शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

वनविभागाच्या मोबाईलवर ‘द्या शिकारीची माहिती पटकन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 23:01 IST

सातारा : वन्यजीवांचे संरक्षण अन् पर्यावरण संवर्धनासाठी वनविभागाच्या वतीने विविध कार्यक्रम हाती घेतले जात असताना आता वनविभागाची अनोखी ‘कॉलरट्यून’ नागरिकांमध्ये प्रबोधन करू लागली आहे

सचिन काकडे ।सातारा : वन्यजीवांचे संरक्षण अन् पर्यावरण संवर्धनासाठी वनविभागाच्या वतीने विविध कार्यक्रम हाती घेतले जात असताना आता वनविभागाची अनोखी ‘कॉलरट्यून’ नागरिकांमध्ये प्रबोधन करू लागली आहे. वन अधिकारी व कर्मचाºयांना फोन लावताच त्यांच्या मोबाईलवरून ‘वन्यजीवांचे करू संरक्षण, द्या शिकारीची माहिती पटकन’ असे बोल कानी पडू लागले आहेत.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सातारा जिल्ह्याला निसर्गाचे अनमोल वरदान लाभले आहे. जिल्ह्यात ज्याप्रमाणे अनेक दुर्लभ वृक्ष, वनस्पती आढळतात, त्याचप्रमाणे पशुपक्षी व प्राण्यांचे अस्तित्व आजही टिकून आहे. मात्र, बेसुमार वृक्षतोड व शिकारीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला असून, पशुपक्ष्यांच्या अधिवासावरही संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ºहास रोखण्याबरोबरच वन्यजीवांच्या संरक्षणासाठी वनविभागाच्या वतीने नागरिकांमध्ये प्रबोधन केले जात आहे.

आजपर्यंत सूचनाफलक, पोस्टर आदींच्या माध्यमातून नागरिकांना वृक्षांचे महत्त्व पटवून दिले जात होते. वन्यजीवांचे संरक्षण व्हावे, याची माहिती दिली जात होती. मात्र, आता याही पुढे जाऊन वनविभागाची प्रबोधनाचा नवा मार्ग स्वीकारला आहे. जिल्ह्यातील वनअधिकारी व कर्मचाºयांच्या मोबाईलवर फोन केल्यानंतर नागरिकांना ट्रिंग..ट्रिंग... असे ऐकू न येता प्रबोधनात्मक कॉलरट्यून ऐकू येऊ लागली आहे.‘वन्यजीवांचे करू संरक्षण, द्या शिकारीची माहितीशिरता प्राणी गावा येथे कळवा’ असे या कॉलरट्यूनचे शब्द असून, ही कॉलरट्यून नागरिकांमध्ये जनजागृती करू लागली आहे. जिल्ह्यातील १४८ वनरक्षक व ४८ वनपाल यांच्या शासकीय मोबाईल नंबरवर शासनाच्या वतीने ही कॉलरट्यून सुरू करण्यात आली आहे.हा आहे संदेश...

कॉलरट्यूनच्या माध्यमातून वनविभागाने वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी पाऊल पुढे टाकले आहे. अवैध वृक्षतोड व जंगलात लावणारे वणवे रोखण्यासाठीही अशा प्रकारच्या घटनांनी माहिती तातडीने वनविभागास द्यावी, असे आवाहनही या ट्यूनच्या माध्यमातून केले आहे.गावोगावी सूचनाफलकउन्हाळा सुरू झाला असून, जिल्ह्यात वणवे लावण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. या वणव्यात वृक्षसंपदेची हानी होत असून शेकडो पशू-पक्षी जीव गमावत आहेत. अशा प्रकारच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी वनविभागाने गावोवागी सूचनाफलक लावले आहेत.