शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
4
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
5
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
6
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
8
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
9
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
10
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
11
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
12
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
13
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
14
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
15
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
16
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
17
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
18
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
19
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
20
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल

पावसाच्या गावी चार महिन्यांची तजवीज, वाहनांअभावी डोक्यावरून वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 11:16 IST

सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर तसेच सातारा व वाई तालुक्याच्या पश्चिम भागात पाऊस जास्त पडतो. काही दिवस वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होते. डोंगरावर राहणारे तसेच नदीपलीकडील अनेक गावातील लोकांना बाजारहाट करण्यासाठी जाता येत नाही. त्यामुळे चार महिने पुरेल एवढा अन्नधान्य साठा लोक करून ठेवतात. वाहनांअभावी डोक्यावरून घेऊन जावे लागते.

ठळक मुद्देपावसाच्या गावी चार महिन्यांची तजवीजवाहनांअभावी डोक्यावरून वाहतूक, धान्य अन् जीवनावश्यक वस्तूंचा साठा

लक्ष्मण गोरे बामणोली : सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर तसेच सातारा व वाई तालुक्याच्या पश्चिम भागात पाऊस जास्त पडतो. काही दिवस वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होते. डोंगरावर राहणारे तसेच नदीपलीकडील अनेक गावातील लोकांना बाजारहाट करण्यासाठी जाता येत नाही. त्यामुळे चार महिने पुरेल एवढा अन्नधान्य साठा लोक करून ठेवतात. वाहनांअभावी डोक्यावरून घेऊन जावे लागते.जिल्ह्याच्या पश्चिम भागात जून ते सप्टेंबर ही चार महिने अति पावसाचे असतात. मान्सून सुरू झाला की दळणवळण व संपर्काची यंत्रणा ठप्प होतात. जावळी तालुक्यातील देऊर, वेळे, तळदेव मायणी, कारगाव तसेच नदीपलीकडील आडोशी, कुसापूर शिवाय महाबळेश्वर तालुक्यातील पर्वत, चकदेव, कांदाट अशी गावे अतिदुर्गम आहेत.

या गावांसह डोंगरावर राहणाऱ्या अनेक गावातील लोकांना वाहतुकीसाठी असणारा कच्चा रस्ता पावसात बंद असतो. अशा ठिकाणचे ग्रामस्थ साखर, मीठ, कांदे, बटाटे, खते भिजून खराब होणाऱ्या वस्तूंसह धान्य, डाळी, कपडे याखेरीज पुरेशा रोख रक्कमेचीही तजवीज पावसाळ्यापूर्वीच करून ठेवतात. पावसाळ्यात चार महिने संततधार पाऊस कोसळत असतो.

पावसाळ्यात घरांना गळती लागू नये म्हणून येथील कौलारू तसेच मातीची असणारी घरे प्लास्टिक कागद तसेच कोळंबाने शेकारतात. या गवतामुळे घरात पावसाचे पाणीही येत नाही. शिवाय ऊबदारपणा टिकून राहण्यास मदत होते. घरांची डागडुजी उन्हाळ्यातच सुरू असते.जनावरांची वैरण अन् सरपण पोटमाळ्यावरतापोळा, बामणोली विभागातील अनेक गावे उंच, दुर्गम ठिकाणी डोंगरात वसलेली आहेत. या ठिकाणी दाट धुके व संततधार पाऊस असतो. अशा वेळी पाळीव जनावरांसाठीचा कोरडा चारा घरातील पोटमाळ्यावर साठवून ठेवलेला असतो. तसेच स्वयंपासाठीची जळावू लाकडेही घरातील पोटमाळ्यावर किंवा एका स्वतंत्र खोलीत साठा करून ठेवली जातात.

लॉकडाऊनमुळे यंदा चाकरमानी गावालाच आहेत. नदीपलीकडील गावांना लाँच बंद तसेच लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने अनेक ग्रामस्थांना पावसाळ्यातील अन्नधान्यसाठा करता आला नाही.- शिवराम चव्हाण,लामज, ता. महाबळेश्वर

पावसाळ्याचा धान्यसाठा तळदेव ग्रामस्थांनी सातारा येथे खरेदी करून ठोसेघर पठारापर्यंत वाहतूक करून तेथून डोंगरातून दीड तास डोक्यावरून घरापर्यंत नेला आहे. दरवर्षी कसरत करावी लागते.- पांडुरंग पवार, तळदेव, मायणी, ता. जावळी.

 

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर