शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

महाबळेश्वरात ध्वनीप्रदूषण करणारे ‘हॉटेल कीज’ सील प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई : नळ, वीज तोडल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 23:43 IST

महाबळेश्वर : ध्वनी प्रदूषण करून पर्यटनस्थळाची शांतता भंग केल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाबळेश्वरात शनिवारी मोठी कारवाई केली.

ठळक मुद्देरात्री दहानंतर ध्वनीक्षेपकांवर बंदी आहे. याचे भानही या मंडळींना नसते.शहरालगतच्या जंगलसदृश्य विभागात राहण्याकडे लोकांचा कल वाढला आहे

महाबळेश्वर : ध्वनी प्रदूषण करून पर्यटनस्थळाची शांतता भंग केल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाबळेश्वरात शनिवारी मोठी कारवाई केली. येथील ‘हॉटेल किज’ला सील करून हॉटेलचा वीज व पाणी पुरवठा खंडित केला. नाताळ अन् ३१ डिंसेबरच्या तोंडावर कारवाई केल्याने हॉटेल व्यावसायिकामध्ये खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्राचे नंदनवन, थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर जगभर प्रसिद्ध आहे. वाढते वायूप्रदूषण, धकाधकीच्या जीवनाला कंटाळेले पर्यटक चार दिवस शांतता मिळविण्यासाठी महाबळेश्वरात येतात. शहरापेक्षा शहरालगतच्या जंगलसदृश्य विभागात राहण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे शहरापेक्षा लगतच्या परिसरात हॉटेल व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. शहरापासून थोडे दूर असल्याने हॉटेलमध्ये कोणाचा कसलाच अडथळा येत नाही.

शांत व निवांत वातावरणात लग्न सोहळे व विविध खासगी कंपन्यांचे परिषदा होतात. या मंडळींच्या मनोरंजनासाठी रात्री करमणुकीचे कार्यक्रम होतात. यासाठी हॉटेलच्या लॉनवर व्यासपीठ उभारून कर्णकर्कश आवाजात कार्यक्रम पार पडतात. दारू पिऊन रात्रभर धिंगाणा सुरू असतो. रात्री दहानंतर ध्वनीक्षेपकांवर बंदी आहे. याचे भानही या मंडळींना नसते. गावच्या पर्यटनावर परिणाम होईल म्हणून येथील स्थानिक नागरिक निमूटपणे सहन असतात. काहीवेळा तक्रार करूनही कोणी दखल घेत नाही त्यामुळे अनेक वर्षे येथे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषणाचा त्रास येथील जनता सहन करीत आहे. परंतु यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा चांगलाच बडगा उगारला आहे.विधानसभेत घुमला आवाजयेथील हॉटेल किजमध्ये लग्न सोहळ्यानिमित्त आयोजित करमणुकीच्या कार्यक्रमासाठी रात्री उशिरापर्यंत ध्वनीक्षेपक सुरू होते. यासंदर्भात अनेकांनी पोलिस ठाण्यात तक्रारी केल्या; परंतु पोलिसांकडून दुर्लक्ष झाले. रात्री दोन वाजता कार्यक्रम संपल्यानंतर ध्वनीक्षेपक बंद झाला. याप्रकाराने चिडलेल्या काही नागरिकांनी पालकमंत्री व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडे तक्रारी केल्या. दरम्यान, या तक्रारीबाबत विधान परीषदेत हा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा ‘ध्वनीप्रदूषण करणाºया अशा हॉटेलवर कारवाई करण्यात येईल,’ असे आश्वासन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले. त्यानंतर वेगाने सूत्रे हलण्यास सुरुवात झाली. रामदास कदम यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सातारा कार्यालयाचे प्रमुखांना थेट कारवाई करण्याचे आदेश दिले.कारमध्येही गाणी लावून पर्यटकांचा गोंधळमहाबळेश्वर हा जंगली भाग आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजविण्यास परवानगी नसते. तरीही काही हौशी पर्यटक महाबळेश्वर परिसरातील रस्त्याच्या कडेला आपापल्या गाड्या उभ्या करून त्यामध्ये मोठ्या आवाजात गाणी लावून नाचत असतात. मोठ्या आवाजामुळे आजूबाजूच्या स्थानिक रहिवाशांना याचा त्रास होतोच. शिवाय जंगलातील वन्य प्राण्यांच्या हालचालीवरही परिणाम होतो. त्यामुळे बिथरलेले प्राणी पर्यटकांवर हल्ला करू शकतात, याचा अभ्यास होणे गरजेचे आहे.