शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

दुष्काळाच्या भीतीने ४४ हजार शेतकऱ्यांचा रब्बीचा पीक विमा

By नितीन काळेल | Updated: January 16, 2024 18:41 IST

शेती करणे हे जोखमीचे ठरले आहे. कारण, पिके आणि फळबागा घेतल्यानंतर विविध संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो.

सातारा : शेतकऱ्यांना शेती करताना विविध संकटाचा सामना करावा लागतो. यासाठी पीक विमा योजना राबविण्यात येत असून गेल्यावर्षीपासून तर शासनाने एक रुपयात शेतकऱ्यांना विमा देऊ केला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातही दुष्काळाच्या भीतीमुळे जिल्ह्यातील सुमारे ४४ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. विविध कारणाने पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

शेती करणे हे जोखमीचे ठरले आहे. कारण, पिके आणि फळबागा घेतल्यानंतर विविध संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग आदी कारणाने शेतीचे नुकसान झाल्यास विमा उतरविलेल्या पिके आणि फळबागांसाठी भरपाई मिळते. यासाठी पूर्वी शेतकऱ्यांना ठराविक रक्कम भरावी लागत होती. तर राज्य आणि केंद्र शासनाचाही काही वाटा यामध्ये असायचा. मात्र, गेल्यावर्षी खरीप हंगामापासून राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला. एक रुपया भरुन शेतकऱ्यांना पिकाचा विमा उतरवता येत आहे. खरीपनंतर आता रब्बी हंगामासाठीही एक रुपयात ही विमा योजना सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे.

रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा, भुईमूग, कांदा या पिकांसाठी विमा योजना राबविण्यात आली. यामधील ज्वारी, गहू, हरभरा, कांदा या पिकांची विमा योजनेची मुदत संपलेली आहे. तर उन्हाळी भुईमुगासाठी ३१ मार्चपर्यंत विमा उतरवता येणार आहे. आतापर्यंत ४५९ कर्जदार तर बिगर कर्जदार ४३ हजार ५१६ शेतकऱ्यांनी विमा उतरविलेला आहे. भुईमुगासाठी आणखी मुदत असल्याने विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे. तरीही यावर्षी रब्बीत पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा वाढलेला आहे.

अशी आहे संरक्षित रक्कम (हेक्टरी)पीक संरक्षित रक्कम

गहू बागायत ३० हजार रुपयेज्वारी बागायत २६ हजार

ज्वारी जिरायत २० हजारहरभरा             १९ हजार

उन्हाळी भुईमूग ४० हजाररब्बी कांदा ४६ हजार

२० हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित...

रब्बी हंगामात पीक विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांची संख्या यंदा वाढली आहे. यावर्षी विविध पिकांचे ११ हजार ९९१ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षणाखाली आलेले आहे. यामध्ये माण तालुक्यातील सर्वाधिक १३ हजार ५२१ हेक्टर क्षेत्र आहे. यानंतर फलटण ३ हजार ४४५, हेक्टर, खटाव १ हजार ८२६ हेक्टर आहे. तसेच माण तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी रबबी पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी