शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

मदतीच्या श्रेयावरून सरकारकडून राजकारण -: तृप्ती देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 20:25 IST

लोकांपर्यंत कोणतीही मदत पोहोचू शकणार नाही. त्यामुळे सरकारने किमान सहा महिन्यांनी निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती तृप्ती देसाई यांनी यावेळी केली.

ठळक मुद्देक-हाडातील पूरग्रस्त कुटुंबीयांशी चर्चा

क-हाड : ‘अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे क-हाड येथील पाटण कॉलनीतील कुटुंबीयांचेही नुकसान झाले असून, याठिकाणी अजूनपर्यंत शासनाची तातडीची पाच हजार रुपयांची रोख रक्कम मिळालेली नाही. मात्र, इतर ठिकाणी रोख रक्कम दिली गेली आहे. याठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे घर असल्यामुळे सूडबुद्धीने सरकारने ही मदत दिली नसल्याचे वाटते.

मदत पोहोचली तर त्याचे श्रेय पृथ्वीराज चव्हाण यांना जाईल, या भीतीने सरकारने हे घाणेरडे राजकारण चालवले आहे,’ असा आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला.कºहाड येथील पाटण कॉलनीत मंगळवारी दुपारी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी बाधित कुटुंबांची भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी भूमाता ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

देसाई म्हणाल्या, ‘हातावर पोट असलेल्या लोकांच्या घरांची पडझड, अन्नधान्य, संसारोपयोगी वस्तू या गोष्टींच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, नागरिकांनी वैयक्तिकरीत्या मदत पोहोचवली आहे. मात्र, सरकारची पाच हजार रुपयांची तातडीची मदत अजूनही त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाही. पाटण कॉलनीत केवळ राजकीय द्वेषातून मदत देण्यात विलंब का केला जात आहे, याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचे उत्तर द्यावे, अशी संतप्त मागणी करत जर चोवीस तासांच्या आत येथील बाधितांना तातडीने रोख रक्कम व अन्य मदत दिली गेली नाही तर मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांना याबाबत जाब विचारू,’ असा इशारा यावेळी देसाई यांनी दिला.सरकारने निवडणूक सहा महिने पुढे ढकलावीसांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये महापुरामुळे अनेक लोकांची घरे, संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत पंधरा दिवसांच्या आत निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास कोणाचीही घरे बांधून होणार नाहीत, लोकांपर्यंत कोणतीही मदत पोहोचू शकणार नाही. त्यामुळे सरकारने किमान सहा महिन्यांनी निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती तृप्ती देसाई यांनी यावेळी केली.सरकार आपत्ती व्यवस्थापनात अपयशीगडहिंग्लज, शिरोळ ब्रह्मनाळ, सांगली अशा ठिकाणी सरकारची रोख रक्कम पोहोचलेली नाही. ज्या ठिकाणी पोहोचली आहे तेथे मदत घेण्यासाठी लोकांना पंधरा-पंधरा तास रांगेत उभा राहावे लागत आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन व नियोजनात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. महाराष्ट्रातील नागरिकांचे सरकारने पालकत्व स्वीकारले आहे, असे मत देसाई यांनी यावेळी व्यक्त केले. 

टॅग्स :floodपूरSatara areaसातारा परिसर