शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

CoroanVirus Satara : श्रद्धांजलीच्या पोस्ट देताहेत तणावाला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 15:37 IST

CoroanVirus Satara : कोरोनाच्या महाभयंकर महामारीने शहरांसह ग्रामीण भागातही हातपाय पसरवले आहेत. माण तालुक्यातील खेड्यापाड्यात रुग्ण संख्या वाढत आहे. काही खबरदारी घेणारे जागृत नागरिक स्वतःसह कुटुंंबाचीही काळजी घेत आहेत. मात्र कोरोना बाधितांच्या आकड्यासह उपचार घेत असणाऱ्यांच्या मृतांचा आकडादेखील वाढत आहे. सहाजिकच सोशल मीडियावरून ओळखीच्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जातेय. यातून रुग्णांसह नातेवाईकांना मानसिक तणावाला निमंत्रण मिळत आहे.

ठळक मुद्देरुग्णांबरोबरच नातेवाईकांना धास्ती सोशल मीडियाचा वापर जपून करण्याची गरज

वरकुटे-मलवडी : कोरोनाच्या महाभयंकर महामारीने शहरांसह ग्रामीण भागातही हातपाय पसरवले आहेत. माण तालुक्यातील खेड्यापाड्यात रुग्ण संख्या वाढत आहे. काही खबरदारी घेणारे जागृत नागरिक स्वतःसह कुटुंंबाचीही काळजी घेत आहेत. मात्र कोरोना बाधितांच्या आकड्यासह उपचार घेत असणाऱ्यांच्या मृतांचा आकडादेखील वाढत आहे. सहाजिकच सोशल मीडियावरून ओळखीच्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जातेय. यातून रुग्णांसह नातेवाईकांना मानसिक तणावाला निमंत्रण मिळत आहे.आठवड्यातून तीन चारवेळा अशा पोस्ट वाचायला मिळत असल्याने, अनेकांना मानसिक तणावाला निमंत्रण मिळत आहे. सरकारी व खासगी कोरोना चाचणी अहवालानुसार शेकडोंच्या संख्येने जिल्ह्यासह तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनारुग्ण उपचार घेत आहेत. याबद्दल सोशल मीडियावर माण तालुका आरोग्य प्रशासन किंंवा अन्य कोणाकडून तरी वेळोवेळी माहिती कळते. सध्या जिकडे बघावे तिकडे फक्त कोरोनाबद्दलच चर्चा, माहिती, उपचार याबाबत बोलले जात आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी प्रत्येकांनीच देवांना साकडे घातले आहे.

कोणत्या रुग्णाचे उपचारादरम्यान निधन झाले. त्याच्या निधनाची पोस्ट सोशल मीडियावर जास्त प्रमाणात व्हायरल होत असते. निधन पावलेली व्यक्त त्या परिसरात ओळखीच्या असल्याने भावपूर्ण श्रद्धांजलीच्या पोस्ट प्रत्येकांच्या मोबाईलवर शंभरहून अधिक असणाऱ्या ग्रुपवर अनेकदा फिरली जाते. कोरोनामुळे याचे निधन झाले, त्याचे निधन झाले अशा चर्चा नेहमीच एकायला मिळते.सोशल मीडियावर निधन वार्तांची पोस्ट पडल्यावर भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून काहीजण दु:ख व्यक्त करतात. तालुक्यात आठवड्यातून किमान तीन ते चार जणांचे कोरोनामुळे निधन झाल्याचे कानावर पडते. अशा निधन पावलेल्या व्यक्ती आपापल्या क्षेत्रात दिग्गज असतात अथवा तालुक्यात चांगल्यापैकी परिचित असतात. किंवा त्या व्यक्तीचा हजारो लोकांचा जनसंपर्क असतो.

कोरोनामुळे झालेल्या निधनाच्या भावपूर्ण श्रद्धांजलीची पोस्टदृष्टीस पडताच अनेकांना खोलवर वेदना होतात. मग तो जवळचा सलगीतला असलाच किंवा लहानपणाचा मित्र, सोबती, वर्गमित्र असल्यास त्याच्या सहवासातील जुन्या आठवणी उफाळून येवून अनेकजण खुप दु:खी होत आहेत. त्यातल्या त्यात कोरोनाने निधन झालेली व्यक्ती आपल्यापेक्षा कमी वयाची असल्यास तर काहींच्या मनामध्ये अचानकपणे भीतीची भावना नैसर्गिकरित्या निर्माण होत आहे.काहींनी व्हीडीओ बनवून त्यास भावनाविवश पार्श्वसंगीत दिलेले असते. त्यामुळे आणखीनच मनात दु:ख होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या परिवारात हे दु:ख झाले आहे, त्या परिवारास सांत्वन भेट देण्यासाठी सुद्धा कोरोना आजारामुळे त्यांंच्या घरी जाता येत नाही. याची मोठी सल असते. त्यामुळे सोशल मीडियावरून शेअर झालेल्या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या पोस्ट वाचून अनेकांना मानसिक तणावाला सामोरं जावं लागत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूSatara areaसातारा परिसर