शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

पाऊस-पाण्यासाठी समदं गाव वेशीबाहेर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:17 IST

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : वरूणराजाने गावावर कृपादृष्टी ठेवावी, गाव सुजलाम-सुफलाम व्हावं अन् गावकºयांची एकी अखंड टिकून राहावी, हे साकडं देवाकडे घालण्यासाठी सर्व गावकरी गावाबाहेर आले. सहा तास सहाशे ग्रामस्थ देहभान हरपून भक्तीरसात तल्लीन झाले. एवढेच नव्हे धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्वांनी वनभोजनाचा आनंदही घेतला. फलटण तालुक्यातील कापशी गावात ...

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : वरूणराजाने गावावर कृपादृष्टी ठेवावी, गाव सुजलाम-सुफलाम व्हावं अन् गावकºयांची एकी अखंड टिकून राहावी, हे साकडं देवाकडे घालण्यासाठी सर्व गावकरी गावाबाहेर आले. सहा तास सहाशे ग्रामस्थ देहभान हरपून भक्तीरसात तल्लीन झाले. एवढेच नव्हे धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्वांनी वनभोजनाचा आनंदही घेतला. फलटण तालुक्यातील कापशी गावात ही प्रथा अनेक वर्षांपासून सुरू असून तीन वर्षांतून एकदाच श्रावण महिन्यात या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.कापशी गावची लोकसंख्या दीड हजाराच्या घरात असून, अनेक ग्रामस्थ नोकरी व व्यवसायनिमित्त बाहेरगावी राहतात. सर्व गावकरी तीन वर्षांतून एकदा श्रावण महिन्यात देवाला पावसाचे साकडे घालण्यासाठी गावाच्या सीमेवर एकत्र येतात.नियोजनानुसार रविवारी (दि. १३) सकाळी ११ वाजता ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाची पालखी वाजत-गाजत गावातून मार्गस्थ झाली. सर्व गावकरी पालखीच्या मागून गावच्या सिमेवर असलेल्या अंबाबाई मंदिरात एकत्र आले. लहान मुले, युवक व महिलांसह सुमारे सहाशे गावकरी या सोहळ्यात सहभागी झाले. मंदिरात एकत्र आल्यानंतर मानकरी रावसाहेब बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक कार्यक्रम पार पडले. यानंतर ‘पाऊस पडू दे.. शेती फुलू दे, गाव सुजलाम-सुफलाम होऊ दे, गावची एकी अखंड राहू दे’ असे साकडे गावकºयांनी देवाला घातले.हा विधी पूर्ण झाल्यानंतर ग्रामस्थांनी एकत्रितपणे वनभोजन केले. जागरण व गोंधळाचा कार्यक्रम व महाआरती झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजता ग्रामदैवताच्या पालखीसह गावकरी पुुन्हा गावाकडे मार्गस्थ झाले.वनभोजनासाठी धपाटी अन् उसळया सोहळ्यात महिलांसह घरातील प्रत्येक सदस्याने सहभाग घेतला. घरातून निघताना प्रत्येकाने सोबत जेवण घेतले होते. पूर्वी जेव्हा हा कार्यक्रम होत असे, तेव्हा गावकरी आपल्या सोबत धपाटी अन् कडधान्याची उसळ आणत असे. अनेक महिलांनी आपल्यासोबत धपाटी अन् उसळ आणून या प्रथेचे दर्शन घडविले.तिसरे पर्व तीन वर्षांनीतीन वर्षांतून एकदा श्रावण महिन्यात गावकरी सीमेवरील मंदिरात एकत्र येऊन देवाकडे सुख-समृद्धीसाठी साकडे घालतात. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही प्रथा मध्यंतरीच्या काळात बंद पडली. मात्र, ग्रामस्थांनी २०१४ पासून ती पुन्हा सुरू केली. यंदा या प्रथेचे ५त ि दुसरे पर्व होते. आता २०२० साली हा सोहळा होणार आहे.सोहळ्यासाठी लोकवर्गणीकापशी गावात तीन वर्षांतून एकदा या सोहळ्याचे आयोजन केले जाते. या सोहळ्यासाठी येणारा खर्च लोकवर्गणीतून केला जातो. गावकरी आपापल्या परिने देणगी देतात. वनभोजनाच्या काही दिवस अगोदर देवाच्या पालखीला निरा स्नान घातले जाते. यासाठी येणार खर्च त्र्यंबक बोबडे यांनी केला.