहा धरणांमधून १७ हजार क्यूसेक विसर्ग 

सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून कोयना धरणाचे दरवाजे यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा बंद करण्यात आले आहेत, तर शुक्रवारी सकाळच्या सुमारास धरणात ८६.१९ टीएमसी पाणीसाठा झाला होता. त्यामुळे धरण भरण्यासाठी अजून १९ टीएमसी पाण्याची गरज आहे. तसेच अजूनही प्रमुख सहा धरणांमधून १७ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून पाऊस सुरू आहे; पण जून महिन्याच्या मध्यानंतर खऱ्याअर्थाने पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर मागील दीड महिने पाऊस पडत आहे. यामध्ये जुलै महिन्याच्या मध्यावर पावसाचा जोर पूर्णपणे कमी झाला होता. पश्चिम भागातील कास, तापोळा, बामणोली, कोयना, नवजा आणि महाबळेश्वर परिसरातच थोडाफार पाऊस झाला.

त्यानंतर जुलैच्या उत्तरार्धात चांगला पाऊस पडला, तसेच धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, कोयना आणि उरमोडी या प्रमुख धरणक्षेत्रातही दमदार हजेरी लावली. यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात वेगाने आणि मोठी वाढ झाली; पण चार दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी होत गेले. सध्या तर धरणक्षेत्रातही पावसाची उघडझाप सुरू आहे.शुक्रवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला ३२, नवजा ३७ आणि महाबळेश्वर येथे ३५ मिलिमीटर पर्जन्यमान झाल्याची नोंद आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात १६ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते, तर धरणातील पाणीसाठा ८६.१९ टीएमसी झाला होता. धरण भरण्यासाठी अजून १९ टीएमसी पाण्याची आवक आहे.

त्यातच पावसाचा जोर कमी झाल्याने धरण व्यवस्थापनाने सहा वक्र दरवाजे पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सकाळी ११ पासून दरवाजातील विसर्ग पूर्णपणे बंद झाला आहे. सध्या पायथा वीजगृहातूनच २ हजार १०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. सातारा शहरातही रिमझिम स्वरूपात पाऊस पडतोय. सकाळपासूनच ढगाळ वातावरणाबरोबरच पावसाला सुरुवात झाली होती.प्रमुख धरणांत १२५ टीएमसी पाणीसाठा..जिल्ह्यात एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगरला ३ हजार ५१, नवजा ३ हजार ३५६ आणि महाबळेश्वर येथे ३ हजार ४८६ मिलिमीटर पाऊस झालेला आहे, तर कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या प्रमुख धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास या धरणात १२५.५१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. ८४.३८ टक्के या धरणांत पाणीसाठा झालेला आहे.