शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीमुळे पंचनाम्यांचाही ‘पाऊस’!

By admin | Updated: March 3, 2015 00:26 IST

निसर्गाचा कहर : शासकीय अधिकारी शेतकऱ्यांच्या शिवारात; प्रस्तावित नुकसान भरपाई मिळेना तोवरच नवीन संकटाचा घाला

सातारा : अवकाळी पावसाने जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे. शेतकरी काबाडकष्ट करुन पिकांचे उत्पादन घेतात; परंतु ऐन काढणीच्या वेळी अथवा शेतकऱ्यांच्या हातात पैसा येण्याच्या वेळीच पाऊस कहर करत आहे. गतवर्षी पावसाळ्याव्यतिरिक्त तीन महिने अवकाळी पावसाने धुमाकूळ घालून शेतीचे नुकसान केले. शासन दरबारी नुकसान भरपाईचा निधी मागितला गेला असला तरी तो अद्याप एक रुपयाही शेतकऱ्यांना मिळालेला नसताना यावर्षी पुन्हा एकदा अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला आहे. अवकाळीत केवळ पंचनाम्यांचा ‘पाऊस’ पडतो. मदत मात्र मिळत नाही. उन्हाळ्याची चाहूल नुकतीच लागली असताना सलग दोन दिवस अवकाळी पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले आहे. ज्वारी, गहू, हरभरा या हंगामी पिकांसोबतच आंबा, स्ट्रॉबेरी, डाळिंब, द्राक्षे, पपई या फळ पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणामध्ये फळबाज्या केल्या जातात. या फळबाज्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातले शेतकरी पुरते हादरुन गेले आहेत. ज्वारी, गव्हाच्या मळण्याही अद्याप रखडल्या आहेत. शेतात काढून टाकलेली पिके पावसाने भिजली आहेत. अजूनही पावसाचे चिन्ह कायम असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, गतवर्षी मे, जुलै, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे करुन नुकसान भरपाईचा अहवाल शासन दरबारी पाठविण्यात आला होता. मात्र, शासनाने एक रुपयाही दिला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आता पुन्हा अवकाळी पावसाने सुरुवात केली असल्याने या चिंतेत आणखी भर पडली आहे. दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे सुरु झाले आहेत. त्यापैकी जावळी, वाई, महाबळेश्वर या तीन तालुक्यांती पंचनाम्यांचे अंदाजित अहवाल महसूल विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या तीन तालुक्यांती ३७८ शेतकऱ्यांच्या २७१.२५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. इतर तालुक्यांतही पंचनामे सुरु आहेत. मे २0१४ : बाधित शेतकरी ८८५, क्षेत्र २२३.६९ हेक्टर , नुकसान ५0.३९ लाख. जुलै २0१४ : बाधित शेतकरी १६, क्षेत्र ४.४ हेक्टर, नुकसान ६0 हजार. नोव्हेंबर २0१४ : बाधित शेतकरी १३३, क्षेत्र ४५.२७ हेक्टर, नुकसान १0.४६ लाख. डिसेंबर २0१४ : बाधित शेतकरी २,८३९, क्षेत्र ४४६.६४ हेक्टर, नुकसान ६७.३५ हजार. या नुकसानीमुळे जिल्ह्यातील बळीराजा हवालदील झाला आहे. नुकसानीचे लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)खंडाळ्यात ५० लाखांचे नुकसान खंडाळा : खंडाळा तालुक्यात गेल्या दोन दिवसांत सर्वत्रच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. वर्षभरात तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेली पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर आडवी झाली. शिवारातील उभ्या पिकावरच आभाळ कोसळल्याने लाखोंचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. खंडाळा तालुक्यातील सुमारे २३० हेक्टर क्षेत्रातील तब्बल ५० लाखांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. पण तरीही शेतकरी पुन्हा नव्या दमाने पाठीचा कणा ताठ करून काळ्या आईच्या सेवेत रममाण झालेला पाहायला मिळत आहे.आदर्कीत नुकसानीचे पंचनामेआदर्की : फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या आदर्कीसह परिसरात शनिवार, रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा ही पिके भुईसपाट झाली. रब्बी हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय अधिकाऱ्यांनी सोमवारी आदर्कीसह परिसरात नुकसानीचा पंचनामा केला.कोरगावात १०५० शेतकऱ्यांवर संकट कोरेगाव : कोरेगाव तालुक्यात एकूण ६८ गावे आहेत. अवकाळी पावसामुळे तालुक्यातील सुमारे ४५० हेक्टर क्षेत्राला अवकाळीचा तडाखा बसला असून १ हजार ५० शेतकरी बाधित झाले आहेत. ज्वारीचे ३५० हेक्टर, हरभरा ५५, द्राक्षे, १५ आंबा ५ तर डाळींबाचे पाच हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.