शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

औंधसह १३ गावांतील वीजजोडणी तोडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:26 IST

औंध : औंधसह परिसरातील १३ गावातील पथदिवे वीजजोडणी व पिण्याच्या पाण्याची तोडलेली वीजजोडणी वीज वितरणने त्वरित जोडावीत, अशी ...

औंध : औंधसह परिसरातील १३ गावातील पथदिवे वीजजोडणी व पिण्याच्या पाण्याची तोडलेली वीजजोडणी वीज वितरणने त्वरित जोडावीत, अशी मागणी औंधसह १३ गावच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी लेखी निवेदनाद्वारे वीज वितरण कंपनीचे उपअभियंता सुभाष घाटोळ यांच्याकडे केली आहे. याबाबत त्वरित ठोस कारवाई करण्याची मागणीही या वेळी सरपंचांच्या शिष्टमंडळाने केली.

मागील आठ ते दहा दिवसांपासून औंधसह परिसरातील अंभेरी, कोकराळे, भोसरे, जायगाव, नांदोशी, येळीव, गोपूज, करांडेवाडी, गणेशवाडी व अन्य गावातील पथदिवे वीजजोडणी व अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याच्या योजनेची वीज जोडणी वीजवितरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कट केली आहेत.

त्याचा परिणाम अनेक गावांमध्ये कोरोना संकटाबरोबरच हे नवीन संकट उभारले आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे तसेच रात्रीच्या रस्त्यावरील अंधारामुळे आजारी रुग्णांचे हाल होऊ लागले आहेत. तसेच ठिकठिकाणी चोरटेही धुमाकूळ घालू लागले आहेत. नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी त्वरित वीजवितरण कंपनीने ही वीजजोडणी जोडावीत, याबाबत जनआंदोलन छेडले गेल्यास यास सर्वस्वी वीजवितरण कंपनी जबाबदार राहील, असा इशारा सरपंचांच्या शिष्टमंडळाने उपअभियंता सुभाष घाटोळ व ज्युनिअर अभियंता रुपेश लादे यांना दिलेल्या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या वेळी औंधचे उपसरपंच दीपक नलवडे, जायगावचे सरपंच नवनाथ देशमुख, येळीवचे सरपंच केशव जाधव, कोकराळे सरपंच भीमराव मदने, अंभेरीचे सरपंच रवींद्र शिंदे, भोसरेचे उपसरपंच सतीश जाधव, गणेश देशमुख, तानाजी इंगळे, चंद्रकांत घार्गे, अॅड. संतोष कमाने, संजय जाधव गावोगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.