शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

अवकाळीमुळे पंचनाम्यांचाही ‘पाऊस’!

By admin | Updated: March 3, 2015 00:26 IST

निसर्गाचा कहर : शासकीय अधिकारी शेतकऱ्यांच्या शिवारात; प्रस्तावित नुकसान भरपाई मिळेना तोवरच नवीन संकटाचा घाला

सातारा : अवकाळी पावसाने जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे. शेतकरी काबाडकष्ट करुन पिकांचे उत्पादन घेतात; परंतु ऐन काढणीच्या वेळी अथवा शेतकऱ्यांच्या हातात पैसा येण्याच्या वेळीच पाऊस कहर करत आहे. गतवर्षी पावसाळ्याव्यतिरिक्त तीन महिने अवकाळी पावसाने धुमाकूळ घालून शेतीचे नुकसान केले. शासन दरबारी नुकसान भरपाईचा निधी मागितला गेला असला तरी तो अद्याप एक रुपयाही शेतकऱ्यांना मिळालेला नसताना यावर्षी पुन्हा एकदा अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला आहे. अवकाळीत केवळ पंचनाम्यांचा ‘पाऊस’ पडतो. मदत मात्र मिळत नाही. उन्हाळ्याची चाहूल नुकतीच लागली असताना सलग दोन दिवस अवकाळी पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले आहे. ज्वारी, गहू, हरभरा या हंगामी पिकांसोबतच आंबा, स्ट्रॉबेरी, डाळिंब, द्राक्षे, पपई या फळ पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणामध्ये फळबाज्या केल्या जातात. या फळबाज्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातले शेतकरी पुरते हादरुन गेले आहेत. ज्वारी, गव्हाच्या मळण्याही अद्याप रखडल्या आहेत. शेतात काढून टाकलेली पिके पावसाने भिजली आहेत. अजूनही पावसाचे चिन्ह कायम असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, गतवर्षी मे, जुलै, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे करुन नुकसान भरपाईचा अहवाल शासन दरबारी पाठविण्यात आला होता. मात्र, शासनाने एक रुपयाही दिला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आता पुन्हा अवकाळी पावसाने सुरुवात केली असल्याने या चिंतेत आणखी भर पडली आहे. दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे सुरु झाले आहेत. त्यापैकी जावळी, वाई, महाबळेश्वर या तीन तालुक्यांती पंचनाम्यांचे अंदाजित अहवाल महसूल विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या तीन तालुक्यांती ३७८ शेतकऱ्यांच्या २७१.२५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. इतर तालुक्यांतही पंचनामे सुरु आहेत. मे २0१४ : बाधित शेतकरी ८८५, क्षेत्र २२३.६९ हेक्टर , नुकसान ५0.३९ लाख. जुलै २0१४ : बाधित शेतकरी १६, क्षेत्र ४.४ हेक्टर, नुकसान ६0 हजार. नोव्हेंबर २0१४ : बाधित शेतकरी १३३, क्षेत्र ४५.२७ हेक्टर, नुकसान १0.४६ लाख. डिसेंबर २0१४ : बाधित शेतकरी २,८३९, क्षेत्र ४४६.६४ हेक्टर, नुकसान ६७.३५ हजार. या नुकसानीमुळे जिल्ह्यातील बळीराजा हवालदील झाला आहे. नुकसानीचे लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)खंडाळ्यात ५० लाखांचे नुकसान खंडाळा : खंडाळा तालुक्यात गेल्या दोन दिवसांत सर्वत्रच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. वर्षभरात तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेली पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर आडवी झाली. शिवारातील उभ्या पिकावरच आभाळ कोसळल्याने लाखोंचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. खंडाळा तालुक्यातील सुमारे २३० हेक्टर क्षेत्रातील तब्बल ५० लाखांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. पण तरीही शेतकरी पुन्हा नव्या दमाने पाठीचा कणा ताठ करून काळ्या आईच्या सेवेत रममाण झालेला पाहायला मिळत आहे.आदर्कीत नुकसानीचे पंचनामेआदर्की : फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या आदर्कीसह परिसरात शनिवार, रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा ही पिके भुईसपाट झाली. रब्बी हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय अधिकाऱ्यांनी सोमवारी आदर्कीसह परिसरात नुकसानीचा पंचनामा केला.कोरगावात १०५० शेतकऱ्यांवर संकट कोरेगाव : कोरेगाव तालुक्यात एकूण ६८ गावे आहेत. अवकाळी पावसामुळे तालुक्यातील सुमारे ४५० हेक्टर क्षेत्राला अवकाळीचा तडाखा बसला असून १ हजार ५० शेतकरी बाधित झाले आहेत. ज्वारीचे ३५० हेक्टर, हरभरा ५५, द्राक्षे, १५ आंबा ५ तर डाळींबाचे पाच हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.