शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

योजनांची पत्रके पंचायतीच्या भिंतीवर..!

By admin | Updated: January 1, 2017 22:48 IST

कऱ्हाड पंचायत समितीचा कारभार : नोटीस बोर्डअभावी पोस्टर चिटकवले; सभापतींसह सदस्य, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

कऱ्हाड : अनेक पुरस्कार मिळविलेल्या कऱ्हाड पंचायत समितीमध्ये सभापती व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सध्या लाभार्थ्यांना भेटण्यासाठी वेळ नसल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेला नोटीस बोर्डही काढून टाकला असल्याने योजनांची पत्रके भिंतीवर लावून प्रसिद्धी केली जात आहे. योजनांची माहिती त्याबाबचा संदेश द्यायचा कुणाकडे? असा प्रश्न पडला असताना एका लाभार्थ्याने चक्क सभापतींच्या नावेच पत्र लिहिले आहे. तेही येथील कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारावर लावले आहे. शासनाच्या नव्या योजना काटेकोरपणे ग्रामीण भागात राबवून त्यांची नियमित प्रसिद्धी शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी देणे गरजेचे आहे. त्यानुसार ‘शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती द्या व योजनांची जास्तीत जास्त प्रसिद्धी करा,’ अशा जिल्हा परिषदेकडून सूचना देण्यात येऊनही त्याचा विसर सध्या कऱ्हाड पंचायत समितीला पडलेला दिसून येत आहे.नागरिकाने पत्र लावले आहेत. त्या शेजारीच आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती देणारे फलक धूळखात पडून राहिले आहेत. मात्र, ते दर्शनी भागात लावण्याची तसदी सुद्धा साधी येथील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांकडून घेतली जात नाही. त्यामुळे योजना असूनही त्यांची प्रसिद्धी अधिकाऱ्यांकडूनच केली जात नसल्याने लाभार्थ्यांपर्यंत त्या योजना कधी पोहोचणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.केंद्र व राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाकडून प्रत्येक शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न करणे गरजेचे असते. ते अधिकाऱ्यांचे कर्तव्यच असते. एखादी महत्त्वाची माहिती अथवा शिबिराची माहिती देण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात नोटीस बोर्ड ठेवण्यात आलेले असते. त्या नोटीस बोर्डावर नव्या योजना, अद्यादेश, तसेच महत्त्वाची माहितीचे तयार करण्यात आलेले सूचनापत्र चिकटवले जाते. जेणेकरून या ठिकाणी कामासाठी तसेच माहिती मिळविण्यासाठी कर्मचाऱ्यांना, नागरिकांना ते माहिती होऊ शकेल. मात्र, येथील पंचायत समितीमध्ये योजना या फक्त नावालाच असल्याचे दिसून येत आहे. कारण पंचायत समितीच्या इमारतीमध्ये प्रवेशद्वारावरील नोटीस बोर्ड हे काढून ठेवण्यात आले आहे.जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील समाजकल्याण विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग या विभागामध्ये नव्या योजना नेहमी येत असतात. मात्र, त्याची प्रसिद्धी ही मासिक सभेशिवाय दिली जात नाही. शिवाय नव्या योजनांचे एकही फलक हे लावले जात नाहीत. त्यामुळे योजना कधी आल्या आणि कधी निघून गेल्या याची माहिती देखील या ठिकाणी येणाऱ्या सदस्यांना व नागरिकांना मिळत नाही. आता तर कऱ्हाड पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवण्यात आलेले नोटीस बोर्डच काढून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे माहिती फलक, नोटिसा भिंतीवरच लावत आहेत. (प्रतिनिधी) दुपारनंतर अधिकारी गायब...कऱ्हाड पंचायत समितीमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची कामाची वेळ ही सकाळी दहा ते सायंकाळी सहा अशी आहे. मात्र, या ठिकाणी दुपारी एक वाजले की अधिकारी बाहेर निघून जातात. ते परत दुपारी पाच वाजल्यानंतरच परत येतात. कामाचे निमित्त सांगून अधिकारी नेमके जातात कुठे हा मात्र संशोधनाचा विषय आहे, अशी चर्चा आहे. स्वागत कक्षही नाही... कऱ्हाड पंचायत समितीमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी स्वागत कक्ष उभारण्याची गरज आहे. तसेच नागरिकांना नव्या योजनांची तसेच महत्त्वपूर्ण लागणाऱ्या गोष्टींची माहिती देण्यासाठी स्वागत कक्ष उभारणे गरजेचे आहे. मात्र, तोही अद्याप या ठिकाणी उभारण्यात आलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी एखादी व्यक्तीसमोर कोणता विभाग कोठे आहे. आणि कोणत्या अधिकाऱ्याला भेटायचे, असा प्रश्न निर्माण होतो.