शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

दुष्काळाच्या भीतीने ४४ हजार शेतकऱ्यांचा रब्बीचा पीक विमा

By नितीन काळेल | Updated: January 16, 2024 18:41 IST

शेती करणे हे जोखमीचे ठरले आहे. कारण, पिके आणि फळबागा घेतल्यानंतर विविध संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो.

सातारा : शेतकऱ्यांना शेती करताना विविध संकटाचा सामना करावा लागतो. यासाठी पीक विमा योजना राबविण्यात येत असून गेल्यावर्षीपासून तर शासनाने एक रुपयात शेतकऱ्यांना विमा देऊ केला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातही दुष्काळाच्या भीतीमुळे जिल्ह्यातील सुमारे ४४ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. विविध कारणाने पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

शेती करणे हे जोखमीचे ठरले आहे. कारण, पिके आणि फळबागा घेतल्यानंतर विविध संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग आदी कारणाने शेतीचे नुकसान झाल्यास विमा उतरविलेल्या पिके आणि फळबागांसाठी भरपाई मिळते. यासाठी पूर्वी शेतकऱ्यांना ठराविक रक्कम भरावी लागत होती. तर राज्य आणि केंद्र शासनाचाही काही वाटा यामध्ये असायचा. मात्र, गेल्यावर्षी खरीप हंगामापासून राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला. एक रुपया भरुन शेतकऱ्यांना पिकाचा विमा उतरवता येत आहे. खरीपनंतर आता रब्बी हंगामासाठीही एक रुपयात ही विमा योजना सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे.

रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा, भुईमूग, कांदा या पिकांसाठी विमा योजना राबविण्यात आली. यामधील ज्वारी, गहू, हरभरा, कांदा या पिकांची विमा योजनेची मुदत संपलेली आहे. तर उन्हाळी भुईमुगासाठी ३१ मार्चपर्यंत विमा उतरवता येणार आहे. आतापर्यंत ४५९ कर्जदार तर बिगर कर्जदार ४३ हजार ५१६ शेतकऱ्यांनी विमा उतरविलेला आहे. भुईमुगासाठी आणखी मुदत असल्याने विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे. तरीही यावर्षी रब्बीत पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा वाढलेला आहे.

अशी आहे संरक्षित रक्कम (हेक्टरी)पीक संरक्षित रक्कम

गहू बागायत ३० हजार रुपयेज्वारी बागायत २६ हजार

ज्वारी जिरायत २० हजारहरभरा             १९ हजार

उन्हाळी भुईमूग ४० हजाररब्बी कांदा ४६ हजार

२० हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित...

रब्बी हंगामात पीक विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांची संख्या यंदा वाढली आहे. यावर्षी विविध पिकांचे ११ हजार ९९१ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षणाखाली आलेले आहे. यामध्ये माण तालुक्यातील सर्वाधिक १३ हजार ५२१ हेक्टर क्षेत्र आहे. यानंतर फलटण ३ हजार ४४५, हेक्टर, खटाव १ हजार ८२६ हेक्टर आहे. तसेच माण तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी रबबी पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी