शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
3
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
4
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
5
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
6
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
7
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
8
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
9
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
10
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
11
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
12
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
13
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
14
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
15
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
16
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
17
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
18
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
19
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
20
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने शेतकऱ्यांमध्ये कभी खुशी कभी गम, पेरण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 13:20 IST

संपूर्ण सातारा तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. यामुळे शेतकरी राजा सुखावला असला तरी त्यांच्यामध्ये कभी खुशी कभी गम, अशी अवस्था पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देपावसाने शेतकऱ्यांमध्ये कभी खुशी कभी गम !पेरण्या खोळंबल्या; पश्चिम भागात समाधानकारक पाऊस

किडगाव : संपूर्ण सातारा तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. यामुळे शेतकरी राजा सुखावला असला तरी त्यांच्यामध्ये कभी खुशी कभी गम, अशी अवस्था पाहायला मिळत आहे.त्याला कारणही तसेच आहे. जून महिन्यात पावसाची वाट बघून शेतकरी राजा कंटाळा होता. धूळवाफेत पेरणी न केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या पावसामुळे रखडल्या आहेत.जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच अचानकपणे पाऊस सुरू झाला. गेल्या आठ दिवसांपासून पश्चिम भागात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. या पावसाने डोंगर भागातील छोटे-मोठे पाझर तलाव भरल्याने ओढ्या-नाल्यांना पूर आलेला आहे.

विहिरींच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. येत्या चार दिवसांत पावसाने उघडीप दिल्यास उरलेल्या सोयाबीन, भात तसेच भुईमूग पिकांची पेरणी करता येणार आहे. पावसाने उघडीप न दिल्यास यावर्षी सोयाबीनच्या उत्पादनात घट होऊ शकते, असे जाणकार शेतकऱ्यांचे मत आहे.

ज्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, समाधानकारक पाऊस बरसल्याने शेतकºयांचे चेहरे फुलले आहेत. मात्र, काही शेतकऱ्यांची पेरणी खोळंबल्याने त्यांचे चेहरे केविलवाणे झाल्याचे दिसत आहेत. पश्चिम भागातील लोकांना यावर्षी तरी दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही.

कण्हेर धरण परिसरात चांगला पाऊस झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. असाच पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच हे धरण पूर्ण क्षमतेने भरेल आणि पूर्वेकडील दुष्काळी पट्ट्याला या पाण्याचा वापर होऊ शकेल. पश्चिमेकडे पडणारा पाऊस पूर्वेकडील दुष्काळी भागासाठी संजीवनी ठरत आहे. नेले किडगाव, धावडशी, माळेवाडी, वेळेकामठी, कळंबे या परिसरातील शेतकरी राजा पावसामुळे सुखावलेला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर