शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

साताऱ्यातील खड्डे अखेर मुजविले, पालिकेने घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 13:16 IST

गेल्या महिनाभरापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे साताऱ्यातील रस्त्यांची प्रचंड दयनीय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना रस्त्यावरून जाताना नाकीनऊ येत होते. पालिकेने याची दखल घेऊन अखेर रस्त्यावरील खड्डे मुजविले.

ठळक मुद्देसाताऱ्यातील खड्डे अखेर मुजविले पालिकेने घेतली दखल

सातारा : गेल्या महिनाभरापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे साताऱ्यातील रस्त्यांची प्रचंड दयनीय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना रस्त्यावरून जाताना नाकीनऊ येत होते. पालिकेने याची दखल घेऊन अखेर रस्त्यावरील खड्डे मुजविले.समर्थ मंदिर ते पोवई नाका या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. कास आणि बामणोलीला जाण्यासाठी पर्यटकांना याच रस्त्याचा वापर करावा लागत आहे. सततच्या वर्दळीमुळे रस्त्यावर पावसात मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. गेल्या महिन्यात समर्थ मंदिर येथे खड्ड्यात दुचाकी आदळून एक महिला आणि तिचे लहान मूल गंभीर जखमी झाले होते.

या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी अनेकदा रस्त्यावरील खड्डे भरावेत, अशी मागणी केली होती. मात्र, पालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात होता. पर्यटकांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. रस्त्यावरून चालत जाणे नागरिकांसाठी धोक्याचे होत होते.

काही नागरिकांनी नगरसेवक धनंजय जांभळे यांच्याकडे रस्त्यातील खड्डे भरावेत, अशी मागणी केली. त्यानंतर तत्काळ दुसऱ्या दिवशी समर्थ मंदिर परिसरातील सर्व खड्डे मुजविण्यास सुरुवात झाली. राजवाडा आणि समर्थ मंदिर परिसरातील सर्व खड्डे मुजविल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSatara areaसातारा परिसर