शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पावसाच्या गावी चार महिन्यांची तजवीज, वाहनांअभावी डोक्यावरून वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 11:16 IST

सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर तसेच सातारा व वाई तालुक्याच्या पश्चिम भागात पाऊस जास्त पडतो. काही दिवस वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होते. डोंगरावर राहणारे तसेच नदीपलीकडील अनेक गावातील लोकांना बाजारहाट करण्यासाठी जाता येत नाही. त्यामुळे चार महिने पुरेल एवढा अन्नधान्य साठा लोक करून ठेवतात. वाहनांअभावी डोक्यावरून घेऊन जावे लागते.

ठळक मुद्देपावसाच्या गावी चार महिन्यांची तजवीजवाहनांअभावी डोक्यावरून वाहतूक, धान्य अन् जीवनावश्यक वस्तूंचा साठा

लक्ष्मण गोरे बामणोली : सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर तसेच सातारा व वाई तालुक्याच्या पश्चिम भागात पाऊस जास्त पडतो. काही दिवस वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होते. डोंगरावर राहणारे तसेच नदीपलीकडील अनेक गावातील लोकांना बाजारहाट करण्यासाठी जाता येत नाही. त्यामुळे चार महिने पुरेल एवढा अन्नधान्य साठा लोक करून ठेवतात. वाहनांअभावी डोक्यावरून घेऊन जावे लागते.जिल्ह्याच्या पश्चिम भागात जून ते सप्टेंबर ही चार महिने अति पावसाचे असतात. मान्सून सुरू झाला की दळणवळण व संपर्काची यंत्रणा ठप्प होतात. जावळी तालुक्यातील देऊर, वेळे, तळदेव मायणी, कारगाव तसेच नदीपलीकडील आडोशी, कुसापूर शिवाय महाबळेश्वर तालुक्यातील पर्वत, चकदेव, कांदाट अशी गावे अतिदुर्गम आहेत.

या गावांसह डोंगरावर राहणाऱ्या अनेक गावातील लोकांना वाहतुकीसाठी असणारा कच्चा रस्ता पावसात बंद असतो. अशा ठिकाणचे ग्रामस्थ साखर, मीठ, कांदे, बटाटे, खते भिजून खराब होणाऱ्या वस्तूंसह धान्य, डाळी, कपडे याखेरीज पुरेशा रोख रक्कमेचीही तजवीज पावसाळ्यापूर्वीच करून ठेवतात. पावसाळ्यात चार महिने संततधार पाऊस कोसळत असतो.

पावसाळ्यात घरांना गळती लागू नये म्हणून येथील कौलारू तसेच मातीची असणारी घरे प्लास्टिक कागद तसेच कोळंबाने शेकारतात. या गवतामुळे घरात पावसाचे पाणीही येत नाही. शिवाय ऊबदारपणा टिकून राहण्यास मदत होते. घरांची डागडुजी उन्हाळ्यातच सुरू असते.जनावरांची वैरण अन् सरपण पोटमाळ्यावरतापोळा, बामणोली विभागातील अनेक गावे उंच, दुर्गम ठिकाणी डोंगरात वसलेली आहेत. या ठिकाणी दाट धुके व संततधार पाऊस असतो. अशा वेळी पाळीव जनावरांसाठीचा कोरडा चारा घरातील पोटमाळ्यावर साठवून ठेवलेला असतो. तसेच स्वयंपासाठीची जळावू लाकडेही घरातील पोटमाळ्यावर किंवा एका स्वतंत्र खोलीत साठा करून ठेवली जातात.

लॉकडाऊनमुळे यंदा चाकरमानी गावालाच आहेत. नदीपलीकडील गावांना लाँच बंद तसेच लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने अनेक ग्रामस्थांना पावसाळ्यातील अन्नधान्यसाठा करता आला नाही.- शिवराम चव्हाण,लामज, ता. महाबळेश्वर

पावसाळ्याचा धान्यसाठा तळदेव ग्रामस्थांनी सातारा येथे खरेदी करून ठोसेघर पठारापर्यंत वाहतूक करून तेथून डोंगरातून दीड तास डोक्यावरून घरापर्यंत नेला आहे. दरवर्षी कसरत करावी लागते.- पांडुरंग पवार, तळदेव, मायणी, ता. जावळी.

 

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर