शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सावधान; यवतेश्वर घाटातून प्रवास करताय? घाटातील वाहतूक बनतीयं धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 17:08 IST

सातारा-कास मार्गावर यवतेश्वर घाटात मोठ्या प्रमाणावर संरक्षक कठडे ढासळल्याची तसेच नादुरुस्त परिस्थिती आहे. यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे.

पेट्री : सातारा-कास मार्गावर यवतेश्वर घाटात (Yavateshwar Ghat) बहुतांशी ठिकाणी संरक्षक कठड्यांची दुरवस्था झाली असून, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संरक्षक कठडे ढासळल्याची तसेच नादुरुस्त परिस्थिती आहे. त्यामुळे या घाटातील होणारी वाहतूक अधिकाधिक धोकादायक बनत चालली असून, वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे.

शहराच्या पश्चिमेस कास, बामणोली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळे असल्याने या परिसरात फिरायला जाण्यासाठी साताऱ्याहून यवतेश्वर घाटमार्गे प्रवास करावा लागतो. येथून सतत वर्षभर वाहतूक सुरू असते. तसेच कित्येक खासगी वाहने, अवजड मालाची वाहने, महाविद्यालयीन तरुण, शाळकरी मुले, नोकरदारवर्गाचीदेखील या परिसरातून सतत रहदारी असते. शनिवार, रविवार, उन्हाळी, दिवाळी सुटीत तसेच जोडून सुटी आल्यास मोठ्या प्रमाणावर यामार्गे वाहतूक सुरू असते.

दोन दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी मुसळधार पाऊस व प्रचंड धुके तर दुसरीकडे दुरवस्थेत असलेले संरक्षक कठडे अशा बिकट परिस्थितीत वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे घाटातील संरक्षक कठड्यांच्या दुरुस्तीची कामे तत्काळ करण्यात यावीत, असे वाहनचालकांतून बोलले जात आहे.

बहुतांशी ठिकाणी साधारण दहा ते बारा ठिकाणी ढासळलेले कठडे व नादुरुस्त कठड्यांची दुरुस्ती जैसे थे आहे. यामुळे संरक्षक कठड्यांची दुरुस्ती व काही ठिकाणी नव्याने बांधकाम करण्याची तसेच रात्रीच्या वेळी वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्याच्या दुतर्फा रिफ्लेक्टर बसविण्याची, सूचना फलक लावण्याची मागणी वाहनचालकांतून जोर धरत आहे.

स्टंट अन् हुल्लडबाजीचे वाढते प्रमाण !

घाटातून प्रवास करताना काहीजण स्टंट तसेच हुल्लडबाजी करताना दिसतात. कित्येक पर्यटक कठड्यांवर उभे राहून फोटो सेशन करतात; परंतु आपण उभे असलेल्या कठड्यांची परिस्थिती खालून कशी आहे. याचा अंदाज येत नाही. मधात मोडकळीस आलेल्या कठड्यांचा अंदाज न आल्यास तोल जाऊन एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही कठड्यांना झुडपांचा विळखा बसल्याने कठडे दिसत नाहीत. कोणतीही विपरित घटना घडण्याअगोदर संबंधित विभागाने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालक, पर्यटक, स्थानिकांतून होत आहे.

घाटात ठिकठिकाणी संरक्षक कठड्यांची झालेली दुरवस्था व ज्या ठिकाणी कठडेच गायब आहेत तसेच काही कठड्यांची उंची कमी आहे, अशा ठिकाणी कठड्यांची दुरुस्ती व नव्याने संरक्षक कठडे तत्काळ बांधण्यात यावेत. -आदित्य जाधव, वाहनचालक, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसर