शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

Satara: कोयनेचे दरवाजे दुसऱ्यांदा बंद; धरण भरण्यासाठी किती टीएमसी पाण्याची गरज.. वाचा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 19:35 IST

पावसाचा जोर कमी : प्रमुख सहा धरणांमधून १७ हजार क्यूसेक विसर्ग 

सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून कोयना धरणाचे दरवाजे यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा बंद करण्यात आले आहेत, तर शुक्रवारी सकाळच्या सुमारास धरणात ८६.१९ टीएमसी पाणीसाठा झाला होता. त्यामुळे धरण भरण्यासाठी अजून १९ टीएमसी पाण्याची गरज आहे. तसेच अजूनही प्रमुख सहा धरणांमधून १७ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून पाऊस सुरू आहे; पण जून महिन्याच्या मध्यानंतर खऱ्याअर्थाने पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर मागील दीड महिने पाऊस पडत आहे. यामध्ये जुलै महिन्याच्या मध्यावर पावसाचा जोर पूर्णपणे कमी झाला होता. पश्चिम भागातील कास, तापोळा, बामणोली, कोयना, नवजा आणि महाबळेश्वर परिसरातच थोडाफार पाऊस झाला.

त्यानंतर जुलैच्या उत्तरार्धात चांगला पाऊस पडला, तसेच धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, कोयना आणि उरमोडी या प्रमुख धरणक्षेत्रातही दमदार हजेरी लावली. यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात वेगाने आणि मोठी वाढ झाली; पण चार दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी होत गेले. सध्या तर धरणक्षेत्रातही पावसाची उघडझाप सुरू आहे.शुक्रवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला ३२, नवजा ३७ आणि महाबळेश्वर येथे ३५ मिलिमीटर पर्जन्यमान झाल्याची नोंद आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात १६ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते, तर धरणातील पाणीसाठा ८६.१९ टीएमसी झाला होता. धरण भरण्यासाठी अजून १९ टीएमसी पाण्याची आवक आहे.

त्यातच पावसाचा जोर कमी झाल्याने धरण व्यवस्थापनाने सहा वक्र दरवाजे पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सकाळी ११ पासून दरवाजातील विसर्ग पूर्णपणे बंद झाला आहे. सध्या पायथा वीजगृहातूनच २ हजार १०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. सातारा शहरातही रिमझिम स्वरूपात पाऊस पडतोय. सकाळपासूनच ढगाळ वातावरणाबरोबरच पावसाला सुरुवात झाली होती.प्रमुख धरणांत १२५ टीएमसी पाणीसाठा..जिल्ह्यात एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगरला ३ हजार ५१, नवजा ३ हजार ३५६ आणि महाबळेश्वर येथे ३ हजार ४८६ मिलिमीटर पाऊस झालेला आहे, तर कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या प्रमुख धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास या धरणात १२५.५१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. ८४.३८ टक्के या धरणांत पाणीसाठा झालेला आहे.