शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जिल्ह्यात पावसाचा जोर कमी, कोयना वीजगृहातून विसर्ग सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 14:18 IST

Rain Satara : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात १५ दिवसांपूर्वी धुवाँधार पडणाऱ्या पावसाचा जोर सध्या कमी झाला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत कोयनेला ६४, नवजा ८१ तर महाबळेश्वरला ७६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयनेतील साठा ८७ टीएमसीवर असून पायथा वीजगृहातून विसर्ग सुरूच आहे. तसेच जिल्ह्यातील इतर काही धरणांतूनही पाणी सोडण्यात येत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात पावसाचा जोर कमी, कोयना वीजगृहातून विसर्ग सुरूचनवजाला ८१, महाबळेश्वरला ७६ मिलीमीटर पाऊस

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात १५ दिवसांपूर्वी धुवाँधार पडणाऱ्या पावसाचा जोर सध्या कमी झाला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत कोयनेला ६४, नवजा ८१ तर महाबळेश्वरला ७६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयनेतील साठा ८७ टीएमसीवर असून पायथा वीजगृहातून विसर्ग सुरूच आहे. तसेच जिल्ह्यातील इतर काही धरणांतूनही पाणी सोडण्यात येत आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील १५ दिवसांपूर्वी धुवाँधार पाऊस झाला. कोयना, नवजा, तापोळा, बामणोली आणि महाबळेश्वर भागात पावसाने रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे कोयना धरणासह अन्य प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली.

अवघ्या काही दिवसांत कोयना धरणातील पाणीसाठा ९१ टीएमसीपर्यंत पोहोचला. तर कोयनेतच २४ तासांत १६ टीएमसीवर पाणीसाठा वाढण्याचा विक्रमही झाला होता. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या पायथा वीजगृह आणि सहा दराजातून विसर्ग सुरू करण्यात आला.

सुरुवातीला धरणाचे सर्व सहा दरवाजे दहा फुटांवर उचलून कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आलेला. त्यामधून ५० हजार क्यूसेकवर वेगाने पाणी सोडण्यात येत होते. त्यानंतर पावसाचा जोर कमी होत गेला. तसा विसर्गही टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आला.

बुधवारी सकाळच्या सुमारास धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. त्यामुळे दरवाजातील विसर्ग बंद झाला आहे. मात्र, पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आलेला. गुरुवारीही वीजगृहातून विसर्ग सुरुच होता.गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास कोयना धरणात ८७.३७ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर २२७९४ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. गुरूवारी सकाळपर्यंच्या २४ तासांत कोयनानगर येथे ६४ मिलीमीटर पाऊस झाला. तर यावर्षी आतापर्यंत ३३४२ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. नवजाला ८१ आणि जूनपासून आतापर्यंत ४२६१ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तसेच महाबळेश्वरला सकाळपर्यंत ७६ आणि आतापर्यंत ४३४९ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.धरणांत गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठाधोम धरणातून नदी आणि बोगद्याद्वारे मिळून ६०० क्यूसेकने विसर्ग सुरू होता. बलकवडी धरणातून १७४० तर तारळीतून १८९९ क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू होता. दरम्यान, कण्हेर, उरमोडी या धरणातील विसर्ग बंद करण्यात आलेला आहे. सध्या धोम, कण्हेर, कोयना, उरमोडी, बलकवडी आणि तारळी या धरणांत गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. 

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान