शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सातारा जिल्ह्यात धरणक्षेत्रात पाऊस, कोयना नव्वदीच्या उंबरठ्यावर

By नितीन काळेल | Updated: September 19, 2023 12:15 IST

महाबळेश्वरला ५५ मिलीमीटरची नोंद; यंदा पर्जन्यमान कमीच 

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरणक्षेत्रात पाऊस सुरू झाला असून २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ५३ मिलीमीटरची नोंद झाली. तर कोयना धरण उशिरा का असेना ९० टीएमसीच्या उंबरठ्यावर आले आहे. तर धरण भरण्यासाठी अजून १५ टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यासाठी आणखी काही दिवस पाऊस पडण्याची गरज आहे.जिल्ह्यात यावर्षी मान्सूनचा पाऊस उशिरा सुरू झाला. पण, जुलै महिन्यातच पश्चिम भागात धुवाॅंधार पाऊस पडला. त्यामुळे लवकरच कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या प्रमुख सहा धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. अनेक धरणे ६० टक्क्यांवर भरली. पण, आॅगस्ट महिन्यात पावसाने निराशा केली. संपूर्ण महिन्यात अत्यल्प पर्जन्यमान झाले. त्यामुळे धरणे काही भरली नाहीत. आता तर सप्टेंबर महिना अर्ध्याहून अधिक संपलेला आहे. तरीही मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. पावसाची तूट कायम आहे. तरीही मागील दोन दिवसांपासून पश्चिम भागात पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे धरणांत सावकाशपणे पाणीसाठा वाढू लागला आहे.मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे २९ तर नवजाला २२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर पश्चिम भागात सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला ५३ मिलीमीटर पडला आहे. तर एक जूनपासूनचा विचार करता सर्वाधिक पाऊस नवजा येथे ५४६३ मिलीमीटर झाला आहे. यानंतर महाबळेश्वरला ५१६३ आणि सर्वात कमी कोयनानगर येथे ३८४३ मिलीमीटर पडला आहे. त्याचबरोबर धरणक्षेत्रात पाऊस पडत असल्याने कोयनेत पाण्याची आवक वाढली आहे.

आज, सकाळच्या सुमारास ६७८७ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरण पाणीसाठा ८९.३९ टीएमसी झालेला. टक्केवारीत हे प्रमाण सुमारे ८५ इतके आहे. तर धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. त्यामुळे धरण भरण्यासाठी अजून १५ टीएमसीवर पाण्याची आवश्यकता आहे. तर धरणातून होणारा पाणी विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.

गतवर्षी १०४ टीएमसीवर पाणीसाठा..गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक होते. पश्चिमेकडेही चार महिने पावसाने हजेरी लावलेली. त्यामुळे धरणेही वेळेत भरली होती. गतवर्षी १९ सप्टेंबरला कोयना धरणात १०४.६० टीएमसी पाणीसाठा होता. यंदा अजुन ९० टीएमसीचा टप्पाही पार केलेला नाही. तर गतवर्षी आतापर्यंत कोयनेला ४४३४ मिलीमीटर पाऊस पडला होता. तर नवजाला ५३९० आणि महाबळेश्वरला ५७९० मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरणMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान