शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
3
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
4
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
5
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
6
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
7
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
8
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
9
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
10
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
11
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
12
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
13
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
14
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
15
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
16
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
17
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
18
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
19
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
20
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

परळी खोऱ्यातील प्रश्न मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:41 IST

परळी : ‘पाणी उशाला आणि कोरड घशाला’ अशीच काहीशी परिस्थिती या भागाची झाली आहे. जलसंधारणाचे मोठे चार प्रकल्प या ...

परळी : ‘पाणी उशाला आणि कोरड घशाला’ अशीच काहीशी परिस्थिती या भागाची झाली आहे. जलसंधारणाचे मोठे चार प्रकल्प या भागात असले तरी शेतीसाठी पाण्याचा तुटवडा, येथील लोकप्रतिनिधींचे अपयशच आहे. मात्र, या भागातील धरणग्रस्तांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मी स्वतः मांडून शंभर टक्के काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन. कृषी पर्यटनासंदर्भातही उपाययोजना करण्यात येतील’, असे प्रतिपादन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केले.

भोंदवडे येथील झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी परळी भागातील मनसे तसेच भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. कृषीमंत्र्यांच्या हस्ते नित्रळ येथील अतिवृष्टी आपद्ग्रस्त नंदा वांगडे यांना रोख रक्कम देऊन अर्थसाह्य केले. यावेळी शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, नारायण निकम, श्यामराव लोटेकर, जिल्हा संघटिका शारदा जाधव, रंजना भोसले, एकनाथ ओंबळे, अनिल गुजर, अतिश ननावरे, विश्वनाथ धनावडे, बाळासाहेब शिंदे, निलेश मोरे, सचिन जवळ, प्रणव सावंत, रूपाली लेंबे, मंजिरी सावंत, अमर मोहिते, हनुमंत भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.

नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, ‘पीकविमा यासंदर्भात शिवसेना नेहमी आग्रही राहिली आहे तसेच पंधरा दिवसांच्या आत कर्जमुक्तीचा निर्णय घेतला होता. शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली. मात्र, या परळी भागातील नेतृत्व खंबीर नसल्याने अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत तसेच निवडणुकीत मते देऊन अकार्यक्षम माणसांना तुम्ही मोठमोठी पदे दिली, ही सगळी खिचडीही तुम्हीच घातलेली आहे.

सचिन मोहिते म्हणाले, ‘या मतदारसंघात चार मोठी धरणे बांधलेली आहेत. यांचा पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून रेंगाळत आहे. धरणे तयार होऊन वीस वर्षे झाली तरी स्थानिक नेत्यांना या धरणग्रस्तांची व्यथा कधी समजणार, असाच प्रश्न उभा राहत आहे. धरणे बांधून वीस वर्षे झाली तरी वर सरकून राहिलेल्या लोकांना शेतीसाठी पाणीप्रश्न तसेच धरणाच्या खाली असलेल्या शेतीसाठी कॅनालचा पाणीप्रश्न प्रलंबितच आहे. कारण, खाली कॅनॉल नाही आणि वरच्या भागासाठी पाइपलाइनद्वारे केलेले पाइप नाहीत. मग, हा शासनाकडून आलेला सर्व निधी गेला तरी कुठे, यासंदर्भातही चौकशी नक्कीच झाली पाहिजे.’

(चौकट)

नियमित कर्ज भरणाऱ्यांना पन्नास हजारांची सूट...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांना अन्नदेवता म्हणून संबोधतात. यामुळेच सरकार स्थापन झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत कोरोनाकाळ असूनही ३१ लाख जणांना कर्जमुक्त केले तसेच यासाठी २१ हजार कोटी राज्य सरकारने उभे केले. एवढ्या मोठ्या महामारीत आर्थिक अडचण असतानादेखील एवढी मोठी रक्कम महात्मा जोतिबा फुले योजनेंतर्गत मदत देणारे हे पहिले सरकार आहे. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्यांना पन्नास हजारांची सूटदेखील देण्याची तरतूद केली होती, असे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

फोटो..

२६परळी

भोंदवडे (ता. सातारा) येथे शनिवारी झालेल्या शेतकरी मेळाव्यात कृषीमंत्री दादा भुसे यांनी मार्गदर्शन केले.