शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या कांद्याला ३२०० रुपयांपर्यंत क्विंटलला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:09 IST

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगलीच होत असून रविवारी भावही वाढला. चांगल्या कांद्याला ३२०० रुपये क्विंटलपर्यंत दर ...

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगलीच होत असून रविवारी भावही वाढला. चांगल्या कांद्याला ३२०० रुपये क्विंटलपर्यंत दर आला. तसेच कमी दर्जाच्या कांद्यालाही उठाव होता. तर कोबी अन् टोमॅटोला अजूनही भाव कमी मिळत असल्याचे स्पष्ट झाले.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यातून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. बाजार समितीत रविवारी फळभाज्याची एकूण ५६० क्विंटलची आवक झाली. यामध्ये कांद्याची २४८ क्विंटलची आवक झाली. कांद्याला क्विंटलला २५०० ते ३२०० रुपयांपर्यंत भाव आला. तर यावेळीही वांग्याला दर कमी मिळाल्याचे दिसून आले. १० किलोला १५० ते २०० रुपये दर मिळाला. टोमॅटोला ५० ते ६०, कोबीला २० ते ३० रुपये दर आला. त्याचबरोबर या रविवारी फ्लॉवरचा भाव वाढल्याचे दिसून आले. फ्लॉवरला १० किलोला १०० ते १५० रुपये भाव मिळाला.

बोराची आवक कमी...

साताऱ्यातील बाजारपेठेत बोरांची आवक कमी झाली. तर सफरचंद, केळी यांची आवक चांगली आहे. त्याचबरोबर दरात फारशी वाढ झाली नसल्याचे दिसून आले.

खाद्यतेलाच्या दरात वाढ...

काही दिवसांपासून खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. मात्र, सध्या डब्यामागे तेलाचा दर सरासरी १०० रुपयांनी वाढला आहे. शेंगदाणा तेल डबा २३०० ते २५०० रुपयांपर्यंत असून सोयबीन तेल डबा १९५० ते २००० रुपयांदरम्यान आहे. तसेच सूर्यफूल तेल डब्याची किंमत १९५० ते २०५० रुपयांपर्यंत आहे. एक किलो पाऊचचा दर मात्र स्थिर आहे.

आले स्वस्तच...

सातारा बाजार समितीत अद्यापही अनेक भाज्यांचे दर कमीच आहेत. कारली अन् दोडक्याला १० किलोला २५० ते ३०० रुपये भाव आला. तर मिरचीला १० किलोस ३०० ते ४०० रुपये, भेंडी २५० ते २००, शेवगा अन् पावट्याला ३०० ते ४०० रुपये भाव आला. तर आल्याला क्विंटलला १८०० पर्यंत दर मिळाला.

मंडईत काही फळभाज्यांच्या दरात सतत चढ-उतार होत आहे. तर पालेभाज्या अजूनही ग्राहकांच्या आवाक्यात असल्याचे दिसून येत आहे. लसूण आणि कांद्याचा दर अजूनही स्थिर आहे.

- राजाराम यादव, ग्राहक

साताऱ्यात वांगी, कोबी, टोमॅटोला दर कमी मिळत आहे. त्यामुळे फायद्याच्या गणिताचा मेळ बसेना. मात्र, कांद्याचा दर टिकून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत.

- रामराव पाटील, शेतकरी

भारतात ७० टक्के खाद्यतेलाची आयात होते. सध्या परदेशात तेलाचे दर तेजीत आहेत. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत तेल डब्यामागे वाढ झालेली आहे. अजून काही दिवस वाढ अपेक्षित आहे.

- संजय भोईटे, दुकानदार