शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरात ध्वनीप्रदूषण करणारे ‘हॉटेल कीज’ सील प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई : नळ, वीज तोडल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 23:43 IST

महाबळेश्वर : ध्वनी प्रदूषण करून पर्यटनस्थळाची शांतता भंग केल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाबळेश्वरात शनिवारी मोठी कारवाई केली.

ठळक मुद्देरात्री दहानंतर ध्वनीक्षेपकांवर बंदी आहे. याचे भानही या मंडळींना नसते.शहरालगतच्या जंगलसदृश्य विभागात राहण्याकडे लोकांचा कल वाढला आहे

महाबळेश्वर : ध्वनी प्रदूषण करून पर्यटनस्थळाची शांतता भंग केल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाबळेश्वरात शनिवारी मोठी कारवाई केली. येथील ‘हॉटेल किज’ला सील करून हॉटेलचा वीज व पाणी पुरवठा खंडित केला. नाताळ अन् ३१ डिंसेबरच्या तोंडावर कारवाई केल्याने हॉटेल व्यावसायिकामध्ये खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्राचे नंदनवन, थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर जगभर प्रसिद्ध आहे. वाढते वायूप्रदूषण, धकाधकीच्या जीवनाला कंटाळेले पर्यटक चार दिवस शांतता मिळविण्यासाठी महाबळेश्वरात येतात. शहरापेक्षा शहरालगतच्या जंगलसदृश्य विभागात राहण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे शहरापेक्षा लगतच्या परिसरात हॉटेल व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. शहरापासून थोडे दूर असल्याने हॉटेलमध्ये कोणाचा कसलाच अडथळा येत नाही.

शांत व निवांत वातावरणात लग्न सोहळे व विविध खासगी कंपन्यांचे परिषदा होतात. या मंडळींच्या मनोरंजनासाठी रात्री करमणुकीचे कार्यक्रम होतात. यासाठी हॉटेलच्या लॉनवर व्यासपीठ उभारून कर्णकर्कश आवाजात कार्यक्रम पार पडतात. दारू पिऊन रात्रभर धिंगाणा सुरू असतो. रात्री दहानंतर ध्वनीक्षेपकांवर बंदी आहे. याचे भानही या मंडळींना नसते. गावच्या पर्यटनावर परिणाम होईल म्हणून येथील स्थानिक नागरिक निमूटपणे सहन असतात. काहीवेळा तक्रार करूनही कोणी दखल घेत नाही त्यामुळे अनेक वर्षे येथे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषणाचा त्रास येथील जनता सहन करीत आहे. परंतु यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा चांगलाच बडगा उगारला आहे.विधानसभेत घुमला आवाजयेथील हॉटेल किजमध्ये लग्न सोहळ्यानिमित्त आयोजित करमणुकीच्या कार्यक्रमासाठी रात्री उशिरापर्यंत ध्वनीक्षेपक सुरू होते. यासंदर्भात अनेकांनी पोलिस ठाण्यात तक्रारी केल्या; परंतु पोलिसांकडून दुर्लक्ष झाले. रात्री दोन वाजता कार्यक्रम संपल्यानंतर ध्वनीक्षेपक बंद झाला. याप्रकाराने चिडलेल्या काही नागरिकांनी पालकमंत्री व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडे तक्रारी केल्या. दरम्यान, या तक्रारीबाबत विधान परीषदेत हा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा ‘ध्वनीप्रदूषण करणाºया अशा हॉटेलवर कारवाई करण्यात येईल,’ असे आश्वासन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले. त्यानंतर वेगाने सूत्रे हलण्यास सुरुवात झाली. रामदास कदम यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सातारा कार्यालयाचे प्रमुखांना थेट कारवाई करण्याचे आदेश दिले.कारमध्येही गाणी लावून पर्यटकांचा गोंधळमहाबळेश्वर हा जंगली भाग आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजविण्यास परवानगी नसते. तरीही काही हौशी पर्यटक महाबळेश्वर परिसरातील रस्त्याच्या कडेला आपापल्या गाड्या उभ्या करून त्यामध्ये मोठ्या आवाजात गाणी लावून नाचत असतात. मोठ्या आवाजामुळे आजूबाजूच्या स्थानिक रहिवाशांना याचा त्रास होतोच. शिवाय जंगलातील वन्य प्राण्यांच्या हालचालीवरही परिणाम होतो. त्यामुळे बिथरलेले प्राणी पर्यटकांवर हल्ला करू शकतात, याचा अभ्यास होणे गरजेचे आहे.