शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

पाऊस-पाण्यासाठी समदं गाव वेशीबाहेर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:17 IST

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : वरूणराजाने गावावर कृपादृष्टी ठेवावी, गाव सुजलाम-सुफलाम व्हावं अन् गावकºयांची एकी अखंड टिकून राहावी, हे साकडं देवाकडे घालण्यासाठी सर्व गावकरी गावाबाहेर आले. सहा तास सहाशे ग्रामस्थ देहभान हरपून भक्तीरसात तल्लीन झाले. एवढेच नव्हे धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्वांनी वनभोजनाचा आनंदही घेतला. फलटण तालुक्यातील कापशी गावात ...

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : वरूणराजाने गावावर कृपादृष्टी ठेवावी, गाव सुजलाम-सुफलाम व्हावं अन् गावकºयांची एकी अखंड टिकून राहावी, हे साकडं देवाकडे घालण्यासाठी सर्व गावकरी गावाबाहेर आले. सहा तास सहाशे ग्रामस्थ देहभान हरपून भक्तीरसात तल्लीन झाले. एवढेच नव्हे धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्वांनी वनभोजनाचा आनंदही घेतला. फलटण तालुक्यातील कापशी गावात ही प्रथा अनेक वर्षांपासून सुरू असून तीन वर्षांतून एकदाच श्रावण महिन्यात या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.कापशी गावची लोकसंख्या दीड हजाराच्या घरात असून, अनेक ग्रामस्थ नोकरी व व्यवसायनिमित्त बाहेरगावी राहतात. सर्व गावकरी तीन वर्षांतून एकदा श्रावण महिन्यात देवाला पावसाचे साकडे घालण्यासाठी गावाच्या सीमेवर एकत्र येतात.नियोजनानुसार रविवारी (दि. १३) सकाळी ११ वाजता ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाची पालखी वाजत-गाजत गावातून मार्गस्थ झाली. सर्व गावकरी पालखीच्या मागून गावच्या सिमेवर असलेल्या अंबाबाई मंदिरात एकत्र आले. लहान मुले, युवक व महिलांसह सुमारे सहाशे गावकरी या सोहळ्यात सहभागी झाले. मंदिरात एकत्र आल्यानंतर मानकरी रावसाहेब बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक कार्यक्रम पार पडले. यानंतर ‘पाऊस पडू दे.. शेती फुलू दे, गाव सुजलाम-सुफलाम होऊ दे, गावची एकी अखंड राहू दे’ असे साकडे गावकºयांनी देवाला घातले.हा विधी पूर्ण झाल्यानंतर ग्रामस्थांनी एकत्रितपणे वनभोजन केले. जागरण व गोंधळाचा कार्यक्रम व महाआरती झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजता ग्रामदैवताच्या पालखीसह गावकरी पुुन्हा गावाकडे मार्गस्थ झाले.वनभोजनासाठी धपाटी अन् उसळया सोहळ्यात महिलांसह घरातील प्रत्येक सदस्याने सहभाग घेतला. घरातून निघताना प्रत्येकाने सोबत जेवण घेतले होते. पूर्वी जेव्हा हा कार्यक्रम होत असे, तेव्हा गावकरी आपल्या सोबत धपाटी अन् कडधान्याची उसळ आणत असे. अनेक महिलांनी आपल्यासोबत धपाटी अन् उसळ आणून या प्रथेचे दर्शन घडविले.तिसरे पर्व तीन वर्षांनीतीन वर्षांतून एकदा श्रावण महिन्यात गावकरी सीमेवरील मंदिरात एकत्र येऊन देवाकडे सुख-समृद्धीसाठी साकडे घालतात. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही प्रथा मध्यंतरीच्या काळात बंद पडली. मात्र, ग्रामस्थांनी २०१४ पासून ती पुन्हा सुरू केली. यंदा या प्रथेचे ५त ि दुसरे पर्व होते. आता २०२० साली हा सोहळा होणार आहे.सोहळ्यासाठी लोकवर्गणीकापशी गावात तीन वर्षांतून एकदा या सोहळ्याचे आयोजन केले जाते. या सोहळ्यासाठी येणारा खर्च लोकवर्गणीतून केला जातो. गावकरी आपापल्या परिने देणगी देतात. वनभोजनाच्या काही दिवस अगोदर देवाच्या पालखीला निरा स्नान घातले जाते. यासाठी येणार खर्च त्र्यंबक बोबडे यांनी केला.