शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेचा उष:काल शोधण्यासाठी ‘रात्रीचा दिवस’

By admin | Updated: October 24, 2016 00:38 IST

कार्यकर्त्यांचा बैठकीवर जोर : भाजपा-शिवसेनेच्या युवतीवर ठरणार दिशा; इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली

खंडाळा : खंडाळा नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. सर्वच पक्षांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला असून, सत्तेचा उष:काल शोधण्यासाठी रात्रीचा दिवस केला जातोय. योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी प्रभागातून कार्यकर्त्यांच्या बैठकीवर जोर दिला जात आहे. अर्ज भरण्यापूर्वीच कार्यकर्त्यांत समेट घडवून सक्षम उमेदवार रिंगणात उतरविण्याची तयारी सर्व प्रमुख पक्षांनी चालविली आहे. त्यामुळे खंडाळ्यात सध्यातरी उद्याच्या त्यासाठी प्रभागवार कार्यकर्त्यांच्या मीटिंगचा खेळ शिताफीने मांडला जात असल्याचे चित्र आहे. खंडाळा नगरपंचायतीसाठी १७ नगरसेवकांच्या जागेच्या उमेदवारी अर्ज २४ आॅक्टोबरपासून भरले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागात इच्छुक असलेल्या उमेदवारांची चाचपणी वेगाने सुरू आहे. मात्र, उमेदवार देताना तो कार्यकर्त्यांच्या सहमतीने दिला जावा, अशी भूमिका प्रमुख पक्षाच्या श्रेष्ठींनी घेतला असल्याने प्रभागावर बैठकांचे जोरदार सत्र सुरू आहे. इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पक्षश्रेष्ठींसाठी ती मोठी डोकेदुखी ठरणार आहे. अर्ज भरण्यापूर्वीच मनधरणी करण्याचा प्रयत्न करून अनेकांना थोपावण्याची भूमिका घेतली जात आहे. मात्र इच्छुकांच्या आशा बळावल्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसादाला बांध घालणे अवघड बनणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा समन्वय कसा राखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. खंडाळ्याची निवडणूक ही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा या प्रमुख पक्षांच्या भोवती फिरणार हे निश्चित आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी पारंपरिक लढतीत भाजपा-शिवसेनाही उतरली असल्याने चांगलीच चुरस वाढली आहे. मात्र संख्या बळानुसार सेना-भाजपा एकत्र येणार का अशीही चर्चा सध्या सुरू आहे.उमेदवारी मिळविण्यासाठी आपापल्या प्रभागातील कार्यकर्त्यांना घेऊन नेत्यांच्या घराचे उंबरे ओलांडले जात आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे इच्छुकांची मोठी संख्या असल्याने किमान अर्ज भरण्यासाठी सगळ्यांनाच प्रवृत्त केले जाईल. त्यानंतर उमेदवारी निश्चितीकडे लक्ष दिले जाण्याची शक्यता आहे. तर काही प्रभागातून आपण आजपर्यंत निष्ठेने पक्षाचे काम करीत आले आहे. त्यामुळे यावेळी आपलीच वर्णी लागली पाहिजे, असे म्हणणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे कोण किती पाण्यात आहे, याचा शोध नेत्यांकडून घेतला जाईल, हे निश्चित. काँग्रेस-राष्ट्रवादीचा जोर कायम राखणार असला तरी भाजपा-शिवसेनेची गणिते ही रणांगणाची दिशा ठरविणारी असणार आहे. प्रभाग अकरा मधून रिपब्लिकन पक्ष स्वतंत्र लढणार का? यावर तेथील लढतीचे चित्र ठरणार आहे. आरपीआय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपा-शिवसेनेची रणनीती सध्यातरी एकला चलो रे चीच आहे. दरम्यान आमदार मकरंद पाटील यांनी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. (प्रतिनिधी) करडी नजर सध्या सर्व पक्षांच्या गुफ्तगू बैठकांनी जोर धरला आहे. मात्र, या बैठकांना आपल्या गोटातील कोण जातोय, यावर बारकाईने नजर ठेवली जात आहे. याशिवाय प्रतिस्पर्धी पक्षांच्या बैठकांचा सूर काय होता, याची माहिती मिळविण्यासाठी व्यूहरचना सुरू आहे.