शहरं
Join us  
Trending Stories
1
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
2
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
3
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
4
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
5
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
6
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
7
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
8
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
9
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
10
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
11
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
12
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
13
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
14
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
15
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
16
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
17
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
18
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
19
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
20
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना

सातारा गॅझेट लागू करण्याबाबत लवकरच प्रक्रिया; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 14:35 IST

टीकाटिप्पणी करणे साेपे..

सातारा : मराठा समाजाला मिळणार आरक्षण कायदेशीर आणि घटनेच्या चाैकटीत टिकलं पाहिजे हे महत्त्वाचं होतं. तसेच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच समाजाला दुसऱ्यांदा आरक्षण मिळाले आहे. मनोज जरांगे यांना दिलेल्या अध्यादेशातील मुद्दे तातडीने लागू करण्याचे काम शासन माध्यमातून सुरू झाले आहे. तसेच सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भातही प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.सातारा येथे मराठा समाजाला आरक्षण देण्यात मोलाची भूमिका बजावल्याबद्दल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार डाॅ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, आदी उपस्थित होते.मंत्री शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, मराठा समाज २५ वर्षांपासून आरक्षण मिळण्याची मागणी करीत होता. समाजातीलही आपल्या नेत्यांनी न्याय दिला नाही ही वस्तुस्थिती आहे. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे. मराठा समाजाने हे विसरून चालणार नाही. मराठा समाज आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांना अध्यादेश देण्यात आला आहे. त्यातील सर्व मुद्दे तातडीने लागू करण्याचे काम राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू आहे. याचा फायदा मराठा समाजालाच होईल. तसेच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. तेही मागे घेतले जाणार आहेत.राज्यातील मराठा आणि ओबीसी समाजात सलोखा राहिला पाहिजे ही भूमिका शासनाची आहे. मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग दाखविणारे, निर्णय घेणारे मुख्यमंत्री फडणवीस आहेत. ते मराठा समाजाला न्याय देतील का, अशी शंका होती. पण, त्यांनी कायदेशीर आरक्षण दिले. तसेच मराठा समाजाला न्याय देण्याचे काम मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह इतरांचेही आहे, असेही मंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्ट केले.

टीकाटिप्पणी करणे साेपे..आरक्षणाच्या बाबतीत टीकाटिप्पणी करणे सोपे असते. काही लोकं ट्रोलही करीत होती. हाॅटेल बसून टॅग करणं सोप्प असतं. पण, फिल्डवर उतरून काम करणं अवघड असते. मनोज जरांगे यांची आरक्षणाची मागणी कायदा आणि घटनेच्या चाैकटीत बसली पाहिजे. त्यामुळे गडबडीत शासनाने काहीतरी कागद काढायचा आणि हातात द्यायचा. त्यानंतर महिनाभरात कोर्टानं ते रद्द करायचं हे झालं नाही पाहिजे. यासाठीच द्यायचे ते कायदेशीर असावं आणि ते टिकलं पाहिजे, असेही मंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.