शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

सावधान; यवतेश्वर घाटातून प्रवास करताय? घाटातील वाहतूक बनतीयं धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 17:08 IST

सातारा-कास मार्गावर यवतेश्वर घाटात मोठ्या प्रमाणावर संरक्षक कठडे ढासळल्याची तसेच नादुरुस्त परिस्थिती आहे. यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे.

पेट्री : सातारा-कास मार्गावर यवतेश्वर घाटात (Yavateshwar Ghat) बहुतांशी ठिकाणी संरक्षक कठड्यांची दुरवस्था झाली असून, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संरक्षक कठडे ढासळल्याची तसेच नादुरुस्त परिस्थिती आहे. त्यामुळे या घाटातील होणारी वाहतूक अधिकाधिक धोकादायक बनत चालली असून, वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे.

शहराच्या पश्चिमेस कास, बामणोली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळे असल्याने या परिसरात फिरायला जाण्यासाठी साताऱ्याहून यवतेश्वर घाटमार्गे प्रवास करावा लागतो. येथून सतत वर्षभर वाहतूक सुरू असते. तसेच कित्येक खासगी वाहने, अवजड मालाची वाहने, महाविद्यालयीन तरुण, शाळकरी मुले, नोकरदारवर्गाचीदेखील या परिसरातून सतत रहदारी असते. शनिवार, रविवार, उन्हाळी, दिवाळी सुटीत तसेच जोडून सुटी आल्यास मोठ्या प्रमाणावर यामार्गे वाहतूक सुरू असते.

दोन दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी मुसळधार पाऊस व प्रचंड धुके तर दुसरीकडे दुरवस्थेत असलेले संरक्षक कठडे अशा बिकट परिस्थितीत वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे घाटातील संरक्षक कठड्यांच्या दुरुस्तीची कामे तत्काळ करण्यात यावीत, असे वाहनचालकांतून बोलले जात आहे.

बहुतांशी ठिकाणी साधारण दहा ते बारा ठिकाणी ढासळलेले कठडे व नादुरुस्त कठड्यांची दुरुस्ती जैसे थे आहे. यामुळे संरक्षक कठड्यांची दुरुस्ती व काही ठिकाणी नव्याने बांधकाम करण्याची तसेच रात्रीच्या वेळी वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्याच्या दुतर्फा रिफ्लेक्टर बसविण्याची, सूचना फलक लावण्याची मागणी वाहनचालकांतून जोर धरत आहे.

स्टंट अन् हुल्लडबाजीचे वाढते प्रमाण !

घाटातून प्रवास करताना काहीजण स्टंट तसेच हुल्लडबाजी करताना दिसतात. कित्येक पर्यटक कठड्यांवर उभे राहून फोटो सेशन करतात; परंतु आपण उभे असलेल्या कठड्यांची परिस्थिती खालून कशी आहे. याचा अंदाज येत नाही. मधात मोडकळीस आलेल्या कठड्यांचा अंदाज न आल्यास तोल जाऊन एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही कठड्यांना झुडपांचा विळखा बसल्याने कठडे दिसत नाहीत. कोणतीही विपरित घटना घडण्याअगोदर संबंधित विभागाने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालक, पर्यटक, स्थानिकांतून होत आहे.

घाटात ठिकठिकाणी संरक्षक कठड्यांची झालेली दुरवस्था व ज्या ठिकाणी कठडेच गायब आहेत तसेच काही कठड्यांची उंची कमी आहे, अशा ठिकाणी कठड्यांची दुरुस्ती व नव्याने संरक्षक कठडे तत्काळ बांधण्यात यावेत. -आदित्य जाधव, वाहनचालक, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसर