शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

पावसाने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे..! : वाई तालुक्यातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 00:27 IST

दरम्यान, सततच्या पावसामुळे रब्बी हंगामातील पेरणी लांबणीवर गेली आहे. पाऊस उघडण्याची प्रतीक्षा लागली आहे. शेतकरी वर्गातून शासन दरबारी मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देसोयाबीन, घेवड्यासह भाताचे मोठे नुकसान, पिके शेतातच कुजली

वाई : परतीच्या धुवाँधार पावसामुळे वाई तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, पिकांवरही मोठा परिणाम झाला आहे. काही ठिकाणी तर खरीप हंगामातील पिके कुजून चालली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, वरुणराजा थांब आता म्हणण्याची वेळ सर्वांवरच आली आहे. तर पावसामुळे घेवडा, सोयाबीन, उडीद, वाटाणा ही पिके शेतातच कुजलीत.

वाई तालुक्यात परतीचा जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे वरुणराजा कधी थांबतोय, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर पश्चिम भागात भात पिकांवर अतिवृष्टीचा विपरित परिणाम झालाय. कारण, शेतातील पाणीच निघत नसल्याने शेतकºयांसह सर्वांनाच अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच सततच्या पावसाने जनावरांचा चारा वाया गेलाय. परिणामी चाºयाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. तर प्रचंड पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडलेत. त्यातूनच वाहनधारकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे.

सततच्या या पावसामुळे खरीप हंगामातील कोरडवाहू जमिनीतील पिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. असे असलेतरीही भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजाला डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आलीय. बियाण्यांसह खते, रोजंदारीसाठी झालेला हजारो रुपये खर्चही निघणे अवघड असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात बसणार आहे. परिणामी वाई तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे.

पाऊस उघडण्याचे नावच घेत नसल्याने खरीप हंगाम पूर्ण वाया गेलाय. घेवडा, सोयाबीन, उडीद, वाटाणा ही पिके शेतातच कुजल्याने त्याचा उत्पन्नावर परिणाम झाला आहे. तर काही पिकांची वाढच झाली नाही. ज्या ठिकाणी पेरणी उशिरा झाली आहे ते पीक उगवलेच नाही, आता कृषी विभागाने त्वरित पंचनामे करून शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. तालुक्यातील काही भागात स्ट्रॉबेरी घेतली जाते. याचेही मोठे नुकसान झाले आहे.औंध भागातील शेतकºयांवर अस्मानी संकटऔंध : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे औंध भागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बटाटा, वाटाणा, घेवडा, मूग, भुईमूग आदी पिके हातातून जाण्याच्या मार्गावर आहेत. तसेच अनेक ठिकाणी पिकात पाणी असून, पंचनाम्याची मागणी होत आहे.खटाव तालुक्यातील व विशेषत: औंध भागातील शेतकºयांचे प्रमुख नगदी पीक बटाटा म्हणून ओळखले जाते. यावर्षी सुरुवातीला पाऊस चांगला व पोषक झाल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यामुळे औंधसह जवळपास ५० गावांनी बटाटा लागण मोठ्या उत्साहात केली. गेल्यावर्षीच्या दुष्काळामुळे यंदा आपल्या कष्टाचे चीज होईल, या आशेवर असणाºया शेतकºयांना आता अतिवृष्टीमुळे मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.

सर्वसाधारणपणे एक एकर बटाटा लागणीसाठी बियाणे, खते, लागण, मजुरी यासह ३५ ते ४० हजार रुपये खर्च येतो. औंधसह परिसरात शेकडो एकराच्यावर लागण झाली आहे. आता सततचा पाऊस, ढगाळ हवामान, पीकवाढीसाठी आवश्यक असणाºया सूर्यप्रकाशाचा अभाव अशी बिकट परिस्थिती शेतकºयांसमोर आहे. त्यातच संततधार पावसामुळे शेतजमीन उपळली असून, लावलेल्या बटाटा सरीमधून पाणी वाहताना दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून शासन दरबारी मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, सततच्या पावसामुळे रब्बी हंगामातील पेरणी लांबणीवर गेली आहे. पाऊस उघडण्याची प्रतीक्षा लागली आहे.बटाटा वाया जाणार...औंध परिसरात बटाटा हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. आता गेल्या काही दिवसांपासून होत असणाºया सततच्या पावसामुळे बटाटा वाया जाणार आहे. त्यामुळे शेतक-यांनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. तसेच या पिकातून अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी