शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

सातारा जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; नवजाला १३३ मिलिमीटरची नोंद, कोयनेतून पुन्हा विसर्ग

By नितीन काळेल | Updated: September 26, 2024 19:10 IST

वीर, कण्हेर अन् उरमोडीतूनही पाणी सोडले, पिकांचे नुकसान  

सातारा : जिल्ह्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असून पूर्व दुष्काळी भागात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. पश्चिमेकडेही जोरदार हजेरी असून २४ तासांत नवजाला १३३ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. त्यातच पावसामुळे धरणातही पाण्याची आवक वाढल्याने कोयनेसह, वीर, कण्हेर आणि उरमोडीतूनही पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.जिल्ह्यात चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढत चालला आहे. पूर्व भागात तर ढगफुटीसदृश्य पाऊस हाेत आहे. यामुळे ओढ्यांना नद्याचे स्वरुप आले आहे. तलावांतही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढू लागलाय. तसेच खरीप हंगामातील पिकांत पाणी साचून नुकसान होऊ लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. पश्चिम भागातील सातारा, जावळी, वाई, पाटण, कऱ्हाड तालुक्यातही पावसाचे प्रमाण वाढलेले आहे.गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर नवजाला १३३ आणि महाबळेश्वर येथे ७७ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. पश्चिमेकडील या पावसामुळे प्रमुख धरणांतही पाणीसाठा वाढला आहे. कोयना धरणात तर सकाळच्या सुमारास १० हजार क्यूसेकने पाण्याची आवक होत होती. त्यामुळे सायंकाळी पायथा वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू करून २ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तर सकाळच्या सुमारास धरणात १०३.६३ टीएमसी पाणीसाठा होता. ९८.४६ इतकी पाणीसाठ्याची टक्केवारी आहे.

नदीकाठावरील रहिवाशांना इशारा..सातारा-पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील वीर धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर आहे. यामुळे गुरूवारी पहाटेपासून धरणातून टप्प्याटप्प्याने पाणी विसर्ग वाढविण्यात आला. सकाळी सहाच्या सुमारास १४ हजार ७६१ क्यूसेक विसर्ग सुरू होता. सातारा तालुक्यातील कण्हेर आणि उरमोडी धरणातूनही विसर्ग सुरू झालेला आहे. यामुळे या नीरा, वेण्णा आणि उरमोडी नदीकाठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण