शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मदतीच्या श्रेयावरून सरकारकडून राजकारण -: तृप्ती देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 20:25 IST

लोकांपर्यंत कोणतीही मदत पोहोचू शकणार नाही. त्यामुळे सरकारने किमान सहा महिन्यांनी निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती तृप्ती देसाई यांनी यावेळी केली.

ठळक मुद्देक-हाडातील पूरग्रस्त कुटुंबीयांशी चर्चा

क-हाड : ‘अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे क-हाड येथील पाटण कॉलनीतील कुटुंबीयांचेही नुकसान झाले असून, याठिकाणी अजूनपर्यंत शासनाची तातडीची पाच हजार रुपयांची रोख रक्कम मिळालेली नाही. मात्र, इतर ठिकाणी रोख रक्कम दिली गेली आहे. याठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे घर असल्यामुळे सूडबुद्धीने सरकारने ही मदत दिली नसल्याचे वाटते.

मदत पोहोचली तर त्याचे श्रेय पृथ्वीराज चव्हाण यांना जाईल, या भीतीने सरकारने हे घाणेरडे राजकारण चालवले आहे,’ असा आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला.कºहाड येथील पाटण कॉलनीत मंगळवारी दुपारी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी बाधित कुटुंबांची भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी भूमाता ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

देसाई म्हणाल्या, ‘हातावर पोट असलेल्या लोकांच्या घरांची पडझड, अन्नधान्य, संसारोपयोगी वस्तू या गोष्टींच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, नागरिकांनी वैयक्तिकरीत्या मदत पोहोचवली आहे. मात्र, सरकारची पाच हजार रुपयांची तातडीची मदत अजूनही त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाही. पाटण कॉलनीत केवळ राजकीय द्वेषातून मदत देण्यात विलंब का केला जात आहे, याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचे उत्तर द्यावे, अशी संतप्त मागणी करत जर चोवीस तासांच्या आत येथील बाधितांना तातडीने रोख रक्कम व अन्य मदत दिली गेली नाही तर मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांना याबाबत जाब विचारू,’ असा इशारा यावेळी देसाई यांनी दिला.सरकारने निवडणूक सहा महिने पुढे ढकलावीसांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये महापुरामुळे अनेक लोकांची घरे, संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत पंधरा दिवसांच्या आत निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास कोणाचीही घरे बांधून होणार नाहीत, लोकांपर्यंत कोणतीही मदत पोहोचू शकणार नाही. त्यामुळे सरकारने किमान सहा महिन्यांनी निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती तृप्ती देसाई यांनी यावेळी केली.सरकार आपत्ती व्यवस्थापनात अपयशीगडहिंग्लज, शिरोळ ब्रह्मनाळ, सांगली अशा ठिकाणी सरकारची रोख रक्कम पोहोचलेली नाही. ज्या ठिकाणी पोहोचली आहे तेथे मदत घेण्यासाठी लोकांना पंधरा-पंधरा तास रांगेत उभा राहावे लागत आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन व नियोजनात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. महाराष्ट्रातील नागरिकांचे सरकारने पालकत्व स्वीकारले आहे, असे मत देसाई यांनी यावेळी व्यक्त केले. 

टॅग्स :floodपूरSatara areaसातारा परिसर