शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

चांगल्या कांद्याला ३२०० रुपयांपर्यंत क्विंटलला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:09 IST

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगलीच होत असून रविवारी भावही वाढला. चांगल्या कांद्याला ३२०० रुपये क्विंटलपर्यंत दर ...

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगलीच होत असून रविवारी भावही वाढला. चांगल्या कांद्याला ३२०० रुपये क्विंटलपर्यंत दर आला. तसेच कमी दर्जाच्या कांद्यालाही उठाव होता. तर कोबी अन् टोमॅटोला अजूनही भाव कमी मिळत असल्याचे स्पष्ट झाले.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यातून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. बाजार समितीत रविवारी फळभाज्याची एकूण ५६० क्विंटलची आवक झाली. यामध्ये कांद्याची २४८ क्विंटलची आवक झाली. कांद्याला क्विंटलला २५०० ते ३२०० रुपयांपर्यंत भाव आला. तर यावेळीही वांग्याला दर कमी मिळाल्याचे दिसून आले. १० किलोला १५० ते २०० रुपये दर मिळाला. टोमॅटोला ५० ते ६०, कोबीला २० ते ३० रुपये दर आला. त्याचबरोबर या रविवारी फ्लॉवरचा भाव वाढल्याचे दिसून आले. फ्लॉवरला १० किलोला १०० ते १५० रुपये भाव मिळाला.

बोराची आवक कमी...

साताऱ्यातील बाजारपेठेत बोरांची आवक कमी झाली. तर सफरचंद, केळी यांची आवक चांगली आहे. त्याचबरोबर दरात फारशी वाढ झाली नसल्याचे दिसून आले.

खाद्यतेलाच्या दरात वाढ...

काही दिवसांपासून खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. मात्र, सध्या डब्यामागे तेलाचा दर सरासरी १०० रुपयांनी वाढला आहे. शेंगदाणा तेल डबा २३०० ते २५०० रुपयांपर्यंत असून सोयबीन तेल डबा १९५० ते २००० रुपयांदरम्यान आहे. तसेच सूर्यफूल तेल डब्याची किंमत १९५० ते २०५० रुपयांपर्यंत आहे. एक किलो पाऊचचा दर मात्र स्थिर आहे.

आले स्वस्तच...

सातारा बाजार समितीत अद्यापही अनेक भाज्यांचे दर कमीच आहेत. कारली अन् दोडक्याला १० किलोला २५० ते ३०० रुपये भाव आला. तर मिरचीला १० किलोस ३०० ते ४०० रुपये, भेंडी २५० ते २००, शेवगा अन् पावट्याला ३०० ते ४०० रुपये भाव आला. तर आल्याला क्विंटलला १८०० पर्यंत दर मिळाला.

मंडईत काही फळभाज्यांच्या दरात सतत चढ-उतार होत आहे. तर पालेभाज्या अजूनही ग्राहकांच्या आवाक्यात असल्याचे दिसून येत आहे. लसूण आणि कांद्याचा दर अजूनही स्थिर आहे.

- राजाराम यादव, ग्राहक

साताऱ्यात वांगी, कोबी, टोमॅटोला दर कमी मिळत आहे. त्यामुळे फायद्याच्या गणिताचा मेळ बसेना. मात्र, कांद्याचा दर टिकून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत.

- रामराव पाटील, शेतकरी

भारतात ७० टक्के खाद्यतेलाची आयात होते. सध्या परदेशात तेलाचे दर तेजीत आहेत. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत तेल डब्यामागे वाढ झालेली आहे. अजून काही दिवस वाढ अपेक्षित आहे.

- संजय भोईटे, दुकानदार