शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
3
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
4
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
5
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
6
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
7
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
8
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
9
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
10
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
14
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
15
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
16
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
17
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
18
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
19
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
20
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र

पावसाने शेतकऱ्यांमध्ये कभी खुशी कभी गम, पेरण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 13:20 IST

संपूर्ण सातारा तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. यामुळे शेतकरी राजा सुखावला असला तरी त्यांच्यामध्ये कभी खुशी कभी गम, अशी अवस्था पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देपावसाने शेतकऱ्यांमध्ये कभी खुशी कभी गम !पेरण्या खोळंबल्या; पश्चिम भागात समाधानकारक पाऊस

किडगाव : संपूर्ण सातारा तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. यामुळे शेतकरी राजा सुखावला असला तरी त्यांच्यामध्ये कभी खुशी कभी गम, अशी अवस्था पाहायला मिळत आहे.त्याला कारणही तसेच आहे. जून महिन्यात पावसाची वाट बघून शेतकरी राजा कंटाळा होता. धूळवाफेत पेरणी न केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या पावसामुळे रखडल्या आहेत.जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच अचानकपणे पाऊस सुरू झाला. गेल्या आठ दिवसांपासून पश्चिम भागात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. या पावसाने डोंगर भागातील छोटे-मोठे पाझर तलाव भरल्याने ओढ्या-नाल्यांना पूर आलेला आहे.

विहिरींच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. येत्या चार दिवसांत पावसाने उघडीप दिल्यास उरलेल्या सोयाबीन, भात तसेच भुईमूग पिकांची पेरणी करता येणार आहे. पावसाने उघडीप न दिल्यास यावर्षी सोयाबीनच्या उत्पादनात घट होऊ शकते, असे जाणकार शेतकऱ्यांचे मत आहे.

ज्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, समाधानकारक पाऊस बरसल्याने शेतकºयांचे चेहरे फुलले आहेत. मात्र, काही शेतकऱ्यांची पेरणी खोळंबल्याने त्यांचे चेहरे केविलवाणे झाल्याचे दिसत आहेत. पश्चिम भागातील लोकांना यावर्षी तरी दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही.

कण्हेर धरण परिसरात चांगला पाऊस झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. असाच पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच हे धरण पूर्ण क्षमतेने भरेल आणि पूर्वेकडील दुष्काळी पट्ट्याला या पाण्याचा वापर होऊ शकेल. पश्चिमेकडे पडणारा पाऊस पूर्वेकडील दुष्काळी भागासाठी संजीवनी ठरत आहे. नेले किडगाव, धावडशी, माळेवाडी, वेळेकामठी, कळंबे या परिसरातील शेतकरी राजा पावसामुळे सुखावलेला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर