शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

पाऊस-पाण्यासाठी समदं गाव वेशीबाहेर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:17 IST

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : वरूणराजाने गावावर कृपादृष्टी ठेवावी, गाव सुजलाम-सुफलाम व्हावं अन् गावकºयांची एकी अखंड टिकून राहावी, हे साकडं देवाकडे घालण्यासाठी सर्व गावकरी गावाबाहेर आले. सहा तास सहाशे ग्रामस्थ देहभान हरपून भक्तीरसात तल्लीन झाले. एवढेच नव्हे धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्वांनी वनभोजनाचा आनंदही घेतला. फलटण तालुक्यातील कापशी गावात ...

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : वरूणराजाने गावावर कृपादृष्टी ठेवावी, गाव सुजलाम-सुफलाम व्हावं अन् गावकºयांची एकी अखंड टिकून राहावी, हे साकडं देवाकडे घालण्यासाठी सर्व गावकरी गावाबाहेर आले. सहा तास सहाशे ग्रामस्थ देहभान हरपून भक्तीरसात तल्लीन झाले. एवढेच नव्हे धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्वांनी वनभोजनाचा आनंदही घेतला. फलटण तालुक्यातील कापशी गावात ही प्रथा अनेक वर्षांपासून सुरू असून तीन वर्षांतून एकदाच श्रावण महिन्यात या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.कापशी गावची लोकसंख्या दीड हजाराच्या घरात असून, अनेक ग्रामस्थ नोकरी व व्यवसायनिमित्त बाहेरगावी राहतात. सर्व गावकरी तीन वर्षांतून एकदा श्रावण महिन्यात देवाला पावसाचे साकडे घालण्यासाठी गावाच्या सीमेवर एकत्र येतात.नियोजनानुसार रविवारी (दि. १३) सकाळी ११ वाजता ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाची पालखी वाजत-गाजत गावातून मार्गस्थ झाली. सर्व गावकरी पालखीच्या मागून गावच्या सिमेवर असलेल्या अंबाबाई मंदिरात एकत्र आले. लहान मुले, युवक व महिलांसह सुमारे सहाशे गावकरी या सोहळ्यात सहभागी झाले. मंदिरात एकत्र आल्यानंतर मानकरी रावसाहेब बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक कार्यक्रम पार पडले. यानंतर ‘पाऊस पडू दे.. शेती फुलू दे, गाव सुजलाम-सुफलाम होऊ दे, गावची एकी अखंड राहू दे’ असे साकडे गावकºयांनी देवाला घातले.हा विधी पूर्ण झाल्यानंतर ग्रामस्थांनी एकत्रितपणे वनभोजन केले. जागरण व गोंधळाचा कार्यक्रम व महाआरती झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजता ग्रामदैवताच्या पालखीसह गावकरी पुुन्हा गावाकडे मार्गस्थ झाले.वनभोजनासाठी धपाटी अन् उसळया सोहळ्यात महिलांसह घरातील प्रत्येक सदस्याने सहभाग घेतला. घरातून निघताना प्रत्येकाने सोबत जेवण घेतले होते. पूर्वी जेव्हा हा कार्यक्रम होत असे, तेव्हा गावकरी आपल्या सोबत धपाटी अन् कडधान्याची उसळ आणत असे. अनेक महिलांनी आपल्यासोबत धपाटी अन् उसळ आणून या प्रथेचे दर्शन घडविले.तिसरे पर्व तीन वर्षांनीतीन वर्षांतून एकदा श्रावण महिन्यात गावकरी सीमेवरील मंदिरात एकत्र येऊन देवाकडे सुख-समृद्धीसाठी साकडे घालतात. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही प्रथा मध्यंतरीच्या काळात बंद पडली. मात्र, ग्रामस्थांनी २०१४ पासून ती पुन्हा सुरू केली. यंदा या प्रथेचे ५त ि दुसरे पर्व होते. आता २०२० साली हा सोहळा होणार आहे.सोहळ्यासाठी लोकवर्गणीकापशी गावात तीन वर्षांतून एकदा या सोहळ्याचे आयोजन केले जाते. या सोहळ्यासाठी येणारा खर्च लोकवर्गणीतून केला जातो. गावकरी आपापल्या परिने देणगी देतात. वनभोजनाच्या काही दिवस अगोदर देवाच्या पालखीला निरा स्नान घातले जाते. यासाठी येणार खर्च त्र्यंबक बोबडे यांनी केला.