शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

जिल्ह्यात सरपंचांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:15 IST

सातारा : ग्रामपंचायत सरपंच सोडतीवर आक्षेप घेतला गेल्याने उच्च न्यायालयाने सरपंच निवडीचा कार्यक्रम थांबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ...

सातारा : ग्रामपंचायत सरपंच सोडतीवर आक्षेप घेतला गेल्याने उच्च न्यायालयाने सरपंच निवडीचा कार्यक्रम थांबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींची सरपंच निवड या आदेशामुळे लटकली आहे.

ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीसाठी नुकतीच आरक्षण सोडत पार पडली. या आरक्षण सोडतीवर राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये सदस्यांनी अक्षेप घेतला. सातारा जिल्ह्यातील अनेक सदस्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे आरक्षणाबाबत मागणी केली होती. याचिकांवर आज सुनावणी होऊन न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती विनय जोशी यांनी आपला निकाल जाहीर केला.

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ज्या ठिकाणी सरपंच आरक्षण सोडतीवर आक्षेप आहे, त्याठिकाणी सदस्यांच्या तक्रारीबाबत पुन्हा सुनावणी घेण्यात यावी. त्यानंतरच आरक्षण निश्चित करावे. तोपर्यंत सरपंचपदाच्या निवडणुका घेऊ नका, असे म्हटले आहे.

सातारा जिल्ह्यातील नुकत्याच निवडणुका झालेल्या ८७८ तसेच आगामी काळात निवडणुका होणाऱ्या उर्वरित अशा एकूण १४९५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीसाठीचा कार्यक्रम नुकताच पार पडला होता. या आरक्षण सोडतीमध्ये अनेक त्रुटी राहिल्या आहेत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका झाल्या. निवडून आलेल्या सदस्यांपैकी एकही सदस्य जाहीर केलेल्या आरक्षणात नसल्याने सरपंचपद रिक्त राहणार आहे. या पार्श्वभूमीवर सदस्यांवर अन्याय होणार असल्याने याचिका दाखल झाल्या होत्या. जिल्हा प्रशासन संपूर्ण सरपंच सोडत नव्यानेच घेते की तक्रारी असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये फेरसुनावणी घेऊन सरपंच आरक्षण सोडत जाहीर करते याबाबत उत्सुकता लागलेली आहे.

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे ८, ९ आणि १० फेब्रुवारी रोजी जाहीर केलेला कार्यक्रम होणार का याबाबतदेखील उलटसुलट चर्चा सुरू आहे. जिल्हा प्रशासनाला याबाबतचा आदेश मिळाला नाही, आदेश मिळाल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी नीता शिंदे यांनी दिली.