शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

राहुल गांधींचे मुद्दे जिव्हारी लागल्यानेच खासदारकी रद्द - पृथ्वीराज साठे 

By दीपक देशमुख | Updated: March 31, 2023 17:03 IST

'परदेशात देशहितासाठी जातात की अदानी कंपनीच्या मार्केटिंगसाठी'

सातारा : अदानींच्या विदेशातील कंपनीत २० हजार कोटींची गुंतवणूक झालेला पैसा कुणाचा, हा राहुल गांधींनी संसदेत केलेला प्रश्न जिव्हारी लागल्यामुळेच स्थगिती लागलेले प्रकरण पुन्हा बोर्डावर आणून गांधी यांना दोन वर्षे शिक्षा सुनावली आहे, असा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व आसामचे सहप्रभारी पृथ्वीराज साठे यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, पंतप्रधान परदेशात देशहितासाठी जातात की अदानी कंपनीचे मार्केटिंग करायला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.सातारा येथे ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. रणजितसिंह देशमुख, उदयसिंह पाटील, राजेंद्र शेलार, रजनी पवार, अजित पाटील-चिखलीकर, धनश्री महाडिक, मालन परळकर, अरबाज शेख-मोकाशी आदी उपस्थित होते.काँग्रेसच्या वतीने मोदी आणि अदानी यांच्या भागीदारीबाबत वास्तव जनतेसमोर मांडण्यासाठी काँग्रेसने देशभरात पत्रकार परिषदा आयोजित केल्याचे सांगून साठे म्हणाले, देशाच्या संरक्षण क्षेत्रातील ठेका अदानी यांच्या माेठ्या भावाच्या कंपनीकडे आहे. याच कंपनीत एका चँग चूंग लिंग या चिनी उद्योजकाचीही मोठी गुंतवणूक आहे. देशाच्या सुरक्षेसाठी ही गंभीर बाब आहे. पंतप्रधान मोदी यांनी श्रीलंकेचे, ऑस्ट्रेलियाचे दौरे केले. त्यामुळे अदानीला ठेके मिळाल्याचा आरोप साठे यांनी केला.राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये कर्नाटक निवडणुकीत सुशील मोदी व नीरव मोदींचे नाव घेऊन जे वक्तव्य केले, त्याप्रकरणी सुरत उच्च न्यायालयात खटला दाखल केला; पण फिर्यादीने यावर स्थगिती आणली होती. यानंतर राहुल गांधी यांनी २०२३ मध्ये संसदेत उपस्थित केलेले प्रश्न जिव्हारी लागले. यामुळेच २०१९ चे प्रकरण पुन्हा बोर्डावर आणले. अदानीला मोदी एवढे का पाठीशी घालत आहेत. अदानी म्हणजे देश आहे काय? सरकारची वाटचाल हुकूमशाहीकडे चालली असून, २०२४ ची निवडणूक देशातील शेवटची निवडणूक असण्याची शक्यता आता अनेक राजकीय नेत्यांना वाटू लागली असल्याचेही साठे यावेळी म्हणाले.

अदानीच्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी दबावअदानीच्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी एसबीआय कंपनीवर दबाव आणला. देशातील सर्वसामान्यांचा पैसा एलआयसीमध्ये गुंतला आहे. या कंपनीला अडचणीत आणण्याचे काम अदानी समूहात गुंतवायला भाग पाडले. यामुळे एलआयसी अडचणीत आली आहे. हिंडेनबर्गच्या पहिल्या अहवालाने इतकी दाणादाण उडाली. आता दुसरा अहवाल आल्यानंतर काय हाेईल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीGautam Adaniगौतम अदानी