शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

योजनांची पत्रके पंचायतीच्या भिंतीवर..!

By admin | Updated: January 1, 2017 22:48 IST

कऱ्हाड पंचायत समितीचा कारभार : नोटीस बोर्डअभावी पोस्टर चिटकवले; सभापतींसह सदस्य, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

कऱ्हाड : अनेक पुरस्कार मिळविलेल्या कऱ्हाड पंचायत समितीमध्ये सभापती व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सध्या लाभार्थ्यांना भेटण्यासाठी वेळ नसल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेला नोटीस बोर्डही काढून टाकला असल्याने योजनांची पत्रके भिंतीवर लावून प्रसिद्धी केली जात आहे. योजनांची माहिती त्याबाबचा संदेश द्यायचा कुणाकडे? असा प्रश्न पडला असताना एका लाभार्थ्याने चक्क सभापतींच्या नावेच पत्र लिहिले आहे. तेही येथील कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारावर लावले आहे. शासनाच्या नव्या योजना काटेकोरपणे ग्रामीण भागात राबवून त्यांची नियमित प्रसिद्धी शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी देणे गरजेचे आहे. त्यानुसार ‘शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती द्या व योजनांची जास्तीत जास्त प्रसिद्धी करा,’ अशा जिल्हा परिषदेकडून सूचना देण्यात येऊनही त्याचा विसर सध्या कऱ्हाड पंचायत समितीला पडलेला दिसून येत आहे.नागरिकाने पत्र लावले आहेत. त्या शेजारीच आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती देणारे फलक धूळखात पडून राहिले आहेत. मात्र, ते दर्शनी भागात लावण्याची तसदी सुद्धा साधी येथील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांकडून घेतली जात नाही. त्यामुळे योजना असूनही त्यांची प्रसिद्धी अधिकाऱ्यांकडूनच केली जात नसल्याने लाभार्थ्यांपर्यंत त्या योजना कधी पोहोचणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.केंद्र व राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाकडून प्रत्येक शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न करणे गरजेचे असते. ते अधिकाऱ्यांचे कर्तव्यच असते. एखादी महत्त्वाची माहिती अथवा शिबिराची माहिती देण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात नोटीस बोर्ड ठेवण्यात आलेले असते. त्या नोटीस बोर्डावर नव्या योजना, अद्यादेश, तसेच महत्त्वाची माहितीचे तयार करण्यात आलेले सूचनापत्र चिकटवले जाते. जेणेकरून या ठिकाणी कामासाठी तसेच माहिती मिळविण्यासाठी कर्मचाऱ्यांना, नागरिकांना ते माहिती होऊ शकेल. मात्र, येथील पंचायत समितीमध्ये योजना या फक्त नावालाच असल्याचे दिसून येत आहे. कारण पंचायत समितीच्या इमारतीमध्ये प्रवेशद्वारावरील नोटीस बोर्ड हे काढून ठेवण्यात आले आहे.जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील समाजकल्याण विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग या विभागामध्ये नव्या योजना नेहमी येत असतात. मात्र, त्याची प्रसिद्धी ही मासिक सभेशिवाय दिली जात नाही. शिवाय नव्या योजनांचे एकही फलक हे लावले जात नाहीत. त्यामुळे योजना कधी आल्या आणि कधी निघून गेल्या याची माहिती देखील या ठिकाणी येणाऱ्या सदस्यांना व नागरिकांना मिळत नाही. आता तर कऱ्हाड पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवण्यात आलेले नोटीस बोर्डच काढून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे माहिती फलक, नोटिसा भिंतीवरच लावत आहेत. (प्रतिनिधी) दुपारनंतर अधिकारी गायब...कऱ्हाड पंचायत समितीमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची कामाची वेळ ही सकाळी दहा ते सायंकाळी सहा अशी आहे. मात्र, या ठिकाणी दुपारी एक वाजले की अधिकारी बाहेर निघून जातात. ते परत दुपारी पाच वाजल्यानंतरच परत येतात. कामाचे निमित्त सांगून अधिकारी नेमके जातात कुठे हा मात्र संशोधनाचा विषय आहे, अशी चर्चा आहे. स्वागत कक्षही नाही... कऱ्हाड पंचायत समितीमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी स्वागत कक्ष उभारण्याची गरज आहे. तसेच नागरिकांना नव्या योजनांची तसेच महत्त्वपूर्ण लागणाऱ्या गोष्टींची माहिती देण्यासाठी स्वागत कक्ष उभारणे गरजेचे आहे. मात्र, तोही अद्याप या ठिकाणी उभारण्यात आलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी एखादी व्यक्तीसमोर कोणता विभाग कोठे आहे. आणि कोणत्या अधिकाऱ्याला भेटायचे, असा प्रश्न निर्माण होतो.