शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

चांगल्या कांद्याला ३२०० रुपयांपर्यंत क्विंटलला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:09 IST

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगलीच होत असून रविवारी भावही वाढला. चांगल्या कांद्याला ३२०० रुपये क्विंटलपर्यंत दर ...

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगलीच होत असून रविवारी भावही वाढला. चांगल्या कांद्याला ३२०० रुपये क्विंटलपर्यंत दर आला. तसेच कमी दर्जाच्या कांद्यालाही उठाव होता. तर कोबी अन् टोमॅटोला अजूनही भाव कमी मिळत असल्याचे स्पष्ट झाले.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यातून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. बाजार समितीत रविवारी फळभाज्याची एकूण ५६० क्विंटलची आवक झाली. यामध्ये कांद्याची २४८ क्विंटलची आवक झाली. कांद्याला क्विंटलला २५०० ते ३२०० रुपयांपर्यंत भाव आला. तर यावेळीही वांग्याला दर कमी मिळाल्याचे दिसून आले. १० किलोला १५० ते २०० रुपये दर मिळाला. टोमॅटोला ५० ते ६०, कोबीला २० ते ३० रुपये दर आला. त्याचबरोबर या रविवारी फ्लॉवरचा भाव वाढल्याचे दिसून आले. फ्लॉवरला १० किलोला १०० ते १५० रुपये भाव मिळाला.

बोराची आवक कमी...

साताऱ्यातील बाजारपेठेत बोरांची आवक कमी झाली. तर सफरचंद, केळी यांची आवक चांगली आहे. त्याचबरोबर दरात फारशी वाढ झाली नसल्याचे दिसून आले.

खाद्यतेलाच्या दरात वाढ...

काही दिवसांपासून खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. मात्र, सध्या डब्यामागे तेलाचा दर सरासरी १०० रुपयांनी वाढला आहे. शेंगदाणा तेल डबा २३०० ते २५०० रुपयांपर्यंत असून सोयबीन तेल डबा १९५० ते २००० रुपयांदरम्यान आहे. तसेच सूर्यफूल तेल डब्याची किंमत १९५० ते २०५० रुपयांपर्यंत आहे. एक किलो पाऊचचा दर मात्र स्थिर आहे.

आले स्वस्तच...

सातारा बाजार समितीत अद्यापही अनेक भाज्यांचे दर कमीच आहेत. कारली अन् दोडक्याला १० किलोला २५० ते ३०० रुपये भाव आला. तर मिरचीला १० किलोस ३०० ते ४०० रुपये, भेंडी २५० ते २००, शेवगा अन् पावट्याला ३०० ते ४०० रुपये भाव आला. तर आल्याला क्विंटलला १८०० पर्यंत दर मिळाला.

मंडईत काही फळभाज्यांच्या दरात सतत चढ-उतार होत आहे. तर पालेभाज्या अजूनही ग्राहकांच्या आवाक्यात असल्याचे दिसून येत आहे. लसूण आणि कांद्याचा दर अजूनही स्थिर आहे.

- राजाराम यादव, ग्राहक

साताऱ्यात वांगी, कोबी, टोमॅटोला दर कमी मिळत आहे. त्यामुळे फायद्याच्या गणिताचा मेळ बसेना. मात्र, कांद्याचा दर टिकून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत.

- रामराव पाटील, शेतकरी

भारतात ७० टक्के खाद्यतेलाची आयात होते. सध्या परदेशात तेलाचे दर तेजीत आहेत. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत तेल डब्यामागे वाढ झालेली आहे. अजून काही दिवस वाढ अपेक्षित आहे.

- संजय भोईटे, दुकानदार