शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
5
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
6
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
7
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
8
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
9
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
10
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
11
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
12
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
13
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
14
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
15
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
16
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
17
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
18
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
19
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
20
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!

Satara: कोयनेचे दरवाजे दुसऱ्यांदा बंद; धरण भरण्यासाठी किती टीएमसी पाण्याची गरज.. वाचा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 19:35 IST

पावसाचा जोर कमी : प्रमुख सहा धरणांमधून १७ हजार क्यूसेक विसर्ग 

सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून कोयना धरणाचे दरवाजे यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा बंद करण्यात आले आहेत, तर शुक्रवारी सकाळच्या सुमारास धरणात ८६.१९ टीएमसी पाणीसाठा झाला होता. त्यामुळे धरण भरण्यासाठी अजून १९ टीएमसी पाण्याची गरज आहे. तसेच अजूनही प्रमुख सहा धरणांमधून १७ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून पाऊस सुरू आहे; पण जून महिन्याच्या मध्यानंतर खऱ्याअर्थाने पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर मागील दीड महिने पाऊस पडत आहे. यामध्ये जुलै महिन्याच्या मध्यावर पावसाचा जोर पूर्णपणे कमी झाला होता. पश्चिम भागातील कास, तापोळा, बामणोली, कोयना, नवजा आणि महाबळेश्वर परिसरातच थोडाफार पाऊस झाला.

त्यानंतर जुलैच्या उत्तरार्धात चांगला पाऊस पडला, तसेच धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, कोयना आणि उरमोडी या प्रमुख धरणक्षेत्रातही दमदार हजेरी लावली. यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात वेगाने आणि मोठी वाढ झाली; पण चार दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी होत गेले. सध्या तर धरणक्षेत्रातही पावसाची उघडझाप सुरू आहे.शुक्रवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला ३२, नवजा ३७ आणि महाबळेश्वर येथे ३५ मिलिमीटर पर्जन्यमान झाल्याची नोंद आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात १६ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते, तर धरणातील पाणीसाठा ८६.१९ टीएमसी झाला होता. धरण भरण्यासाठी अजून १९ टीएमसी पाण्याची आवक आहे.

त्यातच पावसाचा जोर कमी झाल्याने धरण व्यवस्थापनाने सहा वक्र दरवाजे पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सकाळी ११ पासून दरवाजातील विसर्ग पूर्णपणे बंद झाला आहे. सध्या पायथा वीजगृहातूनच २ हजार १०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. सातारा शहरातही रिमझिम स्वरूपात पाऊस पडतोय. सकाळपासूनच ढगाळ वातावरणाबरोबरच पावसाला सुरुवात झाली होती.प्रमुख धरणांत १२५ टीएमसी पाणीसाठा..जिल्ह्यात एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगरला ३ हजार ५१, नवजा ३ हजार ३५६ आणि महाबळेश्वर येथे ३ हजार ४८६ मिलिमीटर पाऊस झालेला आहे, तर कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या प्रमुख धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास या धरणात १२५.५१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. ८४.३८ टक्के या धरणांत पाणीसाठा झालेला आहे.