शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

लस घेण्यासाठी पहाटे पाचला लावतायत रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:42 IST

सातारा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लस घेण्यासाठी नागरिक पहाटे पाचला लसीकरण केंद्रांवर रांगा लावत आहेत. लसीचे डोस शिल्लक असलेल्याचा ...

सातारा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लस घेण्यासाठी नागरिक पहाटे पाचला लसीकरण केंद्रांवर रांगा लावत आहेत. लसीचे डोस शिल्लक असलेल्याचा फलक तसेच लसीकरण करणाऱ्यांना देण्यात येणारे टोकण अशी सुविधा प्रशासनाने केली असली तरी लसीकरण केंद्रांवरील गर्दी काही कमी होताना दिसत नाही. डोस रोज एक हजार असले तरी गर्दी मात्र दोन हजार नागरिकांची होत आहे. त्यामुळे प्रशासनही मेटाकुटीला आले असल्याचे पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यात दीड महिन्यांपूर्वी दिवसाला २८ हजार लसीकरण होत होते. मात्र, सध्याची परिस्थिती अत्यंत दयनीय झाले असून जिल्हा प्रशासनाकडे वारंवार लसीचा तुटवडा होत आहे. मात्र, नागरिकांना लसीचा तुटवडा आहे की नाही हे समजत नाही. त्यामुळे लस मिळेल, या आशेवर लोक पहाटे पाच वाजता घरातून बाहेर पडत आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये २ केंद्र तर राजवाड्यावरील कस्तुरबा रुग्णालयामध्ये एक केंद्र सुरू करण्यात आले आहे. या तिन्ही केंद्रांवर रोज दोन ते तीन हजार लोक लसीसाठी येत आहेत. बुधवारी लसीकरण बंद होते तरीसुद्धा लोक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रावरून येऊन परत घरी गेले तर गुरुवारी संपूर्ण जिल्ह्याला ८५५० डोस मिळाले. त्यामुळे गुरुवारीही अडीच ते तीन हजार लोक जिल्हा शासकीय रुग्णालयात लसीकरणासाठी आले होते. परंतु या केंद्रावर बाराशे डोस देण्यात आले होते. बाहेर फलकांवर डोस किती शिल्लक आहेत, किती टप्प्यात लसीकरण दिवसभरात करण्यात येणार आहे, अशी सर्व माहिती लिहिण्यात आली होती. मात्र, तरीसुद्धा फलकाकडे दुर्लक्ष करून अनेकजण पहाटे पाच वाजल्यापासून रांगेमध्ये उभे होते. ज्यांना टोकन मिळाले होते, असे लोक झाडाखाली गप्पा मारत बसले होते. परंतु ज्यांना टोकन मिळाले नव्हते असे लोक रांगा लावून उभे होते. आतून अनेक कर्मचारी तुम्ही उद्या लसीसाठी या, असे सांगत होते. मात्र, नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आम्ही सकाळपासून इथे उभे आहोत. त्यामुळे आम्हाला लसीकरण करावे, अशी मागणी नागरिक करत होते.

जिल्ह्यात ४४६ लसीकरण केंद्र आहेत. मात्र, यातील गुरुवारी केवळ ५० लसीकरण केंद्रे सुरू ठेवण्यात आली होती.

चौकट :

नागरिकांचाही नाईलाज

लसीचा वारंवार तुटवडा होत असल्याने नागरिकांना लस संपेल याची धास्ती लागली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आज घरातून बाहेर आलोय तर लस घेऊनच घरी जाणार, असा ठाम निश्चय अनेकांनी केला होता; परंतु लसच नाही म्हटल्यावर त्यांचाही नाईलाज झाला.

चौकट :

सर्वाधिक सिव्हीलमधील केंद्रांवर गर्दी

जिल्ह्यामध्ये एकूण ४४६ लसीकरण केंद्र आहेत. त्यामध्ये सर्वांत जास्त गर्दीचे केंद्र म्हणून सिव्हील ओळखले जात आहे. या केंद्रावर रोज अडीच ते तीन हजार लोकांची रांग लागल्याचे पाहायला मिळते. या केंद्रामध्ये ५ डेटा ऑपरेटर, ४ परिचारिका आणि २ डॉक्टर यांच्यावरच या लसी केंद्राची मदार आहे. सकाळी नऊला केंद्र सुरू होते. सायंकाळी सात तर कधी आठ नाहीतर लस संपेपर्यंत रात्री उशिरापर्यंत सुरू राहते.

चौकट :

आरोग्य विभाग चिंतेत

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने आरोग्य विभागाने कोरोना लसीचा वेगही वाढवला आहे. त्यामुळे दिवसाला जवळपास आठ हजार डोसची गरज भासत आहे. असे असताना आता केवळ सात ते आठ हजार डोस प्रशासनाकडून येत आहेत. त्यामुळे ही लसीकरण मोहीम कशी सुरू ठेवायची, या चिंतेत आरोग्य विभाग आहे.

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाने सर्वांत जास्त भर दिला आहे तो म्हणजे लसीकरणावर. जितक्या वेगाने लसीकरण होईल तितके रुग्ण कमी होतील, असे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

चौकट :

मागणी पाच लाखांची

जिल्ह्यात लसीकरणाचा वेग पाहता आरोग्य विभागाने पाच लाख डोसची गरज असल्याची मागणी केली आहे; परंतु या मागणीनुसार सातारा जिल्ह्याला डोस उपलब्ध होत नाहीत, अशी खंतही आरोग्य अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. त्यातच प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही याचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे आणखीनच लस कमी पडत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.