शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

अखेर पालकमंत्र्यांची दहा दिवसानंतर पुसेसावळीला भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 11:55 IST

पोलिस यंत्रणेने तपासाला गती द्यावी..

पुसेसावळी : खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे १० सप्टेंबर रोजी रात्री ९:३० च्या सुमारास आक्षेपार्ह पोस्टच्या कारणावरून दोन गटांतील दंगलीमध्ये मृत झालेल्या नुरूल हसन शिकलगार याच्या घरी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन केले.

जिल्ह्यात असूनही पालकमंत्र्यांनी गेले दहा दिवस पुसेसावळीला जाणे टाळले होते. अखेर काल राज्याचे उपमुख्यमंत्री पुसेसावळीत येऊन गेल्यानंतर आज पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पुसेसावळीला भेट दिली. ‘माझ्या मुलाचा काहीही दोष नसताना बळी गेला, आमचं कुटुंब पोरकं झालं, आमची दोन्ही कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत, आता आम्ही जगायचे ते कुणासाठी, अशी भावना नुरूल हसनच्या वडिलांनी पालकमंत्र्यांसमोर व्यक्त केली.जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार अजितराव जंगम, विस्तार अधिकारी नंदकिशोर माने, माजी सरपंच सुरेश पाटील, सरपंच सुरेखा माळवे, उपसरपंच डॉ. विजय कदम, उदय मावळे, मोहंमद हनीफ आदमभाई शेख आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ‘कोणत्याही परिस्थितीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सगळ्यांनी काळजी घ्यावी, अनेक लोक पिढ्यान् पिढ्या एकत्रितपणे गावात राहत असून, या गावात कधीही दंगल झाली नाही. आता पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी गावातील लोकांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता राखावी. तसेच या दंगलीमध्ये जे दोषी आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई होईल; परंतु जे निर्दोष आहेत यांच्यावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी प्रशासनाने घेतलेली आहे, त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासावर अतिरिक्त पोलिस अधीक्षक दर्जाचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत. तरी पुसेसावळी ग्रामस्थांनी प्रशासनास सहकार्य करावे.’

ग्रामस्थांचे सहकार्य लाभलेपुसेसावळी गावामध्ये यापुढेही कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील असून, गावातील शांतता व सलोखा अबाधित राहण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीस सहकार्य केल्याचे पुसेसावळीच्या सरपंच सुरेखा माळवे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना सांगितले.

पोलिस यंत्रणेने तपासाला गती द्यावी..पुसेसावळी येथील दंगलीमधील दोषींवर कडक कारवाई करावी, त्याचबरोबर ज्या लोकांना अजून अटक केली नाही, त्यांना लवकर अटक करून पोलिस यंत्रणेने तपासाला गती द्यावी, या मागण्या पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे मुस्लीम समाजबांधवांकडून करण्यात आल्या.

आमची मुलं नसतानाही त्यांना अटक..पुसेसावळीमधील दंगलीमध्ये आमची मुलं नसतानाही त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबतचे पुरावे आम्ही प्रशासनास दिले आहेत तरीही आमच्या मुलांना अटक केली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अन्याय होत असल्याची भावना अटक केलेल्या मुलाच्या नातेवाइकांकडून पालकमंत्र्यांना सांगण्यात आल्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShambhuraj Desaiशंभूराज देसाई