शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

सावधान; यवतेश्वर घाटातून प्रवास करताय? घाटातील वाहतूक बनतीयं धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 17:08 IST

सातारा-कास मार्गावर यवतेश्वर घाटात मोठ्या प्रमाणावर संरक्षक कठडे ढासळल्याची तसेच नादुरुस्त परिस्थिती आहे. यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे.

पेट्री : सातारा-कास मार्गावर यवतेश्वर घाटात (Yavateshwar Ghat) बहुतांशी ठिकाणी संरक्षक कठड्यांची दुरवस्था झाली असून, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संरक्षक कठडे ढासळल्याची तसेच नादुरुस्त परिस्थिती आहे. त्यामुळे या घाटातील होणारी वाहतूक अधिकाधिक धोकादायक बनत चालली असून, वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे.

शहराच्या पश्चिमेस कास, बामणोली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळे असल्याने या परिसरात फिरायला जाण्यासाठी साताऱ्याहून यवतेश्वर घाटमार्गे प्रवास करावा लागतो. येथून सतत वर्षभर वाहतूक सुरू असते. तसेच कित्येक खासगी वाहने, अवजड मालाची वाहने, महाविद्यालयीन तरुण, शाळकरी मुले, नोकरदारवर्गाचीदेखील या परिसरातून सतत रहदारी असते. शनिवार, रविवार, उन्हाळी, दिवाळी सुटीत तसेच जोडून सुटी आल्यास मोठ्या प्रमाणावर यामार्गे वाहतूक सुरू असते.

दोन दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी मुसळधार पाऊस व प्रचंड धुके तर दुसरीकडे दुरवस्थेत असलेले संरक्षक कठडे अशा बिकट परिस्थितीत वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे घाटातील संरक्षक कठड्यांच्या दुरुस्तीची कामे तत्काळ करण्यात यावीत, असे वाहनचालकांतून बोलले जात आहे.

बहुतांशी ठिकाणी साधारण दहा ते बारा ठिकाणी ढासळलेले कठडे व नादुरुस्त कठड्यांची दुरुस्ती जैसे थे आहे. यामुळे संरक्षक कठड्यांची दुरुस्ती व काही ठिकाणी नव्याने बांधकाम करण्याची तसेच रात्रीच्या वेळी वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्याच्या दुतर्फा रिफ्लेक्टर बसविण्याची, सूचना फलक लावण्याची मागणी वाहनचालकांतून जोर धरत आहे.

स्टंट अन् हुल्लडबाजीचे वाढते प्रमाण !

घाटातून प्रवास करताना काहीजण स्टंट तसेच हुल्लडबाजी करताना दिसतात. कित्येक पर्यटक कठड्यांवर उभे राहून फोटो सेशन करतात; परंतु आपण उभे असलेल्या कठड्यांची परिस्थिती खालून कशी आहे. याचा अंदाज येत नाही. मधात मोडकळीस आलेल्या कठड्यांचा अंदाज न आल्यास तोल जाऊन एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही कठड्यांना झुडपांचा विळखा बसल्याने कठडे दिसत नाहीत. कोणतीही विपरित घटना घडण्याअगोदर संबंधित विभागाने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालक, पर्यटक, स्थानिकांतून होत आहे.

घाटात ठिकठिकाणी संरक्षक कठड्यांची झालेली दुरवस्था व ज्या ठिकाणी कठडेच गायब आहेत तसेच काही कठड्यांची उंची कमी आहे, अशा ठिकाणी कठड्यांची दुरुस्ती व नव्याने संरक्षक कठडे तत्काळ बांधण्यात यावेत. -आदित्य जाधव, वाहनचालक, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसर