शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

पावसाने शेतकऱ्यांमध्ये कभी खुशी कभी गम, पेरण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 13:20 IST

संपूर्ण सातारा तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. यामुळे शेतकरी राजा सुखावला असला तरी त्यांच्यामध्ये कभी खुशी कभी गम, अशी अवस्था पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देपावसाने शेतकऱ्यांमध्ये कभी खुशी कभी गम !पेरण्या खोळंबल्या; पश्चिम भागात समाधानकारक पाऊस

किडगाव : संपूर्ण सातारा तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. यामुळे शेतकरी राजा सुखावला असला तरी त्यांच्यामध्ये कभी खुशी कभी गम, अशी अवस्था पाहायला मिळत आहे.त्याला कारणही तसेच आहे. जून महिन्यात पावसाची वाट बघून शेतकरी राजा कंटाळा होता. धूळवाफेत पेरणी न केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या पावसामुळे रखडल्या आहेत.जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच अचानकपणे पाऊस सुरू झाला. गेल्या आठ दिवसांपासून पश्चिम भागात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. या पावसाने डोंगर भागातील छोटे-मोठे पाझर तलाव भरल्याने ओढ्या-नाल्यांना पूर आलेला आहे.

विहिरींच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. येत्या चार दिवसांत पावसाने उघडीप दिल्यास उरलेल्या सोयाबीन, भात तसेच भुईमूग पिकांची पेरणी करता येणार आहे. पावसाने उघडीप न दिल्यास यावर्षी सोयाबीनच्या उत्पादनात घट होऊ शकते, असे जाणकार शेतकऱ्यांचे मत आहे.

ज्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, समाधानकारक पाऊस बरसल्याने शेतकºयांचे चेहरे फुलले आहेत. मात्र, काही शेतकऱ्यांची पेरणी खोळंबल्याने त्यांचे चेहरे केविलवाणे झाल्याचे दिसत आहेत. पश्चिम भागातील लोकांना यावर्षी तरी दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही.

कण्हेर धरण परिसरात चांगला पाऊस झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. असाच पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच हे धरण पूर्ण क्षमतेने भरेल आणि पूर्वेकडील दुष्काळी पट्ट्याला या पाण्याचा वापर होऊ शकेल. पश्चिमेकडे पडणारा पाऊस पूर्वेकडील दुष्काळी भागासाठी संजीवनी ठरत आहे. नेले किडगाव, धावडशी, माळेवाडी, वेळेकामठी, कळंबे या परिसरातील शेतकरी राजा पावसामुळे सुखावलेला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर