शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सत्तेचा उष:काल शोधण्यासाठी ‘रात्रीचा दिवस’

By admin | Updated: October 24, 2016 00:38 IST

कार्यकर्त्यांचा बैठकीवर जोर : भाजपा-शिवसेनेच्या युवतीवर ठरणार दिशा; इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली

खंडाळा : खंडाळा नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. सर्वच पक्षांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला असून, सत्तेचा उष:काल शोधण्यासाठी रात्रीचा दिवस केला जातोय. योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी प्रभागातून कार्यकर्त्यांच्या बैठकीवर जोर दिला जात आहे. अर्ज भरण्यापूर्वीच कार्यकर्त्यांत समेट घडवून सक्षम उमेदवार रिंगणात उतरविण्याची तयारी सर्व प्रमुख पक्षांनी चालविली आहे. त्यामुळे खंडाळ्यात सध्यातरी उद्याच्या त्यासाठी प्रभागवार कार्यकर्त्यांच्या मीटिंगचा खेळ शिताफीने मांडला जात असल्याचे चित्र आहे. खंडाळा नगरपंचायतीसाठी १७ नगरसेवकांच्या जागेच्या उमेदवारी अर्ज २४ आॅक्टोबरपासून भरले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागात इच्छुक असलेल्या उमेदवारांची चाचपणी वेगाने सुरू आहे. मात्र, उमेदवार देताना तो कार्यकर्त्यांच्या सहमतीने दिला जावा, अशी भूमिका प्रमुख पक्षाच्या श्रेष्ठींनी घेतला असल्याने प्रभागावर बैठकांचे जोरदार सत्र सुरू आहे. इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पक्षश्रेष्ठींसाठी ती मोठी डोकेदुखी ठरणार आहे. अर्ज भरण्यापूर्वीच मनधरणी करण्याचा प्रयत्न करून अनेकांना थोपावण्याची भूमिका घेतली जात आहे. मात्र इच्छुकांच्या आशा बळावल्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसादाला बांध घालणे अवघड बनणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा समन्वय कसा राखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. खंडाळ्याची निवडणूक ही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा या प्रमुख पक्षांच्या भोवती फिरणार हे निश्चित आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी पारंपरिक लढतीत भाजपा-शिवसेनाही उतरली असल्याने चांगलीच चुरस वाढली आहे. मात्र संख्या बळानुसार सेना-भाजपा एकत्र येणार का अशीही चर्चा सध्या सुरू आहे.उमेदवारी मिळविण्यासाठी आपापल्या प्रभागातील कार्यकर्त्यांना घेऊन नेत्यांच्या घराचे उंबरे ओलांडले जात आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे इच्छुकांची मोठी संख्या असल्याने किमान अर्ज भरण्यासाठी सगळ्यांनाच प्रवृत्त केले जाईल. त्यानंतर उमेदवारी निश्चितीकडे लक्ष दिले जाण्याची शक्यता आहे. तर काही प्रभागातून आपण आजपर्यंत निष्ठेने पक्षाचे काम करीत आले आहे. त्यामुळे यावेळी आपलीच वर्णी लागली पाहिजे, असे म्हणणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे कोण किती पाण्यात आहे, याचा शोध नेत्यांकडून घेतला जाईल, हे निश्चित. काँग्रेस-राष्ट्रवादीचा जोर कायम राखणार असला तरी भाजपा-शिवसेनेची गणिते ही रणांगणाची दिशा ठरविणारी असणार आहे. प्रभाग अकरा मधून रिपब्लिकन पक्ष स्वतंत्र लढणार का? यावर तेथील लढतीचे चित्र ठरणार आहे. आरपीआय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपा-शिवसेनेची रणनीती सध्यातरी एकला चलो रे चीच आहे. दरम्यान आमदार मकरंद पाटील यांनी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. (प्रतिनिधी) करडी नजर सध्या सर्व पक्षांच्या गुफ्तगू बैठकांनी जोर धरला आहे. मात्र, या बैठकांना आपल्या गोटातील कोण जातोय, यावर बारकाईने नजर ठेवली जात आहे. याशिवाय प्रतिस्पर्धी पक्षांच्या बैठकांचा सूर काय होता, याची माहिती मिळविण्यासाठी व्यूहरचना सुरू आहे.