शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सातारा जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; नवजाला १३३ मिलिमीटरची नोंद, कोयनेतून पुन्हा विसर्ग

By नितीन काळेल | Updated: September 26, 2024 19:10 IST

वीर, कण्हेर अन् उरमोडीतूनही पाणी सोडले, पिकांचे नुकसान  

सातारा : जिल्ह्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असून पूर्व दुष्काळी भागात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. पश्चिमेकडेही जोरदार हजेरी असून २४ तासांत नवजाला १३३ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. त्यातच पावसामुळे धरणातही पाण्याची आवक वाढल्याने कोयनेसह, वीर, कण्हेर आणि उरमोडीतूनही पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.जिल्ह्यात चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढत चालला आहे. पूर्व भागात तर ढगफुटीसदृश्य पाऊस हाेत आहे. यामुळे ओढ्यांना नद्याचे स्वरुप आले आहे. तलावांतही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढू लागलाय. तसेच खरीप हंगामातील पिकांत पाणी साचून नुकसान होऊ लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. पश्चिम भागातील सातारा, जावळी, वाई, पाटण, कऱ्हाड तालुक्यातही पावसाचे प्रमाण वाढलेले आहे.गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर नवजाला १३३ आणि महाबळेश्वर येथे ७७ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. पश्चिमेकडील या पावसामुळे प्रमुख धरणांतही पाणीसाठा वाढला आहे. कोयना धरणात तर सकाळच्या सुमारास १० हजार क्यूसेकने पाण्याची आवक होत होती. त्यामुळे सायंकाळी पायथा वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू करून २ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तर सकाळच्या सुमारास धरणात १०३.६३ टीएमसी पाणीसाठा होता. ९८.४६ इतकी पाणीसाठ्याची टक्केवारी आहे.

नदीकाठावरील रहिवाशांना इशारा..सातारा-पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील वीर धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर आहे. यामुळे गुरूवारी पहाटेपासून धरणातून टप्प्याटप्प्याने पाणी विसर्ग वाढविण्यात आला. सकाळी सहाच्या सुमारास १४ हजार ७६१ क्यूसेक विसर्ग सुरू होता. सातारा तालुक्यातील कण्हेर आणि उरमोडी धरणातूनही विसर्ग सुरू झालेला आहे. यामुळे या नीरा, वेण्णा आणि उरमोडी नदीकाठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण