शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

प्रकाश आंबेडकर यांनी महायुतीत यावे, अन्यथा..; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सल्ला 

By दीपक देशमुख | Updated: February 5, 2024 12:19 IST

'ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीकडून सातत्याने अपमान'

सातारा : वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक व दलित समाजाचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीकडून सातत्याने अपमान हाेत आहे. ते महाविकास आघाडीत जाणार असल्याचे सांगत असले तरी आघाडीकडून त्यांच्याबाबत कोणताही निर्णय होत नाही. यामुळे त्यांनी महाविकास आघाडीत न जाता महायुतीत यावे अन्यथा स्वतंत्रपणे लढावे, असा सल्ला रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.सांगली दौऱ्यावर जात असताना रामदास आठवले यांनी सातारा शासकीय विश्रामगृहावर काहीकाळ थांबून कार्यकर्त्यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रामदास आठवले म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये दलित, ओबीसी तसेच सर्व समाज घटकांना न्याय दिला जात आहे. महाहायुतीमध्ये रिपाइंचा सन्मान राखला जात असून लोकसभेमध्ये एकही सदस्य नसताना मला मंत्रीपदाची संधी दिली आहे.तथापि, आगामी लोकसभेला महाराष्ट्रात दोन जागा रिपाइंला मिळाव्यात, अशी अपेक्षा आहे. जागावाटपाच्या चर्चेवेळी आमची बाजू सर्व नेत्यांसोबत मांडणार आहे. रिपाइंचा मतदार गावा-गावांत आहे. दलित समाजाची मते महायुतीकडे वळवण्याच्या दृष्टीने महायुतीच्या नेत्यांनी विचार करावा. मला जरी मंत्रीपद मिळाले तरी माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांनाही सत्तेमध्ये वाटा मिळावा. जिल्हा नियोजन समितीवर व इतर महामंडळांमध्ये लवकरात लवकर नियुक्त रिपाइंच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी. तसेच शिवसेनेतील आमदार अपात्रतेचेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. मात्र, याचा निर्णय झाला असल्यामुळे आता झाल्यानंतर लवकरात लवकर मंत्रीमंडळाचा विस्तार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.कल्याण येथे पोलीस ठाण्यात भाजप आमदाराकडून झालेल्या गोळीबाराबाबत आठवले म्हणाले, या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जबाबदार धरण्याची काहीच आवश्यकता नाही. हा प्रकार जमिनीच्या वादातून झाला आहे. पोलीस ठाण्यात गोळीबार होणे ही गंभीर प्रकार असला तरी याबाबत पोलीस प्रशासन आपली कारवाई करत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरRamdas Athawaleरामदास आठवले